Thursday, October 5, 2017

सह्याद्रीच्या वाटा

ही गोष्ट आहे, एका नैसर्गिक रचनेची, भौगोलिक आविष्काराची! पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण-नगर रस्त्यावर आळेफाटय़ाच्या पूर्वेला गुळुंचवाडी गावाजवळ हे निसर्गनवल दडलंय. पुण्याहून आळेफाटा ९६ किलोमीटर तर आळेफाटय़ाहून साधारण १८ किलोमीटरवर हे गुळुंचवाडी गाव. हे गाव ओलांडताच लगेच अणे घाट सुरू होतो. या घाटाची दोन-चार वळणे घेताच डाव्या हाताला दरीत एक दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाचे कुतूहल चाळवते.
या डोंगराच्या एका शिरेवरच एक भलामोठा नैसर्गिक बोगदा तयार झालेला दिसतो. एखाद्या पुलाच्या कमानीप्रमाणे त्याची ही रचना. उत्सुकतेपोटी हे स्थळ पाहण्याची इच्छा होते. ती दरी उतरत खाली जावे आणि त्या भौगोलिक आविष्काराच्या पुढय़ात उभे राहावे. केवळ दर्शनानेच एक क्षण उडायलाच होते. निसर्गाचे हे कोडे अजब रसायन वाटू लागते.
कुणी, कशी आणि कधी तयार केली ही रचना? त्या कमानीवर नजर टाकत असतानाच हे असे असंख्य प्रश्न सतावू लागतात. सुरुवातीचा काही काळ केवळ हे आश्चर्य बघण्यातच जातात. मग हळूहळू या कोडय़ाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न सुरू होतो. हा शोध घेण्यासाठी थोडेसे भू-शास्त्राकडे वळावे लागते. आपला भू-प्रदेश हा विविध प्रकारच्या खडकांच्या स्तरांनी तयार झाला आहे. यातील काही स्तर हे कठीण तर काही मऊ-मुदू प्रकारातील आहेत. या भू-स्तरांवर निसर्गातील ऊन, वारा, पाऊस आणि पाणी हे बाह्य़घटक सतत परिणाम करत असतात. हजारो वर्षांच्या या संघर्षांत (घर्षण) मृदू खडकाचे भूस्तर नष्ट होतात. क्वचित प्रसंगी त्यांचे रूप-आकारही बदलतात. निसर्गाने तयार केलेले हेच आकार – चेहरे मग आमच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. गुळुंचवाडीच्या या शिलासेतूमागेही हेच कारण.
घडले असे, की गुळुंचवाडीच्या या बोगद्याजवळूनच वरच्या बाजूने एक ओढा खाली येतो. एरवी कोरडय़ा असणाऱ्या या भागात पावसाळय़ात मात्र या ओढय़ातून साऱ्या डोंगराचे पाणी खाली वाहत येते. ते इथे या बोगद्याच्या डोंगररांगेला येऊन अडते. मग अशा वेळी कित्येक वर्षांपासून या पाण्याने वाट मिळवण्यासाठी या डोंगराशी संघर्ष सुरू केला. पाण्याच्या या संघर्षांतून डोंगराच्या पोटातील मृदू खडकाच्या स्तराची झीज होत गेली. छताच्या व तळाच्या बाजूचा कठीण खडक तसाच राहिला. पाण्याने स्वत:ला वाट तयार करून घेतली. पुढे हजारो वर्षे हे पाणी या जागेतून असेच वाहत – घर्षण करत राहिले आणि ज्यातून मग तयार झाला हा नैसर्गिक बोगदा!
गुळुंचवाडीचा हा बोगदा तब्बल २१ मीटर लांब, ९ मीटर रुंद आणि २ ते ६ मीटर उंचीचा आहे. या अदूभुत बोगद्याखालून जाताना निसर्गाच्या या चमत्कारात अडकायला होते. या बदलांचे आश्चर्य वाटू लागते. विज्ञानाची ही रहस्ये मनाला भुरळ पाडतात. बरोबरच्या एखाद्या गावक ऱ्याशी हा सारा अनुभव जोडावा तर तो आपला त्याचे श्रेय पांडवांना देऊन रिकामा होतो. ‘‘कौरव-पांडव युद्धात पांडवांपैकी कुणाच्या तरी एकाच्या बाणाचा नेम चुकला अन् इथं डोंगराला भोक पडलं!’’ त्याची ही कथा ऐकत आपण आपले गालातल्या गालात हसायचे आणि या भू-शास्त्रीय आविष्काराला एका लोककथेचीही जोड द्यायची!
पावसाळय़ात इथे आले, की या बोगद्याखालून ओढय़ाचे पाणी एका छोटय़ा धबधब्याचे रूप घेऊन धावत असते. आता या पाण्यावर पुढे एक पाझर तलावही बांधला आहे. या बोगद्यातून पाणी खळाळू लागले, की भोवतालच्या हिरवाईवर या नवलाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. एरवीही कधी आलो तर या बोगद्याच्या शांत सावलीत बसून अणे घाटातून होणारी वाहतूक पाहण्यातील बालसुलभ भावावस्था अनुभवावी वाटते. मध्येच या कमानीत शिरणारा वारा सूं-सूं आवाज करत वाहू लागतो. तर संध्याकाळी मावळतीचे रंग या कमानीला न्हाऊ घालू पाहतात. अमेरिकेतील ती ‘गोल्डन आर्च’ही अशीच केशरी रंगात न्हाणारी. एक क्षण तिचीच आठवण झाली. अगदी त्या सारखी नसली, तरी त्या पठडीतील हे निसर्गनवल! फरक एवढाच, की ‘गोल्डन आर्च’च्या वाटय़ाला अमाप प्रसिद्धी आली. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक तिथे आपली हजेरी लावतात. तर आमच्या या गुळुंचवाडीच्या बोगद्याच्या वाऱ्याला मात्र त्या गावचा खेडूतही उभा राहत नाही. गुळुंचवाडीच्या कमानीच्या मनातले हे दु:ख जाणून घेत तिच्या शरीरावरून प्रेमाने एक हात फिरवला आणि घाटवाटेने पुढच्या प्रवासाला निघालो.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
2) Trek इट »जुन्नरची पर्यटनवाट
मनोज हाडवळे | October 29, 2015
डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती करणारे अनेकदा या डोंगरांच्या जगातून धावणाऱ्या वाटांवरही रमतात. जुन्नरच्या पश्चिमेला अशीच एक वाट या भटकंतीच्या जगात रममाण झाली आहे.
पुणे जिल्ह्य़ातील जुन्नरमध्ये फिरण्यासारखी खूप काही स्थळे आहेत. किल्ले, लेणी, प्राचीन मंदिरे, देवराया, ग्रामीण आदिवासी संस्कृतीचे दर्शन देणारी जंगलांच्या कुशीत विसावणारी गावे असे बरेच काही इथे आहे. अशाच काही स्थळांची भेट घडवणाऱ्या जुन्नरमधील एका वाटेवर आज स्वार होऊयात.
जुन्नरहून आपटाळेमार्गे नाणेघाट आणि पुन्हा नाणेघाटातून घाटघरमार्गे जुन्नरला येणारी ही वर्तुळवाट. शिवनेरीच्या कुशीतून ही वाट निघते. थोडेसे अंतर गेलो, की डोंगरकुशीतील बौद्धकालीन तुळजा लेणी भेटते. तिचे ते कोरीव काम पाहायचे आणि पुन्हा पुढे निघायचे. थोडय़ाच वेळात आपण आपटाळे गावात पोहोचतो. या प्रवासात डाव्या बाजूला दिसणारे वरसुबाईचे डोंगर, आंबे हातविजला जाणारा इंगळूनचा घाट आपली सोबत करत असतो. आपटाळय़ातून २ मार्ग फुटतात. एक दाऱ्या घाटाकडे तर दुसरा आपल्या ठरलेल्या नाणेघाटाकडे जातो.
एव्हाना आपण घाटमाथ्यावरील वातावरण सोडून हळूहळू कोकणचा अनुभव घ्यायला सुरवात केलेली असते. जुन्नरच्या अगदी १५-२० किलोमीटरवर हा कोकणचा अनुभव. तो मनाची अवस्था तरल करून जातो. आजुबाजुला लाल माती, खळाळणारे झरे, देवराया वाटाव्यात अशी घनदाट झाडांची जमावट आणि या सर्वात आपल्याला घेऊन जाणारी ही वळणदार वाट. थोडय़ाच वेळात समोर एक अजस्र डोंगर दिसू लागतो. सगळीकडून २५०-३०० फूट नसíगकरीत्या तुटलेला कडा. या कडय़ावर तटबंदी. अरे हा तर चावंड किल्ला. तोंडातून शब्द बाहेर पडेपर्यंत आपण रस्त्यावरील चावंड पाटीजवळ येतो. उजवीकडे वळायचे आणि जंगल वाटेत हरवून जायचे. ही वाट आपल्याला चावंड किल्ल्याला थोडासा वळसा घालून चावंड गावात घेऊन जाते. डोक्यावरील टोपी पडेल एवढा उंच किल्ला आणि त्यावर चढण्यासाठी असणारी डोंगराच्या पोटात लपलेली वाट पाहून आपण अचंबित होतो. जितका चावंड किल्ला अजस्र, अभेद्य आणि अचल तितकेच सुंदर, निसर्गरम्य असे चावंड गाव.
गडावरची पुष्करणी, खोदीव तळी, अन्य वास्तू पाहायच्या आणि गड उतरत पुढे निघायचे. पुन्हा थोडय़ाच अंतरावर आणखी एक फाटा फुटतो. पूर गावाकडे निघतो. या गावात एक प्राचीन मंदिर दडलेले. कुकडेश्वर! कुकडी नदीच्या उगमस्थळी हे कोरीव मंदिर ९ व्या शतकात कुणा झंज राजाने बांधले. मध्यंतरी पुरातत्त्व खात्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर पाहायचे आणि पुन्हा मुख्य रस्त्याला येत नाणे घाटाकडे कूच करायची.
डावीकडे असणारा शंभूचा डोंगर जणु एखादा किल्लाच वाटावा अशा दिमाखात उभा असतो. मजल दरमजल करत, आजूबाजूचा निसर्ग अनुभवत, छोटे मोठे जलाशय, भाताची शेते आपली सोबत करत आपला प्रवास सुरू असतो. थोडय़ाच वेळात समोर तो नानाचा अंगठा दिसू लागतो. वातावरण स्वच्छ असेल तर उजवीकडे दूरवर भरवगडाची भिंत दर्शन देते. थोडय़ाच वेळात डावीकडे जीवधन किल्ला हसतमुखाने आपले स्वागत करतो. जीवधनचा सोबती वानरिलगी चा सुळकाही आव्हान देत असतो. वेळ असेल तर गडावर जायचे, नाहीतर पुढे निघायचे.
थोडे पुढे आलो, की नाणे घाटाच्या आधीच एकदम तुटलेला कडा आणि खोल दरी मनात धडकीच भरवते. हा अपूर्ण अवस्थेतला गुणा घाट. अजून पुढे गेलो, की नाणे घाटातील उजवीकडचा दगडी रांजण आणि गणेश मंदिर दिसू लागते. पावसाळ्यात इथे बऱ्याचदा धुके असते, त्यामुळे फार लांबचा परिसर दिसत नाही. पण धुक्याचा हा खेळही अनुभवण्यासारखा. नाणेघाट गेल्या २३०० वर्षांपासून महाराष्ट्राच्या आद्य राजा सातवाहनांचे भूषण सांगत आहे. दख्खनच्या तत्कालीन समृद्धीत नाणे घाटाचा फार मोठा वाटा राहिला आहे. त्याच्या या निमुळत्या नाळेतून खाली उतरताच समोर विस्तीर्ण पसरलेले कोकण उभे राहते. तळाशी सर्वत्र हिरवाई पसरलेली. नाणे घाटाची नागमोडी वाट या हिरवाईतून खाली उतरत असते. नाणे घाटातील गुहेत सातवाहनांनी केलेल्या दानधर्मावरचे ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. या परिवारातील सदस्यांची शिल्पेही इथे कोरण्यात आली होती. पण आता त्यांचे अवशेष शिल्लक आहेत. मनात आले तर जीवधनची चढाई करावी, नाणेघाट उतरून खाली जंगल वाट तुडवत कोकणात उतरावे किंवा बाजूच्या भोरांडय़ाच्या नळीने खाली उतरण्याचा आनंद घ्यावा आणि नसेलच काही करायचे तर इथेच नाणे घाटाच्या डोक्यावर निरभ्र आकाशदर्शन करत मुक्काम करावा. जुन्नर शहरापासून नाणेघाट ४५ किलोमीटर दूर आहे. पण मजल दरमजल करत हे अंतर जास्त वाटत नाही.
आता परत फिरताना निमगिरी-हजसरची वाट पकडायची. परतीच्या या वाटेवर नाणेघाटातून साधारण ५ किलोमीटरवर अजनावळे गाव लागते. या निसर्गरम्य गावातील देवराई बघण्यासारखी आहे. आपण पुढे जात राहावे आणि निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण करत राहावी..असाच हा रस्ता. काही अंतर गेलो, की निमगिरी गाव लागते. निमगिरी गावच्या पश्चिमेला डोक्यावर निमगिरीचा किल्ला छत्रछाया धरून अविचलपणे उभा असतो. वेळ असेल तर या गडाचे दर्शन घ्यायचे नाहीतर पुढे मार्गस्थ व्हायचे. परतीच्या या वाटेवर आपल्या एका बाजूला विविध डोंगर रांगा तर दुसऱ्या बाजूला माणिकडोह जलाशय आपली सोबत करत असतो. जलाशयाच्या पलीकडच्या तीरावर दिसणारा चावंडही आपल्यावर करडी नजर ठेवून असतो. नागमोडय़ा वाटेने सरकत असताना वाटेतच अचानकपणे हडसर गाव येते. याच्या डोक्यावरच तो हडसरचा किल्ला. खाली पायथ्यावरूनही त्याची ती अभेद्यता डोळय़ांत भरते. डोंगर कपारीशी लपून बसलेली वाट गडाचे निमंत्रण देते. हाताशी वेळ असेल तर या गडाचीही वारी करायची, अन्यथा पुढे सरकायचे. थोडय़ाच वेळात माणिकडोह धरणाजवळून ही वाट पुन्हा जुन्नर शहरात दाखल होते.
साधारण शंभर किलोमीटरच्या या प्रवासात शिवनेरी, चावंड, जीवधन, निमगिरी, हडसरसारखे किल्ले; तुळजा लेणी, कुकडेश्वर मंदिर, प्राचीन नाणेघाट अशी अनेक गिरिस्थळे त्यांचे दर्शन देतात. छोटी गावे, त्यातील देवराया, भोवतीच्या डोंगररांगा, त्यावरचे जंगल, नद्या, जलाशय असे बरेच काही या वाटेवर भेटते. डोंगररांगा भटकणाऱ्यांसाठी हा सारा भागच वेड लावणारा आहे. मग चला तर!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Trek इट »मांजरसुबा
सुधीर जोशी | August 27, 2015
वर्षां सहल म्हटल्यावर नगर जिल्हा कधी कुणाच्या डोळय़ांसमोर येण्याची शक्यता कमीच आहे. पण या शहराच्याच जवळ असलेला हा मांजरसुबा किल्ला भवतालच्या ओसाड माळावरही या दिवसात वेगळा भासतो.पर्जन्य सहल आणि तीसुद्धा अहमदनगरला म्हटलं तर कोणीही वेडय़ातच काढील, पण खरोखरच नगरच्या अगदी जवळ नगर-वाम्बोरी रस्त्यावरील मांजरसुबा हा किल्ला आणि जवळील डोंगरगणला भेट द्याल तर थक्कच व्हाल. एका नयनरम्य ठिकाणाला भेट दिल्याचा आनंद नक्कीच होतो.जुलै ते सप्टेंबर हा काळ फारच छान. हा किल्ला पूर्वीच्या नगर- औरंगाबाद आणि नगर-मनमाड या दोन्ही व्यापारी आणि लष्करी महत्त्वाच्या मार्गावर मोक्याच्या जागी आहे. दोन्ही मार्गावरील एक एक घाट या किल्ल्याच्या पायथ्याजवळून जातात. टेहळणी आणि घाटमार्गाचे संरक्षण याकरिता अगदी मोक्याची जागा.या किल्ल्याचे खरे नाव ‘मजार-ए-सुबा’ अपभ्रंश मांजरसुबा. साधारणपणे पर्वतीइतकाच उंच. चढण अतिशय सोपी. किल्ला दुर्गम नाही. किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणजे एक चिरेबंदी बांधकामाची आजही सुस्थितीतील इमारत आहे. येथे कचेरी आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे निवासस्थान असावे. या इमारतीच्या गच्चीवर जाता येते. येथून दूरवरचा प्रदेश निरखता येतो. या किल्ल्यावर एक भव्य दुमजली महालही आहे, पण आज तो पूर्णपणे पडलेला आहे. पणत्याच्या भिंती तो किती देखणा असावा याची साक्ष देतात. हे निजामशाहीतील बांधकाम नगरमधील ‘फरहाबाग’ या सुंदर राजवाडय़ाशी साम्य दाखवते.आपले स्वत:चे वाहन असल्यास आपण फरहाबाग या ऐतिहासिक महत्त्वाच्या व सुस्थितीतील वास्तुलाही याच सहलीत भेट देऊ शकता. या किल्ल्याचे वैशिष्टय़ म्हणजे येथील जलतरण तलाव आणि हमामखाना. आज ह्य़ा हमामखान्याची पडझड झाली आहे. पण एक गोष्ट जाणवते की नगरसारख्या निपाणी प्रदेशात आणि तेसुद्धा टेकडीवर हमामखाना आणि जलतरण तलाव कसा? आणि हेच येथील नवल आहे. या टेकडीच्या उत्तरेला पावसाचे पाणी अडवून त्याची साठवण टाकी खोदून केलेली आहेत. याकरिता निजामशाहीत अरबस्तानातून जलसंधारणतज्ज्ञ बोलावले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अहमदनगरमधील पाणीपुरवठा योजना अमलात आली. उत्तरेकडील रंगमहालातील मोटेच्या सहाय्याने हे पाणी उचलले व खेळवले जाई. आजही येथे मुबलक पाणीसाठा असतो. या पाणसाठय़ाकडे जाण्यास एक भुयारी जिना असून पुढे डोंगरकडय़ाच्या बाजूने अवघड रस्ता आहे. किल्ल्याच्या एकंदरीत परिस्थितीवरून हे लष्करी ठाणे तसेच विलासक्रीडा स्थान असावे. किल्ल्याच्या वरील व पायथ्याशी असलेल्या छोटेखानी पठारांवर ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये अनेक रंगीबेरंगी रानफुलेही आढळतात.या किल्ल्याच्या पायथ्याजवळील डोंगरघळीत विसावले आहे निसर्गरम्य निवांत ठिकाण डोंगरगण. येथे एक जागृत शिवमंदिर आहे. येथे श्रावणात यात्रा भरते. येथे पावसाळ्यातील पाण्याचे प्रवाह आणि  छोटेखानी धबधबा आपल्याला सुरक्षित जलक्रीडेचा आनंद देतात. येथे असलेल्या एका गुंफेला सीतेची न्हाणी म्हणतात. येथेही आपल्याला फार चढउतार करावी लागत नाही. अहमदनगर परिसरात पाऊस फारच कमी असतो, पण ही वर्षांसहल मात्र नक्कीच संस्मरणीय होईल. याशिवाय अहमदनगरमध्ये अनेक सुंदर ऐतिहासिक ठिकाणांनाही आपण भेट देऊ शकतो.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
3) Trek इट »मुशाफिरी : आंबवडे
अभिजित बेल्हेकर | August 6, 2015
वर्षां सहलींना सध्या गती आली आहे. यामध्ये कुटुंबासह जाऊन पाहण्याजोगी आणि शांततेचा स्पर्श देणाऱ्या स्थळांच्या शोधार्थही अनेक जण असतात. अशांसाठीच पुणे जिल्हय़ातील भोर तालुक्यातील आंबवडे गाव खूप काही देऊनजाईल.
पाऊस कोसळू लागला, की ज्या काही ठिकाणांची आठवण होते त्यामध्ये पुणे जिल्हय़ातील रायरेश्वर ही अशीच एक हमखास जागा. वर्षां ऋतू सुरू झाल्यावर एकदा तरी या रायरेश्वराच्या पठारी जाणे होते. या प्रत्येक वेळी धावताना आणखी एक जागा मध्येच अडवते. पायांना बांधून ठेवते आणि मनाला भुरळ पाडते. ती म्हणजे आंबवडे!
हिरडस मावळातील हे एक छोटेसे गाव. डोंगरदरीत, हिरवाईच्या कुशीत पहुडलेले. गावाला खेटूनच एक खळाळता ओढा वाहतो. या ओढय़ाच्या काठावर दाट झाडीत एक प्राचीन शिवालय दडले आहे आणि या साऱ्यांच्या सहवासात कधीही गेलो, तरी केवळ नीरव शांतता आणि भरून राहिलेली प्रसन्नताच अनुभवायला मिळते!
..आंबवडेची ही अनुभूती गेली कित्येक वर्षे हृदयात साठवलेली आहे. म्हणून तर दरवर्षी वर्षांकाळ सुरू झाला, की रायरेश्वराच्या वाटेवर निघायचे आणि वाटेतील या आंबवडय़ात अडकायचे असा जणू नियम झाला आहे.
भोरपासून १० किलोमीटरवर हे आंबवडे गाव. इथपर्यंत येण्यासाठी भोरवरून एसटीची सोय आहे. डोंगरदरीतली ही वाट हिरवाईची सोबत करतच निघते. पावसाने सारा भवताल भिजून चिंब झालेला असतो. रस्त्याकडेला खाचरांमध्ये तरारलेला भात त्याचा गंध उधळत असतो. या अशा धुंदीतच आंबवडय़ाला पाय लागतात आणि मनातील ते स्वप्न सत्यात उतरलेले दिसू लागते.
खळखळत्या ओढय़ाच्या काठावर शांतपणे पहुडलेले ते गाव. ओढय़ाच्या पलीकडच्या तीरावर घट्ट झाडी आणि या झाडीतच दडलेले ते नागेश्वराचे प्राचीन शिवालय. नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या एखाद्या सरीने स्वच्छ-ताजे झालेले हे दृश्य. त्याला पाहताच शरीराआधी मन चिंब भिजून जाते.
या दृश्यातील ते ओले रंग अनुभवण्यासाठी निघावे तो अगदी सुरुवातीलाच एक कमान आपले स्वागत करत पुढय़ात येते, ‘सर जिजिसाहेब सस्पेंशन ब्रिज’! आंबवडय़ाचे पहिलेच नवलविशेष!
आंबवडे हे भोरचे संस्थानिक पंतसचिव यांचे गाव. या संस्थानचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी गावातच आहे. ही समाधी आणि नागेश्वर मंदिर या संस्थानकाळच्याच आठवणी. ही दोन्ही स्थळे ओढय़ाच्या पलीकडे. या पैलतीरी जाण्यासाठीच कधी संस्थानकाळी हा झुलता पूल इथे आकारास आला. आंबवडय़ात शिरणाऱ्या प्रत्येक पावलांचा काही काळ इथे या झुलत्या पुलावर रेंगाळतो.
आंबवडे गावाशेजारून वाहणारा हा ओढा म्हणजे छोटीशी नदीच आहे. चांगली रुंदी आणि खोली. म्हणून मग हे पात्र ओलांडण्यासाठी १९३६ साली या झुलत्या पुलाची उभारणी केली. याची रुंदी ४ फूट तर लांबी दीडशे फुटांच्या घरात आहे. पुलाच्या दोन्ही अंगास रेखीव कमानी आहेत. त्यावर पुलाच्या बांधकामाचे तपशील सांगणारे लेख आहेत. माथ्यावर ‘ओम’ हे शुभचिन्ह कोरलेले आहे.
हा झुलता पूल भोर संस्थानचे राजे श्रीमंत रघुनाथराव शंकरराव पंडित पंतसचिव यांनी आपली आई श्रीमंत जिजिसाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधला. यासाठी त्या वेळी १० हजार रुपये खर्च आला. १५ नोव्हेंबर १९३७ रोजी मिरजेचे राजे सर गंगाधरराव ऊर्फ बाळासाहेब पटवर्धन यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या साऱ्या तपशिलाची नोंद या पुलाच्या दोन्ही बाजूकडील स्वागत कमानींवर घेतलेली आहे.
झुलत्या पुलाचा तपशील वाचला, की त्याच्यावरचे हे चालणे, हलणे आणखी मजेशीर वाटू लागते. ही गंमत अनुभवायची आणि पलीकडच्या तीरावर दाखल व्हायचे. अगदी सुरुवातीला आपण समाधी परिसरात येतो. एका मोठय़ा इमारतीत मधोमध भोरच्या राजाची, शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. छत्रपती संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या सीमांचे रक्षण करण्यात या पंतसचिवांचा मोठा वाटा होता. या समाधीशेजारीच संस्थानच्या राणीसाहेब जिजिसाहेब यांचा अर्धपुतळा आहे. ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांनी घडवलेला हा पुतळा पाहण्यासारखा आहे. या अशा स्मारकांच्या केवळ दर्शनातूनही इतिहासाच्या त्या पर्वात बुडायला होते.
या स्मारकाशेजारूनच एक वाट नागेश्वराकडे उतरते. हे मंदिर थोडेसे खोलगट भागात आहे. जुन्या मोठाल्या वृक्षांच्या गर्दीतूनच एक पायरी मार्ग वळणे घेत या नागेश्वरासमोर दाखल होतो. मोठा फरसबंदी प्राकार, भोवतीने तट, ओवऱ्या, पाण्याची कुंडे, पाण्याचे वाहते प्रवाह आणि या साऱ्यांच्या मधोमध उभे असलेले नागेश्वर मंदिर! एखादा नायक असावा असे.
दूरवरूनच ही रचना लक्ष वेधून घेते. पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर एका उंच जोत्यावर उभे आहे. मंदिराच्या दर्शनी भागावरच एक लेख लावलेला आहे. ज्यामध्ये नागसंस्कृतीतील लोकांचा हा देव असून, या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केल्याचा अल्लेख आहे.
मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वाराभोवती नाजूक शिल्पकाम केलेले आहे. आतील स्तंभही शिल्पकलेने नटलेले आहेत. बाहय़भिंतीवर उमलती कमळे, झाडांच्या पानांचे नक्षीपट उठवण्यात आले आहेत. हत्तीवर अंबारीत स्वार झालेली कुणी राजमान्य व्यक्ती, शरभ, मोर आदी शिल्पांची रचना आहे. शिखरही असेच कोरीव. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराच्या मागील पूर्व अंगासही एक कोरीव दरवाजा असल्याचा भास होतो. पण जवळ गेल्यावर तो त्या स्थापत्याचाच एक भाग असल्याचे समजल्यावर उडायला होते.
आंबवडय़ाला वळसा घालत निघालेला तो ओढा इथे नागेश्वराजवळ एखाद्या धबधब्याप्रमाणे उडय़ा घेत धावत असतो. जवळ गेल्यावर त्याच्या तुषारांमध्ये भिजायला होते. पावसाळय़ातील त्याचे हे विराट रूप पाहण्यासारखे असते.
ओढय़ाचा हा खळखळाट अनुभवत मंदिर प्राकारात यावे तो ती नीरव शांतता पुन्हा स्पर्श करू लागते. मंदिराभोवती पाण्याच्या कुंडांची रचना आहे. ज्यातून पाण्याचे अनेक प्रवाह मंदिराभोवती खेळते आहेत. पाण्याच्या या प्रवाहांनाही एक नाद असतो.
भोवतीची गर्द झाडी, त्यातील पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचे खेळते प्रवाह आणि या साऱ्यांच्या मधोमध उभा नागेश्वराचा तो प्राकार! हे सारे पाहता-अनुभवताना चित्त एकाग्र होऊ लागते. आपल्या या समाधीला, या शांत अनुभूतीला गाभाऱ्यातील तो घंटानाद खोलवरची कंपने पुरवत असतो. मध्येच पावसाची एखादी सर येते. तिच्या पाठी दरीत कोंडलेले ढगही उतरतात आणि सारेच चित्र धूसर होते. त्या धूसरपणात दिसणाऱ्या आकृतीलाही एक गूढता असते.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
4) Trek इट »रतनवाडीचा अमृतेश्वर
अभिजित बेल्हेकर | June 18, 2015
निसर्ग भटक्यांसाठी सदैव आकर्षण ठरणारा भाग म्हणजे नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगलझाडी, घाटवाटा, गडकोट, जलाशय अशा या विविधतेने हा भाग समृद्ध आहे. या मांदियाळीतच रतनवाडीचे अमृतेश्वराचे कोरीव राऊळही भटक्यांची पावले जखडून ठेवत असते.
अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसर, रंधा धबधबा ही स्थळे आता पर्यटकांच्या चांगल्याच परिचयाची बनली आहेत. पण या भागाचे खरे सौंदर्य हे या धरणाच्या पल्याडच्या भागात दडले आहे. घाटमाथ्यालगतच्या या भागात उंच डोंगररांगांनी एक वेगळाच खेळ मांडला आहे. या खेळात आहेत आकाशात घुसलेले उंच पर्वत-सुळके, कोकणात कोसळणारे खोल कडे, देशावर चढणाऱ्या अनेक घाटवाटा, रतन, अलंग, कुलंग आणि मदन सारखे गडकोट, सर्वोच्च स्थानी विसावलेली ती कळसुबाई, या साऱ्यांवर पसरलेली दाट वनसंपदा, जीवसृष्टी, छोटी-छोटी आदिवासी खेडी, त्यांची संस्कृती आणि या साऱ्या रहाळावर लक्ष ठेवून मधोमध विसावलेला तो रतनवाडीचा अमृतेश्वर!
भंडारदरा पुण्याहून २०० तर मुंबईहून १८० किलोमीटरवर. या दोन्ही ठिकाणांहून भंडारदऱ्यापर्यंत थेट एसटी बससेवा आहे. या भंडारदऱ्याच्या जलाशयावर आलो, की निळाशार जलाशयाभोवतीचा डोंगरदऱ्यांचा हा सारा खेळ समोर उभा राहतो. खरेतर हाच भाग हिंडण्या-फिरण्याचा, निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा, इथला इतिहास जागवणारा. या देखाव्यात शिरायचे असेल, तर धरणाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूने गेलेल्या वाटांवर स्वार व्हावे. या दोन्ही वाटा बरोबर मध्यावर असलेल्या घाटावरच्या घाटघरला जाऊन मिळतात. यातल्या डाव्या हाताच्या वाटेवर आहे रतनवाडी आणि या वाडीत दडले आहे एक देखणे कातळशिल्प अमृतेश्वर! भंडारदरा ते रतनवाडी हे अंतर आहे वीस किलोमीटर. वाडीपर्यंत एसटी बसही धावते. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा हा भाग आहे. वाडीकडे निघालो, की सुरुवातीला पाबरगड, घनचक्कर हे ओळखीचे डोंगर हाक देतात. त्यांच्या नंतर मग रतनगड उगवतो त्याच्या त्या खुट्टा नावाच्या सुळक्याला घेत. या खालीच गडाची रतनवाडी. तसे वाडीत येण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. भंडारदऱ्याहून धरणाच्या आतील भागात ये-जा करण्यासाठी लाँच-बोटी धावतात. यातील एकात बसायचे आणि आपल्या भाषेत रतनवाडीचा स्टॉप सांगायचा. कुठल्याही मार्गे आलो, तरी या भागाला पाय लागण्यापूर्वी त्या निळय़ा जलाशयाच्या पाश्र्वभूमीवर काठावरचा अमृतेश्वर, मागची छोटीशी रतनवाडी, त्यामागचा रतनगड, त्याच्या शेजारचा खुट्टा हे सारे निसर्गचित्र पाहणाऱ्याला गुंतवून टाकते. यातून त्या अमृतेश्वराबद्दलची उत्कंठा वाढते आणि मग या धुंदीतच त्या कोरीव वास्तू प्राकाराला आपण सामोरे जातो.
जलाशयाच्या काठावर एखाद्या गायीने पाय दुमडून बसावे तसे हे मंदिर दूरवरून दिसते. जवळ जाऊ तसे त्याचे कोरीव देखणेपण, सुडोल रचना मन खेचू लागते. नंदीमंडप, गाभारा, सभामंडप आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिरास पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूने प्रवेशद्वारे आहेत. मंदिर वास्तुशैलीतील हे नवलविशेष याच भागातील सिद्धेश्वर (अकोले), हरिश्चंद्रेश्वर (हरिश्चंद्रगड) येथेही पाहण्यास मिळते. या आगळय़ा शैलीमुळे नंदीमंडपातून गाभारा आणि त्यानंतर सभामंडप असा आपला प्रवास होतो. आत शिरताच इथले कोरीवपण आपला ताबा घेते. नक्षीदार खांब, कोरीव प्रवेशद्वारे, बाह्य़ भिंतीवरील विविध भौमितीक रचना, आतील भिंतीवरील मूर्तिकाम, छतावरील शिल्पपट हे सारे एकेक करत मंत्रमुग्ध करू लागते. या साऱ्यांवर पुन्हा ते यक्ष, अप्सरा, गंधर्व स्वार झालेले असतात. देव, दानव आणि नरांनीही इथे आपआपली जागा पटकावलेली असते. मैथुन शिल्पेही इथे आहेत. यातील तो समुद्रमंथनाचा देखावा तर अवश्य पाहावा असाच. आतील स्तंभ भरजरी आहेत. गर्भगृहाच्या दारी कीर्तिमुख, शंख, कमळवेलींच्या पायघडय़ा घातल्या आहेत. मंदिरात प्रकाश येण्यासाठी जागोजागी दगडी जाळय़ांची रचना केलेली आहे. सारेच विलक्षण! एखादा लेण्यात फिरल्यासारखे!!
या मंदिराचे शिखरही तेवढेच कोरीव, श्रीमंत! जाळीदार नक्षीचे उभे थर, त्यावर पुन्हा शिखरांच्या छोटय़ा प्रतिकृतींची रचना, समोरच्या बाजूस शूकनास..प्राचीन स्थापत्यातील ‘नागर शैली’ अमृतेश्वराच्या देहबोलीवर जागोजोगी विसावलेली. या साऱ्या सौंदर्याचे रसपान करता करता आपल्याच मनाचा गोंधळ उडतो. मग अशा या गोंधळलेल्या अवस्थेतच अमृतेश्वराचे दर्शन घ्यायचे. खरेतर अमृतेश्वराची ही शिवपिंडीही कोरीव अशा पाच थरांपासून बनवलेली होती. पण कुणाच्या तरी डोक्यात खुळ आले आणि त्यांनी देव जुना झाला म्हणून हे दगड बाजूला करत त्या जागी नव्या शिवलिंगाची स्थापला केली. अमृतेश्वराचे दर्शन घेत पुन्हा बाहेर येत त्याच्यावर प्रेमाने नजर फिरवावी. या राईत एखादे रानफुल उमलावे तसे हे मंदिर भासते. त्या जलाशयाच्या काठावर आणि या कोरीव शिल्पासवे खूप सुखद, शांत आणि समृद्ध वाटू लागते. वैशाखाचे तप्त ऊन खात आलेल्या पावलांचा सारा क्षीण नाहीसा होतो. अमृतेश्वराचे दर्शन झाले तरी खरे ‘अमृत’ मात्र अजून आपल्या प्रतीक्षेत असते. मंदिरातून वाडीच्या दिशेने निघावे. शेतीवाडीतून जाणाऱ्या या वाटेवर थोडे अंतर गेलो, की जमिनीलगत साकारलेली एक जलवास्तू तिच्या सौंदर्यात बुडवून टाकते. पुष्करणी! नावाप्रमाणेच सुंदर! आपल्याकडे आड, विहीर, तलाव, तळी, टाकी अशी पाण्याशी नाते सांगणाऱ्या अनेक वास्तू आहेत. या साऱ्यांतील देखणी, कोरीव श्रीमंती लाभलेली वास्तू म्हणजे पुष्करणी! देवांचा सहवास लाभलेली ही जलवास्तूची निर्मितीही त्या देवांसाठी. प्राचीन मंदिराच्या भवतालात ही अशी पुष्करणी हमखास दिसणार. या पुष्करणीची निर्मितीही या अमृतेश्वराच्या रहाळात झालेली. सौंदर्य आणि पावित्र्य यांचा एकत्रित मिलाफ असलेला मंदिरानंतरचा हा दुसरा वास्तुप्रकार. त्याच्या ‘पुष्करणी’ या शब्दाएवढाच दुर्मिळ!
अमृतेश्वराची ही पुष्करणी तब्बल वीस फूट लांब-रुंद. जमिनीलगत कोरीव, आखीव-रेखीव अशी तिची रचना. एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या. आत फिरण्यासाठी धक्के ठेवलेले. भोवतीच्या भिंतीत सालंकृत अशी बारा देवकोष्टकांची रचना केलेली. त्यांच्या डोईवर पुन्हा छोटय़ा-छोटय़ा कोरीव शिखरांची रचना. या कोष्टकांमध्ये गणेशाची एक मूर्ती सोडल्यास उर्वरित सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार विसावलेले. ही सर्वच शिल्पे पुन्हा सालंकृत. ही जलवास्तू जेवढी देखणी, तितक्याच नितळ पाण्याचीही तिला साथ मिळालेली. यामुळे की काय अमृतेश्वराच्या त्या भव्य शैल मंदिराने जसे सारे अवकाश व्यापल्यासारखे वाटते तेच सारे निळे रंग इथे या पाण्यावर विश्रांतीला आल्यासारखे वाटतात. कुठल्याही स्थापत्याला असे निसर्गाचे कोंदण मिळाले, की ते अजून खुलते. प्रसन्न होते. स्थानिक लोक या पुष्करणीला विष्णूतीर्थ म्हणतात आणि समुद्रमंथनाच्या चौदा रत्नातून हे मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा ऐकवतात. या कथांमधून बाहेर येत खरा इतिहास शोधू लागलो, की आपल्याला दहाव्या शतकातील झंज नावाच्या राजाजवळ येऊन थांबावे लागते. या झंज राजाने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या प्रमुख बारा नद्यांच्या उगमस्थळी एकेका सुंदर शिवालयाची निर्मिती केली. यातील प्रवरा नदीच्या उमगस्थळीचे हे अमृतेश्वर!
पूर्वजांच्या या कलासक्तीचे कधी-कधी खूप कौतुक वाटते. ..आज हजार एक वर्षे उलटून गेली. काळही बराच पुढे सरकला. इथले हे निर्माणही आता एक इतिहास झाला. इथल्याच निसर्गाचा एक भाग बनला. अगदी त्या डोंगर-झाडी, निर्झर पाण्याप्रमाणे..!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Trek इट »जयगडची सफर
गीता सोनी | May 7, 2015
गणपती पुळय़ाला अनेक जण जातात. पण या पुळय़ाच्या परिघातच अनेक आडवाटेवरची प्रेक्षणीय स्थळे दडलेली आहेत. यातीलच जयगड परिसरातील स्थळांची ही सफर ..
रस्त्याच्या उजव्या बाजूला लालसर जांभ्या दगडाचे कातळ, डाव्या बाजूला हाताच्या अंतरावर अथांग पसरलेला शब्दश: निळाशार समुद्र, किनाऱ्यावरची हिरवीगार दाट झाडी, त्यातून मधूनच डोकावणारे उतरत्या कौलारू लाल छपरांचे पुंजके, समुद्रातील पाण्याला समतल उडणारे पांढरे शुभ्र सी-गल्स आणि या ‘लाइव्ह’ निसर्गचित्राचा ‘गेटअप’ वाढवणारे काळेभोर गुळगुळीत नागमोडी रस्ते. अगदी बरोबर ओळखलत, हे सारे वर्णन आहे आपल्या कोकणाचे आहे.
गेल्याच आठवडय़ात धावत पळत केलेल्या कोकणभेटीत याहूनही कितीतरी अनुपम निसर्गसौंदर्य आमची साथ करीत होते. श्रीगणपती-पुळे आणि रत्नागिरी टापूतील ठरावीक प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यावर आम्ही काही हटके ठिकाणांकडे मोर्चा वळविला होता. यातच काही हाताशी गवसली.
जयगडची ओळख खरेतर आपल्याला शालेय पुस्तकांतच झालेली आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या इतिहासापासूनच आम्ही हे नाव वाचत आलो आहोत. प्रसिद्ध देवस्थान असलेल्या गणपती पुळय़ापासून हे ठिकाण अवघे अठरा ते वीस किलोमीटरवर. शास्त्री नदी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते अशा खाडीकाठावर हा जयगड उभा आहे.
जवळ येताच त्याची तटबंदी खुणावू लागते. त्याची भक्कम तटबंदी आजही शाबूत आहे. आत शिरताच त्याचे ते वास्तुवैभव भुरळ पाडू लागते. सभोवती उंच तटबंदी, त्यावर वर-खाली करण्यासाठी बांधलेले उंच दगडी जिने अजूनही उत्तम अवस्थेत आहेत. तटबंदीवरून टेहाळणी करण्यासाठी बांधले गेलेले झरोके, बुरूज सुस्थितीत आहेत. तटावरून फिरताना गडाभोवतालच्या तीनही बाजूंस पसरलेला समुद्र, वाळूचा किनारा, नारळाच्या झाडांची दाटी हे सारे ‘दिल खुश’ करून टाकते.
किल्ल्यात मध्यभागी हनुमान आणि गणपतीचे मंदिर आहे. जवळच एक पडका वाडाही आहे. ही वाडय़ाची वास्तू मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांची असल्याचे सांगितले जाते. या गडाचे बांधकाम अंदाजे सतराव्या शतकात, आदिलशाही राजवटीत झाले. पुढे हा किल्ला मराठा आरमारात सामील झाला आणि शेवटी सन १८१८ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला असे इतिहास सांगतो.
या किल्ल्याच्या नावाबद्दलही एक आख्यायिका इथे सांगितली जाते. किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना, कामात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून नरबळी देण्याचे ठरले. यासाठी ‘जयबा मल्हार’ नावाच्या व्यक्तीने स्वेच्छेने प्राणार्पण केले. यामुळे त्यांच्या सन्मानार्थ गडाचे नाव ‘जयगड’ असे निश्चित झाले.
तसा विचार केला तर पाहणाऱ्याला जयगड ही एखादी पडकी वास्तू वाटेल. पण आपल्या मराठी मनांसाठी मात्र अशा वास्तू केवळ इमारती नसतात. तिथे पाय ठेवता क्षणीच आपल्यातील इतिहास जागा होतो. कधी काळी या मातीला झालेला शिवरायांचा पदस्पर्श, इथे घुमलेले त्या पराक्रमी मावळ्यांचे ‘हर हर महादेव’चे नारे हे सारे आठवू लागते. हा सारा थरार अनुभवण्यासाठी तरी आपण जयगड किल्ला पाहायला हवा.
या किल्ल्यापासून जवळच असलेले, लाल-पांढऱ्या रंगातील ब्रिटिशकालीन जयगडचा दीपस्तंभही पाहाण्यासारखा आहे. सन १९३२ मध्ये ब्रिटिशांनी याची रचना व बांधकाम केले. अजस्त्र महाकाय लोखंडी पाया असलेल्या या दीपगृहाचा वरील भाग पितळेचा आहे. साधारण ८२ वर्षांपूर्वी उभारलेल्या या ‘लाइट हाउस’ची तत्कालीन रचना व यंत्रणा इतकी अद्ययावत आहे, की आजही ती कार्यरत आहे. हे दीपगृह पर्यटकांना पाहण्यासाठी खुले आहे. कोकण किनारपट्टीवरील समुद्री पर्यटनस्थळांना एक वेगळे वैशिष्टय़ प्राप्त करून देणाऱ्या या दीपगृहांची रचना व कार्य अभ्यासणे हे जिज्ञासू पर्यटकांना निश्चितच रोचक वाटू शकेल.
जयगड गावापासून चारपाच किलोमीटर अंतरावर असलेले कऱ्हाटेश्वर शिवमंदिर देखील पाहण्यासारखे आहे. हे पूर्णपणे लाकडी बांधकामाचे देऊळ एका तुटक्या कडय़ावर असल्यासारखे भासते. मुख्य म्हणजे मंदिरामागे असलेल्या साठसत्तर पायऱ्या उतरून गेल्यावर दिसणारा काळा दगडी कातळ, समोरचा निळा फेसाळणारा समुद्र, नारळीची झाडे, तिथे मिळणारा शांत एकांत, हवेचा प्रसन्न ताजेपणा हे सारे फक्त अनुभवण्यासारखेच आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Maharashtra Times
हैदराबाद म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या एका श्रीमंत राज्याची राजधानी. अर्थातच त्यामुळे तिचा डौलही तिला साजेसा असणारच. मोत्यांचं शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या या शहरांत बरीच पर्यटनस्थळं आहेत. स्मारकांपासून ते संग्रहालयापर्यंत आणि बगिच्यापासून फिल्मसिटीपर्यंत खूप काही इथं आहे. वर्षाअखेरीस एखादा छोटासा हॉलिडे प्लॅन करत असाल तर हैदराबाद हा बेस्ट पर्याय आहे. 
गोवळकोंडा किल्ला - गोवळकोंडा हा भारतातला एक प्रसिद्ध किल्ला. गोवळकोंडा म्हणजे मेंढपाळाचा किल्ला. मुळात हा मातीचा किल्ला होता त्यानंतर कुतूबशाही घराण्यानं हा किल्ला पुन्हा मजबूत बांधला. हैदराबादपासून ११ किलोमीटर्सवर हा किल्ला आहे. इथला परिसर सुंदर आहे. जुन्या काळातल्या महालांचे अवशेष, भल्यामोठ्या तोफा, मोठाले दरवाजे बघण्याजोगे आहेत. गोवळकोंडा किल्ल्याची माहिती लाईट व साऊंड शोच्या माध्यमातून सांगितली जाते. 
चारमिनार व मक्का मशीद - चारमिनार हे हैदराबादमधलं एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. या चार मिनारांभोवती हे शहर वसवलेलं आहे. ४८.५ मीटर्स उंच असे चार मिनार आहेत. आत ४५ प्रार्थनास्थळं आहेत व एक मशीद आहे. मक्का मशीद ही हैदराबादमधील सर्वात जुनी मशीद. मक्कामधल्या मातीच्या विटा यासाठी वापरल्या गेल्या असल्याचं सांगितलं जातं. म्हणून त्याला मक्का मशीद असं नाव दिलं आहे.
बिर्ला मंदिर- व्यंकटेश्वराचं हे मंदिर आहे. हे मंदिर सफेद मार्बलचा वापर करून बांधण्यात आलं आहे. इथली मूर्ती ही तिरुपतीच्या मूर्तीसारखी आहे. 
सलार जंग संग्रहालय- सलारजंग हे एक सुंदर वस्तूसंग्रहालय आहे. हे संग्रहालय मुसी नदीकाठी आहे. प्राचीन काळातली हस्तलिखितं इथे पाहायला मिळतील. पर्शिअन कारपेट्स, चिनी बनावटीच्या अनेक वस्तू इथे आहेत. राणी नूरजहाँच्या कट्यारी आणि राजांच्या तलवारींचं खास कलेक्शन आहे. 
हुसैन सागर- हुसैन सागर हा खूप मोठा तलाव आहे. इथून दिसणारं सुंदर दृश्य व बोटिंगची सुविधा यामुळे पर्यटकांची इथे खूप गर्दी होत असते. बुद्धाचा अखंड पुतळा तलावाच्या मध्यभागी आहे. तलावाच्या भोवती एनटीआर गार्डन, नेकलेस रोड, लुंबिनी पार्क अशी बरीच बघण्याजोगी ठिकाणं आहेत. ही गार्डन्ससुद्धा अतिशय सुंदर आहेत. 
चाऊमोहल्ला राजवाडा - अठराव्या शतकातला निजामाचा हा राजवाडा अतिशय सुंदर आहे. युनेस्को एशिया पॅसिफिक पुरस्कार अलीकडेच त्याला देण्यात आला होता. भव्य व वेगळ्या स्टाईलने बांधलेला हा राजवाडा सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आला असला तरी अजूनही त्याचा दिमाख कायम आहे. इथे चार युरोपियन व मुघल पद्धतीचे महाल आहेत. सुरूवातीला ४५ एकर्सवर असलेला हा राजवाडा आता १२ एकर्सवर उरला आहे. 
रामोजी फिल्मसिटी - जवळपास दोन हजार एकरांवर पसरलेली, जगातली सर्वात मोठी फिल्मसिटी अशी याची ओळख आहे. या फिल्मसिटीमध्ये निसर्गरम्य आणि कृत्रिम आकर्षणंही अनेक आहेत. हिंदी, दाक्षिणात्य अशा शेकडो चित्रपटांचं चित्रीकरण इथे झालेलं आहे. एक संपूर्ण दिवस यासाठी राखून ठेवावा असं हे ठिकाण आहे. 
नेहरु झूऑलॉजिकल पार्क - तीनशे एकरांवर पसरलेलं हे उद्यान निसर्गप्रेमींनी जरुर भेट द्यावी असं आहे. जवळपास २५० प्रजातींचे प्राणी-पक्षी इथे पाहायला मिळतात. इथे असलेल्या प्राण्यांना शक्य तितक्या त्यांच्या नैसर्गिक वातावरणात ठेवण्यात आलं आहे. सफारी पार्क, नॅचरल हिस्ट्री संग्रहालय असे अनेक पर्याय उपल्ध आहेत. 
शॉपिंग स्पेशल - हैदराबाद हे शॉपिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. या शहरात वेगवेगळे बाजार आहेत. इथल्या प्रत्येक बाजाराची खासियत वेगळी आहे. फळबाजार, ‌बांगड्यांचा बाजार, पुस्तकांचं मार्केट, अत्तर बाजार असे अनेक बाजार इथे आहेत. 
संकलन - शामल कांबळे, कॉलेज क्लब रिपोर्टर
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
5) Maharashtra Times
नागपूरजवळची वन डे डेस्टिनेशन!
ताडोबा, नागझिरा, नवेगावबांध, बोर, लोणार, चिखलदरा अशी अनेकानेक स्थळे विदर्भाचे मानबिंदू आहेत. पण, त्याव्यतिरिक्तही बरीच स्थळे पावलापावलावर भेटतात. नागपूरच्या शंभर किलोमीटरवर अशीच असंख्य स्थळे आहेत. दिवाळीच्या आठवड्याभराची सुट्टी एक दिवसावर आलेल्यांसाठी हे पर्वणी ठरतात. निसर्ग, सोशल, धार्मिक पर्यटनाची भूक भागवितात. त्यातीलच काही निवडक स्थळांचा हा धावता आढावा.
आंभोरा
ब्रह्मगिरी पर्वतावर पाच नद्यांच्या संगमस्थळी वसलेले श्री क्षेत्र आंभोरा पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे. नागपूरपासून पाचगाव, डोंगरगाव, कुही, वेलतूर मार्गे ८० किलोमीटर तर भंडाऱ्यापासून केवळ १८ किलोमीटर हे स्थळ आहे. वैनगंगा, कन्हान, आंब, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांचा संगम येथे आहे. सृष्टीसौंदर्याने नटलेला परिसर हे स्थळाचे वैशिष्ट्य आहे. टेकडीवर चैतन्यश्वराचे जाज्वल्य मंदिर आहे. चहूबाजूंना नद्यांचे मोठे पात्र, संगम, पहाड, टेकडी, हिरवीगार वनराई असे मनोहर दृश्य पाहताना माणूस क्षणभर दु:ख विसरून जातो.
मनसर
नागपूरपासून ४५ किमी अंतरावरील मनसरला पुरातत्वदृष्ट्या महत्त्व आहे. या ठिकाणाला गाव म्हणावे की किमया? भावनांच्या रंगपत्रात एकेका स्वप्नांचे कुंचले बुडवून विधात्याने 'मनसर' चितारले आहे. वाकाटक, सातवाहन काळातील समृद्ध संस्कृतीने हे ठिकाण संपन्न केले आहे. इथल्या कणाकणांवर निसर्गाने आपली सुबत्ता पांघरून ठेवली आहे. हा खजिना जरूर पहावा. येथून जवळच रामधामही आहे.
नगरधन
नगरधन हा 'भुईकोट' प्रकारातील एक किल्ला आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास जुना इतिहास आहे. रामटेकपासून सुमारे सात किमी तर नागपूरपासून ३४ किमी अंतरावर हा किल्ला आहे. ही जागा प्राचीन काळात 'नंदीवर्धन' म्हणून ओळखल्या जात होती. नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे. नगरधनच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. हौशी पर्यटकांनी भूक भागविण्यासाठी हा किल्ला सक्षम आहे.
पेंच
जैविक विविधतेने नटलेले पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर-जबलपूर मार्गावर ८० किलोमीटर अंतरावर आहे. वाघोबासोबत विविध प्राणी, पक्षी पाहण्याची सोय येथे आहे. पेंच नदीवर तोतलाडोह येथे एक विशाल बांध आहे. या धरणाचे पाणी ७७ किलोमीटर परिसरात पसरले आहे. आदिवासींचे जीवन जवळून न्याहाळण्याची सोयही येथे आहे. पेंचला गेल्यानंतर अंबाखोरी दुर्लक्षित राहू नये याचीही खबरदारी घ्यावी.
आदासा
नागपूरपासून ३७ किमी अंतरावरील आदासा येथे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे मंदिर आहे. कळमेश्वर आ धापेवाडामार्गे येथे जाता येते.
कुँवारा भीवसेन
नागपूरपासून ६४ किमी अंतरावर पारशिवनी तालुक्यात हे स्थळ आहे. हे स्थळ गों‌ड आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. येथे मोठी गर्दी होते. पेंच नदीच्या काठावर हे स्थळ आहे. त्यामुळे श्रद्धेला पर्यटनाचे महत्त्व प्राप्त होते.
नवेगाव खैरी
पारशिवनीपासून जवळच नवेगाव खैरी हे पर्यटनस्थळ आहे. येथील तलावाच्या चारही बाजूंनी वनसंपदा असल्याने येथे पर्यटकांची गर्दी होते. पक्षीप्रेमींसाठी हे एक उत्कृष्ट स्थळ ठरते. हे स्थळ नागपूरपासून ६४ किलोमीटर अंतरावर आहे.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल
नागपूरपासून २१ किलोमीटर अंतरावरील कामठी येथे ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारण्यात आला आहे. जपानी पद्धतीने बांधलेले हे टेम्पल आज मन मोहून टाकते. नागपूरला येणारे बहुतांश पर्यटक या स्थळाला भेट दिल्याशिवाय राहात नाही.
रामटेक
गावाच्या चहुबाजूने हिरवळ आणि पूर्व दिशेला उंच डोंगर हे रामटेक या पौराणिक गावाचे वैशिष्ट्य! ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेले हे गाव कुणाचे श्रद्धास्थान तर एखाद्या इतिहासवेड्यासाठीचे पर्यटनस्थळ ठरते. हिरवळीने नटलेल्या डोंगरावर प्रभू रामचंद्रांचे मंदिर आणि कवी कालिदासांचे स्मारक, हे गावाचे वैशिष्ट्य ठरते. नागपूरपासून ४८ किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
पारडसिंगा
अनसुया मातेचे मंदिर असलेले पारडसिंगा डबा पार्टीसाठीही ओळखले जाते. कुटुंबांसोबत जाताना दर्शनाला पर्यटनाची जोड द्यायची झाल्यास हे ठिकाण उत्तम! नागपूरपासून सुमारे ६० किमी अंतरावर हे स्थळ आहे.
मोहगाव झिल्पी
नागपूरपासून सुमारे २५ किमी अंतरावरील मोहगाव झिल्पी हा तसा तलाव परिसर. पण, निसर्ग सौंदर्याने या स्थळाला पर्यटकांची पहिली पसंती मिळते. विकेंडला बाहेर जाणाऱ्यांसाठी हा सोयीचा पर्याय ठरतो.
खेकरानाला
नागपूरपासून ६२ किमी अंतरावर खापाजवळ असलेला खेकरानाला नैसर्गिक सौंदर्यांनी नटलेला आहे. पर्यटकांना मोहून जाते.
खिंडसी
तुफान लाटांवर आरूढ झालेली वॉटर स्कूटर सुसाट वेगात उडवावी... चोहीकडे पसरलेल्या विस्तीर्ण निळ्याशार पाण्यात आपणच एकटे.. मुग्ध आणि धुंद मग पाण्यावरचे रंग कापीत ओठावंर मंजुळ गाणी आळवीत किनारा गाठावा... तर नजरेला सापडावी एक मायानगरी. तिलाच म्हणतात. खिंडसी. नागपूपासून अवघ्या ५६ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
मेळघाट
उंच डोंगररांगा, दऱ्या-खोऱ्या, तलाव, हिरव्यागार डोंगरकड्यावरून कोसळणारा धबधबा, गर्द वनराई, वाघोबासह विविध प्राणी पाहण्याची सोय मेळघाटात आहे. म्हणून देशातील पहिल्या दहा पर्यटनस्थळांमध्ये मेळघाटचा समावेश होतो. केवळ निसर्गसौंदर्यच नव्हे तर ऐतिहासिक गाविलगड, नरनाळा किल्लाही येथे आहे. सिपना, खंडू, गडगा, तापी, वान व पूर्णा या नद्या आकर्षणाचे केंद्र आहेत. वान, अंबाबरवा, नरनाळा व मेळघाट अशी चार अभयारण्ये तर गुगामल राष्ट्रीय उद्यान मेळघाटचे सौंदर्य खुलविते. याच मेळघाटातील चिखलदरा विदर्भाचे का‌श्मीर म्हणूनही ओळखले जाते.
नागपूरपासून अंतर - अमरावती १५० किलोमीटर व तेथून पुढे शंभर किलोमीटरवर मेळघाट आहे.
कसे जाणार? - नागपूरवरून येणाऱ्या प्रवाशांना अमरावतीनजीकचे बडनेरा रेल्वेस्थानक जवळचे आहे. बडेनरावरून अमरावती दहा किमी असून तेथून परतवाडामार्गे चिखलदराला जाता येते. मेळघाटात प्रवेश करता येतो. सोबतच एसटी महामंडळाच्या बसेस किंवा खासगी वाहनदेखील सोयीचे ठरते.
निवास व्यवस्था - एमटीसी हॉलिडे रिसोर्ट : गोराघाट पॉइंट (कॉनव्होकेशन कॅम्प) व चिखलदरा येथे मोझरी पॉइंट, चिखलदरा व धारणी येथे शासकीय विश्रामगृह, कोलकास विश्रामगृह व खाजगी हॉटेल्स
वाहन व्यवस्था - जिप्सी व अन्य वाहने उपलब्ध
संपर्क - वेबसाइट www.maharashtratourism.gov.in
दूरध्वनी क्रमांक:
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - ०७२१ - २६६१६०१
चिखलदरा रिसोर्ट - ०७२०-२३०२३४/२३०२६३
काय पहाल? - देवी पॉइंट, भीमकुंड (धबधबा), हरिसन पॉइंट, गावीलगड किल्ला, नरनाळा किल्ला, शक्कर तलाव, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, शासकीय उद्यान, कलालकुंड, सनसेट पॉइंट, पंचबोल पॉइंट, जत्राडोह, माखला, जवाहर कुंड
वन्यजीव - पट्टेदार वाघ, रानगवा (रानम्हैस), रानकुत्रे, बिबट, दुर्लभ चांदी अस्वल, चितळ, सांबर, चौशिंगा, भेडकी, खवल्या मांजर, उडती खार, पाणमांजर आदी.
इथेही द्या भेट -मोझरी, नल दमयंती तलाव, सालबर्डी, कौंडण्यपूर, रिद्धपूर
@@@@@@@@@@@@@@@@@@@
6) वरंध घळ : समर्थाचे वास्तव्य हे गावात, मठात, मंदिरात कधीच नसायचे. त्यांनी वास्तव्य केलेल्या विविध घळी या रामघळी म्हणून प्रसिद्ध झाल्या. शिवथरघळीच्या अगदी जवळ अजून एक घळ आहे. या घळीचे नाव स्थानिक लोक सुंदरमठ असे सांगतात. ही घळ आहे वरंध गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरामध्ये. पुण्याहून महाडला जाताना वरंध घाट लागतो. तो उतरून गेले की वरंध नावाचे गाव येते. याच गावातून काहीसे पुढे महाडच्या दिशेला जायला लागले की रस्त्याच्या उजव्या बाजूला काही दुकाने दिसतात आणि तिथे उजवीकडे आत एक रस्ता जातो. (मुंबईकडून आल्यावर वरंध गावाच्या काहीसे अलीकडे डाव्या हाताला ही जागा येते.) त्या रस्त्यावरून आत गेल्यावर अंदाजे चार किलोमीटरवर ही घळ आहे. आत जाण्याचा रस्ता काहीसा कच्चा आहे आणि पुढे गेल्यावर अंगावरची चढण एक-दोन ठिकाणी लागते. ऐन पावसाळ्यात तर तिथे पदभ्रमणच करावे लागेल. पण सुंदर निसर्ग, समोरच दिसणारा वरंध घाटाचा डोंगर असा हा परिसर खूप रमणीय आहे. पाण्याची एक टाकी आणि एक बांधलेली समाधी अशा ठिकाणी रस्ता संपतो. वाहन तिथेच ठेवून समोरच्या डोंगराच्या पोटातून गेलेली एक पायवाट घळीपाशी जाते. तिथून दगडात कोरलेल्या काही पायऱ्या चढून आपण घळीच्या तोंडाशी येऊन उभे राहतो. पाठीमागे पाहिले की सह्याद्रीचे रौद्र रूप सामोरे येते. घळीच्या शेजारीच मोठा धबधबा आहे. त्याचे पाणी पडून खालच्या बाजूला एक डोह तयार झाला आहे आणि तिथून ते पाणी पुढे नदीचे रूप घेऊन पुढे वाहत जाते. दक्षिणाभिमुख असलेली ही घळ आतमध्ये डाव्या बाजूला पूर्व-पश्चिम अशी जवळजवळ ६० फूट लांबीला आहे. तसेच ती १० ते १२ फूट रुंद आहे. दारातून आत गेल्यावर समोरच्या भिंतीमध्ये दगडात कोरलेली बसण्याची जागा आहे. मूलत: ही नसíगक घळ असणार. नंतर मानवाने ती त्याला हवी तशी खोदून काढलेली दिसते. आतमध्ये जाताना डाव्या बाजूला एक फूट उंचीचा आणि अंदाजे ३ फूट लांबी-रुंदीचा एक दगडी चौथरा आहे. तसेच पुढे गेले की खडकामध्ये खोदलेले एक पाण्याचे टाके दिसते. तिथून पुढे किंचित घळ वळते आणि मग दुसऱ्या बाजूने बाहेर येण्याचा मार्ग दिसतो. या ठिकाणाचा उल्लेख हा ‘मठाचा माळ’ असा केलेला आढळतो. याचा अर्थ इथे मठ होता याची यावरून खात्रीच होते असे तज्ज्ञ सांगतात.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
7) वेगळी हम्पी अनुभवण्यासाठी सानापूर तलाव, त्याच्या आसपास डोंगरांतून वाट काढणारे रस्ते, अनेक कालव्यांचे जाळे अशा अनेक जागा हम्पी परिसरात दडलेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर प्रमुख मंदिरे पाहायला एक दिवसही पुरतो आणि वेगळी हम्पी जगायला एक महिनाही कमी पडतो. फरक नजरेचा आणि दृष्टिकोनाचा असतो. चला, मग हम्पीची सफर करायची ना ?
Look what I saw in the "Top Marathi News"app: http://www.loksatta.com/lokbhramanti-news/visit-in-hampi-1335023/
############################
8) Veer Dam, near pune is a key bird-watching hotspot around Pune; especially famous for the Bar-headed Geese & Demoiselle Cranes. We have done multiple trips to this place in different seasons and have been pleasantly surprised with some of the sightings at this place. Till date we have sighted 96 different species of birds at Veer Dam.
One of the best parts about this place is that you will get to see Waders, Raptors as well as Flycatchers in and around Veer Dam. Not many places offer such variety.. Located around 70 KMs from Pune, this place offers a good stretch of 7-8 KMs along the river Nira. This entire belt along the river is extremely rich with Avifauna.
How to reach:
Take the Mumbai-Bangalore highway and drive up-to Shirwal, where you need to turn left onto the Khandala-Loni road to Baramati. Driving for around 4-5 KMs, take a left and you will reach the Tondal village.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
9) Bhigwan : Bhigwan Bird Sanctuary, located on Pune-Solapur Road, has been a winter paradise for bird lovers, nature enthusiasts and avian photographers for many years. Also known as ‘Bharatpur of Maharashtra’, the main attractions of Bhigwan are the beautiful, pink flamingos and Brahmani ducks that fly all over from the northernmost parts of the world every year around this time.  But what will make the bird watching experience truly mesmerizing for your children is hopping on to a boat, which will take the visitors through the backwaters of the Ujjain dam to watch these feathered beauties at closer quarters.  After returning to the shores, you can also catch a glimpse of herons, gulls, egrets, terns and other rare waders. If the lady luck is on your side, few raptors namely osprey, marsh harrier and spotted eagles, may also show up.
How to get there:The best way to reach Bhigwan is to drive yourself there.  From Pune, you can take Hadapsar- Loni – Bhigwan route. There are two birding spots in Bhigwan – Diksal and Kumbharwadi.   You may have to ask the local villagers for the right directions to these spots and hire boats.
पुणे-सोलापूर हमरस्त्यावरील भिगवणपासून कर्जतकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे राशीन. गावात इ.स.च्या ९ व्या-१० व्या शतकात उभारलेलं यमाई किंवा जगदंबा देवीचं मंदिर आहे. मंदिरासमोर दोन दीपमाळा आहेत. त्या आता विविध रंगांनी रंगवलेल्या आहेत. त्यांचे बांधकाम खाली दगडाचे आणि वर विटांचे आहे. दक्षिणेकडील दीपमाळेवर जाण्यासाठी बाहेरून जिना आहे तर उत्तरेकडील दीपमाळेवर जायला आतून जिना केलेला आहे. या जिन्याने वरती गेल्यावर एक आडवा लाकडी दांडा आहे तो धरून हलवला की दीपमाळ हलते. हे नक्कीच आश्चर्यकारक आहे
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
10) अनुभवा हाही गोवा
Maharashtra Times | Dec 25, 2015
गोव्याला जायचं म्हणजे बीचेस आणि चर्चेसची चर्चा आलीच. पण ज्यांना नेहमीचं सगळं करून पुन्हा काही वेगळं करायची उर्मी येते, त्यांच्यासाठीही गोव्यात खूप काही आहे. इअरएंडला किंवा नव्या वर्षामध्ये गोव्याचा प्लॅन करत असाल तर खास तुमच्यासाठी आहे हा हटके गोवा.. Ibrahim.afghan@timesgroup.com
गोव्यात नेहमीचा बीच टाळून वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर थेट दक्षिण गोव्यातला पाळोळे बीच गाठा. अर्धगोलाकार आकाराचा हा किनारा परवडणाऱ्या खाण्यापासून मनमोकळ्या धमालीपर्यंत सर्व काही देईल. समोर बेट आहे. एकट्याने चालताना किंवा तेथील शॅकच्या बाहेर बीच चेअरवर बसून किनाऱ्याच्या उजव्या हाताला असलेल्या डोंगराचं टोक आणि समोरचं बेट याच्या मध्ये बुडणारा सूर्य पकडायचा प्रयत्न करा.
ज्यांना ख्रिस्तमसचा गावातला माहोल अनुभवायचा असला तर दिवाडी बेटावर जा. गोव्याची राजधानी पणजी आणि जगप्रसिद्ध सेंट झेव्हीयरचं शव असलेल्या सेंट बॅसिलिका चर्चपासून ते जवळ आहे. फक्त फेरीबोटीतून जावं लागतं. गावात वावरताना सावधान. फार आवाज करू नका. कारण या गावातल्या लोकांनी गावची शांतता भंग होईल म्हणून पूल नाही होऊ दिलेला अजून. पण सगळीकडे पायी हिंडता येतं. आणि असं वाटेल की तुम्ही तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या काळात पोचलेला आहात. या गावकऱ्यांनी ते टिकवून ठेवलंय.
एकांतातील धबधब्यापाशी धमाल करण्याचा प्लॅन असेल तर नेत्रावळीकडे रवाना व्हा. ट्रेनने मडगावला गेल्यानंतर तेथून बसेस जातात किंवा ग्रूप असेल तर गाडी करून जाता येतं. तिथे अर्थात सांभाळून माहितगाराच्या मदतीनंच जा. आणि काळजी घ्या. कारण तेथे काळा चित्ता आढळतो. सांगे तालुक्यातील नेत्रावळी हा जंगलाचा भाग आहे. त्यासंदर्भात, गोवा पर्यटन विभागाची उत्तम मदत घेता येईल. ते राहण्याचीही सोय करतील. तेथे टाळ्या वाजवताच बुडबुडे निर्माण करणारे तळं पाहता येईल किंवा तिथून जवळच असलेलं नऊ हजार वर्षांपूर्वीची नदीच्या काठावरील दगडात कोरलेली चित्रकला पाहता येईल.
लांब निसर्गाच्या सानिध्यात गोवा अनुभवायचा असेल, तर पणजी शहरापासून जवळच असलेल्या आणि पुन्हा फेरीबोटनं जावं लागणाऱ्या चोडण बेटावर जा. हे आता डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे दिवाडी बेटावरूनही जाता येतं. विशेषतः मडस्कीपर हा जमिनीवर चालणारा मासा पाहाल तेव्हा हा अनुभव कधीच विसरणार नाही. बाकी, म्युझिक, डान्स, फिश आणि बुझ हे नेहमीच्या यशस्वी ठिकाणी तुम्हाला सापडेलच.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
11) पावसाळी सहली साठी रायगडाजवळील अजून उजेडात न आलेला मांडले धबधबा.
12)महाराष्ट्रातील निसर्ग आणि लेणी पर्यटनाची वेधक आणि वाचक माहिती...
13) महाराष्ट्राच्या पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादला अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. याच अजिंठय़ाला वाटेवर एक अद्वितीय मंदिर वसले आहे ते म्हणजे अन्व्याचे मंदिर.
औरंगाबादपासून अजिंठय़ाला जाताना अंदाजे ८० कि.मी. वर गोळेगाव लागते. इथून उजवीकडे १० कि.मी. गेले की अन्वा आहे. गावात महादेव मंदिर आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये मढ असे म्हणतात. गावाच्या किंचित बाहेर असलेले, इ.स.च्या अंदाजे १२ व्या शतकातील हे मंदिर मूळचे लक्ष्मीचे मंदिर असावे. मंदिराला अत्यंत सुंदर अशा पाच द्वारशाखा असलेले गर्भगृह असून दरवाजाच्या बाहेर त्रिभंग अवस्थेमधील वैष्णव द्वारपाल दिसतात. मूळ गाभाऱ्यात सध्या शिवपिंडी आहे. मंदिराच्या बाह्य़भागावर विष्णूच्या चोवीस शक्ती प्रतिमा दिसतात. स्त्री रूपातील या प्रतिमांच्या हातात विष्णूच्या हातातली आयुधे आहेत. त्या सगळ्या प्रतिमांच्या हातातील आयुधांचे क्रमसुद्धा बदलते आहेत. त्यामुळे त्या विष्णूच्या शक्ती समजल्या जातात. चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख-चक्र-गदा-पद्य अशी चार आयुधे असतात.  
भाषाशास्त्रानुसार शक्ती हा स्त्रीलिंगी शब्द येतो आणि त्याचा अर्थ सुद्धा वाचणाऱ्याला लगेच समजतो. परंतु मूर्तीशास्त्रानुसार शक्ती जर दाखवायची असेल तर त्या संबंधित देवाची स्त्रीरुपातील प्रतिमा दाखवली जाते. विष्णूच्या शक्तींचे मूर्तीरुपातील दर्शन  या मंदिरावर पाहायला मिळते. औरंगाबाद-अजिंठा रस्त्यावर असलेल्या अन्वा इथले मंदिर विष्णूच्या शक्तींचे या स्वरूपातील एकमेव मंदिर असावे. या मूर्तीची काही प्रमाणात झीज झालेली आहे तरी सुद्धा त्यांच्या अंगावरील अलंकरण, त्यांचा डौल, चेहेऱ्यावरील भावमुद्रा केवळ पाहण्याजोग्या आहेत. वैष्णव शक्ती दाखवलेल्या मूर्तीच्या उपलब्धतेचे हे सौभाग्य महाराष्ट्राच्या इतर भागाला नक्कीच नाही. म्हणूनच हे मंदिर वाट वाकडी करून अवश्य भेट द्यावे असेच आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
14) बेस्ट संग्रहालय
आणिक डेपो येथे हे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. या संग्रहालयामध्ये बेस्ट बसचा संपूर्ण इतिहास उलगडण्यात आला आहे. ज्या वेळी बेस्टने (बृहन्मुंबई इलेक्ट्रीक सप्लाय एॅण्ड ट्रान्स्पोर्ट) बस आणि ट्राम वाहतुकीचा ताबा मिळवला त्या काळापासूनच्या घडामोडी या संग्रहालयात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. १९४७ पासून बेस्ट बसमध्ये झालेले बदल या संग्रहालयातून पाहायला मिळणार आहेत. बेस्टचा उगम ते बसची िवटेज स्टाइल याचा इतिहास या संग्रहालयामुळे जिवंत झाला आहे. बेस्ट बसची आठवण म्हणून संग्रहालयाच्या बाहेर ब्रिटिशकालीन घडय़ाळ लावण्यात आले आहे. आणिक डेपोच्या तिसऱ्या मजल्यावर हे संग्रहालय आहे. बेस्ट बसची जुन्या काळातील तिकिटेही या संग्रहालयात पाहायला मिळतात. दोन दशकांपासून सुरू असलेले एक आण्याचे तिकीट आणि मासिक, साप्ताहिक पास या दुर्मीळ गोष्टीही या संग्रहालयात जपून ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर जुन्या काळांपासून धावत असलेल्या बेस्टच्या बसेस आणि त्यांचे विविध प्रकार यांची छबीही या संग्रहालयात पाहायला मिळते. त्यांच्या प्रतिकृती या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. १९७४ च्या दरम्यान असलेल्या ट्राम ते डबलडेकर बस अशी स्थित्यंतरे संग्रहालयाच्या रूपाने जिवंत झाली आहेत. तसेच आजच्या काळातील बसची प्रतिकृतीही या संग्रहालयात पाहायला मिळते.
कसे जाल? –
आणिक आगार, वडाळा, मुंबई.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
15) महाराष्ट्र निसर्ग उद्यान 
मिठी नदीच्या पात्रात ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ सलीम अली पक्षी निरीक्षणासाठी जायचे. तेव्हा त्यांनी मिठीच्या जंगलामध्ये पक्षी निरीक्षण केंद्र व्हावे, असे सांगितले होते. त्यानंतर मिठी नदीच्या पात्राजवळ असलेल्या या डिम्पग ग्राऊंडमध्ये त्यांनी पहिले झाड लावले. त्यांनी आंबा, वड, िपपळ, उंबर, पळस अशी पर्यावरणाला आधारभूत ठरणारी पाच झाडे लावून या उद्यानाची मुहूर्तमेढ रोवली. १९९४ साली हे उद्यान तयार झाले. त्या दरम्यान काही झाडे वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनही लावण्यात आली. या उद्यानाच्या निर्मितीसंदर्भात पर्यावरणाच्या अभ्यासाचे ध्येय होते. शहराच्या जवळच्या निसर्गाचे या माध्यमातून आज संवर्धन होत आहे. याचा उपयोग जनजागृतीसाठी होत आहे. निसर्ग उद्यानाची निर्मिती करताना इथे कोणतेही पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे मुद्दाम आणलेली नाहीत. हे पक्षी, पाखरे उद्याननिर्मितीदरम्यान अधिवास शोधत या उद्यानापर्यंत पोहोचले आहेत. सध्या या उद्यानात पक्ष्यांच्या १२८ जाती, ८२ प्रकारची फुलपाखरे तर ३२ साप आढळतात. महाराष्ट्र निसर्ग उद्यानात पाऊल ठेवता क्षणी बाहेरच्या वातावरणातील आणि उद्यानाच्या वातावरणातील फरक जाणवतो. या दोन्ही तापमानामध्ये सुमारे ५ अंश सेल्सिअसचा फरक असतो. या उद्यानात केवळ शोभेसाठी झाडे लावलेली नाहीत. ही झाडे समजावून देण्यासाठी तज्ज्ञ सज्ज असतात. फुले, फळे, त्यांचा फुलण्याचा काळ, त्याचा उपयोग, झाडाच्या सालीचा उपयोग, औषधी झाडांचे उपयोग अशी संपूर्ण माहिती देण्यात येते. एवढेच नाही तर त्या झाडावर कोणते पक्षी, फुलपाखरे येतात हेदेखील सांगितले जाते.
कसे जाल? –
मध्य रेल्वे मार्गावरील सायन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकावरून येथे रिक्क्षाने अथवा बसने पोहोचता येते.
16) ग्लोबल विपश्यना पॅगोडा 
तब्बल ३२५ फुटांची उंची आणि २८० फुटांचा व्यास असलेला हा पॅगोडा जगातील सर्वात मोठा घुमट आहे. हे स्मारक २.५ दशलक्ष टनांच्या जोधपूर स्टोनपासून तयार केले असून इंटरलॉकिंग दगडांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची उभारणी करण्यात आली आहे. तसेच हे बांधकाम अनंतकाळपर्यंत टिकावे म्हणून त्यात सिमेंट किंवा पोलाद या बांधकामातील पारंपरिक वस्तू वापरण्यात आलेल्या नाहीत. भारतातीलच नव्हे तर संबंध जगातील हजारो लोक दर वर्षी विपश्यनेला येतात. म्यानमार सरकारकडून भेट म्हणून प्रदान करण्यात आलेला अत्यंत भव्य असा ६० टनांचा बसलेल्या बुद्धाचा पुतळाही येथे आहे. हा २१ फूट उंचीचा पुतळा एकाच संगमरवरी दगडातून कोरलेला असून तो देशातील सर्वात मोठा गौतम बुद्धांचा पुतळा मानला जातो. तसेच प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी विपश्यना पॅगोडासाठी रंगविलेली बुद्ध चित्रावली ही प्रसंगचित्रे प्रत्येकाने पाहावीच अशी आहेत. मनशांती आणि आत्मिक समाधानासाठी आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी भेट द्यायलाच हवी.
कसे जाल? –
ग्लोबल विपश्यना पॅगोडा गोराई जवळ मुंबईच्या नर्ऋत्येला आहे. बोरिवली रेल्वे मार्गावरील बोरिवली स्थानकात उतरून गोराई खाडीला जाणारी बस पकडावी. तेथून पॅगोडाला जाण्यासाठी फेरी बोटची सोय उपलब्ध आहे. गाडीने जायचे असल्यास मीरा रोड येथून शिवाजी पुतळ्याच्या चौकातून काशिमिरा मार्गे जाता येते.

No comments: