Thursday, October 5, 2017

नावात काय आहे ?

"नावात काय आहे ?" असे शेक्सपियर सांगून गेला, पण त्याला जातीयतेत बरबटलेले आणि अंधश्रध्देत गुरफटलेले भारतीय माहीत नव्हते म्हणून त्याने असा प्रश्न विचारण्याचे धाडस केले. भारतीयांची मानसिकता समोरच्याचे नाव आणि आडनावावरून जात वा धर्म जोखण्याची असते. त्यामुळे समोरच्याचे विचार कितपत स्वीकारायचे वा नाकारायचे तसेच त्यावर कसा प्रतिवाद करायचा हे ठरवले जाते. म्हणजे भारतात बव्हंशी विचारापेक्षा जात आणि धर्म महत्वाचा समाजला जातो.परिणामी 21व्या शतकात विज्ञानाची घोडदौड सुरू असतांना आजही भारतात विचारांना दुय्यम स्थान मिळून जातीधर्माच्या प्रथा आणि परंपराच वरचढ ठरतांना दिसत आहेत.हे जर शेक्सपियरला माहीत असते, तर त्याने "नावात काय आहे ?" असा प्रश्न निदान या जन्मात तरी विचारला नसता!
मी नास्तिक असल्यामुळे बरेचदा लोक मला विचारतात की,तुमचे नाव मग "जगदीश" कसे ? कारण भाषाशास्राप्रमाणे ह्या शब्दाची संधी जगत + ईश अशी होते, म्हणजे जगाचे पालन करणारा ईश्वर. आणि जर तुम्ही देवच मानत नाही तर मग नाव का बदलत नाही ? किती बालिश प्रश्न आहेत हे! कारण ह्या लोकांना जगाचे पालन करणारा म्हणजे जगाला विवेकवादाची कास धरून वैज्ञानिक दृष्टीकोन देऊन त्यांच्या मनाची मशागत करणारा हा अर्थ माहीतच नसतो. मग नाव बदलण्याचा प्रश्नच येतो कुठे ?  बहुसंख्य माणसे फक्त शब्दकोशातील अर्थ जाणतात, पण त्यांना त्याचा गर्भित अर्थ कळत नाही, वा कळून घेण्याची त्यांची इच्छा नसते.
दुसरे असे की, नामकरणविधी मोठी माणसे करतात, आणि ज्याचे नाव ठेवायचे आहे त्याला त्याचा पत्ताच नसतो. एवढा तो लहान असतो तो. अशावेळी काही धार्मिक संस्कार झाले असले तर त्याला ते कसे कळतील ? म्हणून माझ्या नावापेक्षा माझे विचार किती विवेकशील आहेत याला महत्व आहे.एवढे मात्र मी नक्की सांगू शकेन की, मी जन्माला आलो तेव्हा कुठल्याच धर्माचा नव्हतो... आणि माणूस सोडून कुठल्याच जातीचाही नव्हतो... होतो फक्त माणूस! हिंदूधर्म नकळत्या वयात मोठ्या माणसांनी माझ्यावर लादला,जे आपल्या सर्वांच्या बाबतीत घडते. पण कळायला लागल्यापासून आणि विविध ग्रंथांनी मला विचार करायला प्रवृत्त केल्यामुळे मी धर्माशी फारकत घेतली.तेव्हापासून मी फक्त "माणुसकी" हा धर्म पाळू लागलो. याचे एक ताजे उदाहरण म्हणजे माझ्याकडे जेव्हा जनगणनेचा सरकारी माणूस आला होता, तेव्हा त्याला मी जातीच्या रकान्यात "माणूस" आणि धर्माच्या रकान्यात "माणुसकी" असे लिहिण्यास भाग पाडले होते.  त्या अर्थाने आजच्या ग्लोबल जगात माझी जात 'भारतीय' असे म्हणणे सुद्धा संकुचित ठरते.त्यामुळे सर्व धर्म ग्रंथातील जो नितीशास्त्राचा भाग आहे तेव्हढाच मला प्रिय आहे. त्याचबरोबर धर्म ग्रंथातील वाक्यांचा स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीचा अर्थ लावणाऱ्या धर्ममार्तंडांचा मी निषेध करतो.तसेच अंधानुकरणीय परंपरा त्याज्य समजतो.
जगात सगळेच अंधभक्त नसतात... प्रवाहपतित नसतात, तर बरीच माणसे माझ्यासारखी विचारीही असतात. त्यांना कुठल्याही जातीधर्माची कुबडी स्वाभिमानाने जगण्यासाठी घ्यावी लागत नाही. म्हणूनच मी प्रत्येक माणसाशी माणसासारखाच व्यवहार करतो.त्यामुळे इतर धर्मीय कसेही वागले तरी त्याचा द्वेष न करता त्यांच्यातील चांगुलपणाला साद घालतो. आज न उद्या हा मानव समाज परस्परांशी सौहार्दाने वागायला लागेल हा माझा (कदाचित तुम्हाला भाबडा वाटेल) आशावाद आहे. - जगदीश काबरे.(^j^)

आरक्षण: समज - गैरसमज

आरक्षण: समज - गैरसमज : मधु कांबळे
आरक्षणाबाबतही अनेक गैरसमज पसरवण्यात येत आहेत. त्यात अज्ञानाचा-अडाणीपणाचाही बराच भाग असतो. अर्थात त्यात आरक्षणाला विरोध करणारे आघाडीवर तर असतातच. म्हणजे उदाहरणार्थ घटनेमध्ये फक्त दहा वर्षांसाठी आरक्षणाची तरतूद केली असताना साठ वर्षे झाली, तरी अजून ते चालूच आहे, अशी एक अडाणीपणाची म्हणा किंवा पूर्वग्रहदूषित मानसिकतेतून पुढे आलेली म्हणा, बिनडोक चर्चा सुरू असते.
मुळात घटनेत दोन प्रकारचे आरक्षण आहे. एक- अनुसूचित जाती, जमाती, भटके-विमुक्त, ओबीसी यांना शिक्षणातील प्रवेशासाठी व सरकारी नोकऱ्यांमध्ये राखीव जागांची तरतूद म्हणजे ते सामाजिक आरक्षण होय. पिढय़ान्पिढय़ा सामाजिक, आर्थिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेल्या समाजाला पुढारलेल्या समाजाच्या बरोबरीने आणण्यासाठी विशेष संधी म्हणून आरक्षणाची तरतूद करण्यात आली. या सामाजिक आरक्षणाला घटनेत कुठेही मर्यादा घालण्यात आलेली नाही. तरीही सरसकट दहा वर्षांसाठी देण्यात आलेले आरक्षण किती काळ पुढे चालू ठेवायचे, असे पुन:पुन्हा अज्ञान प्रकट करणारे प्रश्न उपस्थित केले जातात.
राज्यघटनेतील राजकीय आरक्षण हा दुसरा भाग आहे. लोकसभा व राज्याच्या विधानसभांमध्ये अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात राखीव मतदारसंघ ठेवणे अशी तरतूद करण्यात आली. त्यालाच राजकीय आरक्षण म्हणतात. त्याला सुरुवातीला दहा वर्षांची मुदत ठेवण्यात आली होती; परंतु प्रस्थापित राजकीय पक्षांनी व राज्यकर्त्यांनी मागासवर्गीयांची मते मिळवण्यासाठी ही मुदत वेळोवेळी वाढवत नेली. राज्यसभा व विधान परिषदेत मात्र राजकीय आरक्षण नाही. पुढे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनुसूचित जाती-जमाती बरोबरच ओबीसी व महिलांनाही राजकीय राखीव जागा ठेवण्यात आल्या. त्यामुळे राजकारणापासून दूर असलेला हा वर्ग मोठय़ा संख्येने थेट निर्णयप्रक्रियेत आला, ही राजकीय आरक्षणाची एक सकारात्मक बाजू असली तरी मूळ राजकीय आरक्षणाचा हेतू त्यामुळे साध्य होतोच असे नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
1)  होय आरक्षण नकोच, मंदिरात दर्ग्यात विहारात ,स्त्रियांना विनासायास मंदिरात पुजारी होता आले पाहिजे. सवर्ण,जातपात,सर्व बंधने सैल व्हायला हवीत. मानवता ही एकच जात राहायला हवी. TV, क्रिकेट,वर्तमानपत्रे , राजपत्रित पदे या सर्वमध्ये सर्व जातीचे ,धर्माचे अनुपतानुसार सरळ प्रवेश हवा. गुणवत्तेनुसार सर्वाना सर्वांच्या धार्मिक अधर्मिक कार्यात सहभाग बिनधोकपणे मिळावयास हवा. खरंच अशी कोणी हमी घेत असेल तर आरक्षण बंदच व्हायला हवे. नाही का ?
2) सगळा समाज एका रांगेत असेल तरच केवळ आर्थिक आरक्षण प्रभावी ठरते. स्पर्धा बरोबरीची असेल तर हे शक्य होते; परंतु सामाजिक भेदभावामुळे स्पर्धा बरोबरीची होत नाही. त्यासाठी प्रथम त्या आधारावर आरक्षण असायला हवे. आरक्षणामुळे समाजातील एखादा वर्ग दुखावतो; परंतु आम्ही सांगतो की, बाबांनो, केवळ ५० वर्षे आरक्षणामुळे तुम्हाला त्रास होतो. ते तर २००० वर्षे वंचित राहिले आहेत, हे समजून घ्या. आजची पिढी समतावादी आहे. तिला कोणताही भेदभाव मान्य नाही. सगळ्यांना समान पातळीवर आणण्यासाठी आरक्षण आहे, अशी या पिढीची खात्री झाली तर ती विरोध करणार नाही. समाजस्वास्थ्याचा विषय वादविषय होऊ नये.
(लोकसत्ताच्या आयडिया एक्स्चेंज उपक्रमात (९ सप्टेंबर २०१२ रोजी) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केलेली मते.)
3) जोपर्यंत समाजात जात पात अस्तित्वात आहे तोपर्यंत मागास घटकांसाठी आरक्षणाची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटलं आहे. एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होत.
भागवत म्हणाले, "आम्ही आरक्षणाचे समर्थन करतो. समाजात जात-पात, मागास घटक आहेत तोपर्यंत आरक्षण राहायला हवं. त्यांना एकसमान पातळीवर आणण्यासाठी आरक्षण गरजेचे आहे. परंतु यावर राजकारण होता कामा नये." असं ते म्हणाले. आरक्षण हे जाती आधारित असायला हवे, धर्मावर आधारित नव्हे, असं भागवत २०१० मध्येही म्हणाले होते.
विशेष म्हणजे संघाने आजपर्यंत आरक्षणाचे खुलेपणाने समर्थन केले नव्हते. संघाचे माजी सरसंघचालक के. एस. सुदर्शन यांचा आरक्षणाला जोरदार विरोध होता. आरक्षणाच्या ज्वाळा देशाला भस्मसात करतील अस वक्तव्य त्यांनी केलं होतं. हिंदुंचा आत्मसन्मान धोक्यात असल्याचं सुदर्शन त्या वेळी म्हणाले होते. आरक्षणामुळे देशाच्या प्रतिभावंतांवर अन्याय होतो असं सुदर्शन यांनी त्यावेळी म्हटलं होतं.
या पार्श्वभूमीवर मोहन भागवतांचे वक्तव्य महत्वाचे आहे. ते पुढे म्हणतात, "देशाच्या हितासाठी एक हजार वर्षापर्यंत लोकांनी अन्याय सहन केला. ज्या कारणासाठी या समाज घटकांनी अन्याय सहन केला ते कारण आता अस्तित्वात नाही. आता त्या वर्गाला एकसमान पातळीवर आणण्याची जबाबदारी आमची आहे. यासाठी इतर कुणाला १०० वर्ष अन्याय सहन करावा लागला तरी त्यांना तो सहन करावा."
(आरक्षण हवंच : RSS | September.7, 2014
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आर्थिक निकषाचे गौडबंगाल!
रवि आमले | लोकसत्ता (27/09/2015)
राज्यघटनेने केवळ अनुसूचित जाती, जमाती आणि ‘सामाजिक व शैक्षणिक मागास’ या तीनच घटकांना आरक्षण दिलेले आहे. यातील तिसरा घटक म्हणजे ज्याला इतर मागासवर्ग म्हटले जाते तो. हा घटक कसा ठरविण्यात आला? त्यासाठी जात हाच एकमेव निकष होता का? तर ते तसे नाही. जात्याधारित आरक्षण हे एक मिथक आहे. मुळात आरक्षण आहे ते मागासलेल्या वर्गासाठी आणि ते वर्ग मंडल आयोगाने निश्चित केले ते सामाजिक, शैक्षणिक आणि आíथक अशा एकूण ११ निकषांवर. त्यातील आíथक निकष होते – १. राज्यातील कौटुंबिक मालमत्तेच्या प्रमाणामध्ये ज्यांची मालमत्ता २५ टक्क्यांहून कमी आहे अशा जाती वा वर्ग. २. राज्यातील कच्च्या घरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या प्रमाणापेक्षा ज्यांच्या कुटुंबांची संख्या २५ टक्क्यांनी जास्त आहे अशा जाती वा वर्ग. ३. ज्यामधील ५० टक्क्यांपेक्षा अधिक कुटुंबांना पिण्याचे पाणी अर्ध्या किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरून आणावे लागते अशा जाती वा वर्ग. ४. राज्यातील खावटी कर्ज घेणाऱ्या कुटुंबांच्या सरासरीपेक्षा असे कर्ज घेणाऱ्या कुटुंबांची संख्या २५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे अशा जाती वा वर्ग. तेव्हा आर्थिक बाबींचा विचारच झाला नाही असे म्हणता येणार नाही.
आरक्षणाचा हेतू गरिबी दूर करणे, नोकऱ्या देणे असा जो मानला जातो तो चुकीचा आहे. त्याचा मुख्य हेतू सामाजिक विषमता दूर करणे हा आहे. तेव्हा आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे ही मागणी घटनाविरोधी तर आहेच, शिवाय ती लबाडही आहे. ही बाब थोर विचारवंत नरहर कुरुंदकर यांनी मंडलच्याही आधी लक्षात आणून दिली आहे. ‘वर्ग-वर्ण समन्वय : माझी भूमिका’ या लेखात त्यांनी म्हटले आहे – ‘सर्व सवलती आर्थिक मागासलेपणाच्या तत्त्वावर द्याव्यात, या मागणीतील लबाडी सवर्णानासुद्धा समजावून सांगितली पाहिजे. या मागणीचा अर्थ असा की, आर्थिक मागासलेपणाचे तत्त्व लागू पडणारा आपल्याच जातीचा माणूस पुढे नोकरीत येऊ शकावा याची त्यात सोय आहे.
आता जर आर्थिक मागासलेपणाचे तत्त्व लागू केले, तर ज्या जागा सर्वसाधारण आहेत त्याही आणि ज्या राखीव आहेत त्याही वरिष्ठ जमातीच्या गरीब मुलांनाच मिळतील. दलितांना प्रवेशच मिळणार नाही! सर्व काही गुणवत्तेनुसार व्हावे, इतर प्रश्नांचा विचारही करू नये ही भूमिका वरिष्ठ जमातीच्या सोयीचीच आहे. जे मागासलेले समाजघटक आहेत, त्यांची आधीच मंदगतीने चालू असणारी प्रगती बंद करण्याचा हा उद्योग आहे.’ अर्थ स्पष्ट आहे. केवळ आर्थिक निकष हे जे गौडबंगाल आहे ते सामाजिक न्यायाच्या, समतेच्या (आणि तथाकथित समरसतेच्याही) बाजूचे नाही.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाजप शासनाला काही म्हणायला गेलं तर हे लोकं म्हणतात,'काँग्रेस सरकारनं 60 वर्ष भ्रष्टाचार करुन देशाला नागवलं. त्या 60 वर्षाचा backlog भरुन काढायला वेळ लागेल. त्यासाठी 5 वर्ष पुरेसे नाहीत. मोदींना थोडा वेळ द्या. मोदींजवळ‪ ‎जादूची कांडी‬ नाही.'
ठीक आहे मग, इथल्या जाती व्यवस्थेने SC, ST, OBC ला जवळपास 2500 वर्ष शिक्षणापासून वंचित ठेवलं. त्याचा backlog भरुन काढण्यासाठी SC, ST, OBC लोकांना पण वेळ लागेलच ना ? 60 वर्षाच्या backlog साठी जसे 5 वर्ष पुरेसे नाहीत, तसेच सुमारे 5000 वर्षाच्या backlog साठी 66 वर्ष (प्रजासत्ताक दिनानुसार) पुरेसे कडे होतील ? SC, ST, OBC लोकांकडे काय जादुची कांडी नाही की त्या 2500 वर्षाचा backlog 66 वर्षात पुर्ण करतील!
स्वतःला जर बुद्धिमान समजत असाल तर अशी विजोड तुलना करून स्वतःचे हसे का करून घेताय ? शेकडो वर्षे SC, ST, OBC समाजाला जनावरासारखे वागवले तेव्हा नाही आरक्षण आर्थिक आधारावर असावे असे वाटले ? आता फक्त 66 वर्षे चटके सोसायला लागले तेव्हा बरी कोल्हेकुई सुरू केली ? ह्यालाच दांभिकपणा म्हणतात. स्वतः च्या जातीचा गंड बाळगायचा आणि लोकांना तुम्ही जातीयता पाळता म्हणून तुच्छ लेखायचे!!! यालाच नीचपणा म्हणतात. तेव्हा अंधभक्तांनो, दुटप्पीपणा सोडा आणि माणसाला माणसासारखे वागवायला आता शिका. आधी जाती नष्ट करा, मग आरक्षण आपोआप नष्ट होईल. - जेट जगदीश. (^j^)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटनाअंतर्गत आरक्षण तत्वप्रणाली लागू झाल्यापासून आरक्षित वर्ग आणि ज्यांना आरक्षण नाही असे अनारक्षित वर्ग यात नेहमी कलह निर्माण होताना दिसतो. किंबहुना तो जाणीवपूर्वक निर्माण केला जातो आहे. आरक्षण विरोधक अलिकडं आरक्षणाच्या तत्त्वाला बदनाम करण्यात फारच कार्यान्वित झालेले दिसत आहेत. एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आरक्षणाची समीक्षा करा असा आग्रह धरत आहेत, तर त्यांच्या इतर संघटना, पक्ष, नेते आरक्षणाबाबत उलट सुलट मत व्यक्त करताना दिसत आहेत. मध्यंतरी लोकसभा अध्यक्ष या अत्यंत जबाबदारीच्या पदावर असलेल्या सुमित्रा महाजन म्हणाल्या होत्या, ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी केवळ 10 वर्षांसाठी आरक्षणाची तरतूद केली होती. मागसवर्गीयांचं जीवनमान उंचावून त्यांना पुढे आणण्याची गरज होती. मात्र, आपल्या देशातील राजकीय नेत्यांनी तसं काहीच केलं नाही आणि स्वार्थासाठी आरक्षण सुरू ठेवलं ‘ हे अत्यंत दुर्दैवी विधान आहे. ते अज्ञानातून असलं तरी आणि जाणीवपूर्वक केलं गेलं असलं तरी.जबाबदार व्यक्तींकडून जर अशी विधानं येत असतील, तर समान्य लोकांकडून काय अपेक्षा ठेवायची, असा प्रश्न आहे.
एकीकडं देशाचं स्वातंत्र्य तर दुसरीकडं सामाजिक स्वातंत्र्य अशा दोन्ही लढाया एकाचवेळी देशात चालू होत्या. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन राष्ट्रीय नेत्यांनी या दोन्ही पातळयांवर काम केलं. सामाजिक स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी अपार कष्ट घेतले. त्याची प्रचिती आपल्याला घटनेतील अंतर्भूत असणार.य़ा समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्याय या मूल्यसूत्रावरून दिसून येतं. ही मुल्यसूत्रं बुद्धधम्मातून घेण्यात आलेली आहेत. डॉ. आंबेडकरांना भारताची राज्यघटना लिहिण्याची संधी मिळाली. त्यांनी त्या संधीचं सोनं केलं आणि सर्व भारतीयांना लोकशाही आविष्काराचा एक नितांत सुंदर असा स्वातंत्र्याचा जाहीरनामा दिला.
सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत वर्गाला आरक्षणाचं संरक्षण दिलं. ते घटनेत अंतर्भूत करून त्यास कायद्याचं कवच बहाल केलं. मागासवर्गीयांना मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर त्यांना आरक्षणाद्वारे राखीव जागांची तरतूद केली पाहिजे, असे महात्मा फुल्यांचे विचार होते. त्या अनुषंगानं त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. समाजाला विद्येचं महत्व पटवून देणार्‍या त्यांच्या कवितेच्या प्रसिद्ध ओळी-
विद्येविना मती गेली। मतीविना नीती गेली।
नीतीविना गती गेली। गतीविना वित्त गेले।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले।
या फार मार्मिक आहेत. त्यांचा हा वारसा छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर यांनी पुढं चालवला. त्यांची विचारांतून मैत्री झाली होती. नवसमाज घडवण्याचं काम त्यांनी सुरू केलं आणि म्हणून महाराष्ट्राला फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र असं अभिमानानं म्हणलं जातं.
वास्तविक घटनेत शैक्षणिक आणि नोकर्‍यांमधील आरक्षणाला कोणतीही कालर्मयादा घालून दिलेली नाही, तर राजकीय आरक्षणाला ती दहा वर्षे होती. ही बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. आरक्षणामुळं गुणवत्ता धोक्यात येते, आमच्यावर अन्याय होतो, म्हणून आरक्षणच बंद करा, अशी मागणी आरक्षण विरोधकांकडून सातत्यानं होते. सर्वांना समान न्याय द्या, अशी त्यांची भावना असते. तसं पाहता ही भावना गैर नाही. परंतु, ती खरी नाही. फसवी आहे. मुळातच आरक्षण धोरण हेच समान न्याय देण्यासाठी राबविलं जातं. आपण सर्वांत अगोदर हे लक्षात घेतलं पाहिजे, की आरक्षण हे प्रतिनिधित्त्वाची संधी म्हणून दिलं गेलं आहे. त्यामुळं मुळातच यास सवलत, लाभ, मदत, कुबड्या असे शब्द योजने हाच एक बुद्धिभेद आहे.
आपला समाज जर एवढा प्रामाणिक आणि उदारमताचा असता, तर ना आरक्षणाची गरज लागली असती ना इतर अनेक कायद्यांची. आजही भारतात अमानवीय अशी अस्पृशय़ता पाळली जाते. जातीभेद आहे आणि ऑनरकिलिंगही आहे. त्या समाजात सर्वांना आरक्षण विरहीत समान न्याय देणं हे दिवास्वप्न ठरतं. आरक्षण विरोधकांची ही मागणी मान्य होत नसल्यामुळं त्यांनी आता आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं अशी मागणी पुढं रेटायला सुरुवात केली आहे. मुळात आरक्षणाचं सर्वांत पहिलं तत्त्व म्हणजे आरक्षण हा गरिबी हटाव कार्यक्रम नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. आरक्षण प्रतिनिधित्त्वाची संधी उपलब्ध करून देण्याचं फक्त साधन आहे. साध्य नाही.
आरक्षण विरोधक बुद्धिभेद करत असताना असे गृहीतक मांडतात, की आरक्षणामुळं अनुसूचित जातीतील अनेक जातींपैकी केवळ एकच जात आरक्षणाच्या जोरावर मोठी होते, बाकी जाती मात्र आहेत तशाच दारिद्यात जीवन जगताना दिसतात. इथं एक लक्षात घेतलं पाहिजे, की एक जात दुसर्‍या जातीपेक्षा मोठी होते, म्हणजे नेमकं काय होतं? आरक्षणामुळं जातीला आणि यातही ज्या व्यक्तीनं आरक्षण मिळवून पुढं आयुष्यात यशस्वी होऊन आर्थिक सुबत्ता प्राप्त केली असेल, अशी व्यक्ती मोठी होते. अशी उदाहरणं कमी आहेत, आणि तशी ती होत असेल. परंतु, सामाजिक स्तरावर असणारा तिचा दर्जा मात्र बदलत नाही. ही वस्तुस्थिती आहे.
उदा. एखादा अनुसूचित वर्गातील मातंग किंवा चर्मकार आरक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या सुधारला, तरी त्याचा आजही सामाजिक दर्जा हा ओबीसी, मराठा, ब्राह्मण यांच्या बरोबरीचा नसतो. तसा तो मानलाही जात नाही. आरक्षणाचं तत्त्व केवळ आर्थिक जीवनात सुबत्ता प्राप्त करून देण्याचं नाही, तर अशा मागास समूहांना जीवनात सामाजिक भेदांना सामोरं जाताना अडचणी येवू नयेत तसंच त्यांच्या प्रगतीत कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी आहे. भारतीय समाज चमत्कारिक आहे. तो इतरांना आपल्या बरोबरीचा समजत नाही. समजून घेण्यास तयार नाही. मात्र, त्याची इतर मार्गानं होणारी प्रगतीसुद्धा त्याला सहन होत नाही. यामुळं आता आरक्षणाला विरोध करता येत नाही, तर आम्हालाही आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावं असं अजब तर्कट काही जातींनी अवलंबले आहेत. – मिलिंद धुमाळे (०७/०३/२०१६)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आरक्षणाचा फुगा |लोकसत्ता|
अमिताभ पावडे | December 2, 2015.
भारतात सर्वसामान्यांच्या मनावर जातीय आरक्षण हे ५० टक्के असल्याचे सातत्याने बिंबवण्यात आले आहे. याआधारेच संपूर्ण भारतीय समाजात पद्धतशीरपणे तिरस्काराची पेरणी केली आहे. त्यामुळे आरक्षण समर्थक व विरोधक, असे ध्रुवीकरण करणे सहज शक्य झाले आहे. वस्तुत: १२५ कोटी लोकसंख्येतील ५० टक्के जनतेला या देशात आरक्षणाचा लाभ मिळून सन्मानाने कमावण्याची संधी मिळाली असती तर...
रोजगाराच्या संधीमधील आरक्षण नेमके किती?
१) देशाचा सर्वात मोठा खर्च संरक्षणावर होतो व संरक्षण सेवेला सर्वोच्च सन्मान प्राप्त आहे. भूदल, नाविक दल व हवाई दल या तीनही संरक्षणाच्या विभागांमध्ये जातीय आरक्षण नाही.
२) देशातील ६६ टक्के लोक कृषीवर आधारित रोजगारावर जगतात. देशाला ‘कृषिप्रधान’ असे लेबलही लागले आहे. ही ६६ टक्के रोजगार संधीही आरक्षणविरहित आहे.
३) खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या आड राज्यव्यवस्थेने रोजगाराच्या मूलभूत जबाबदारीतून अंग काढून घेतले आहे. ही जबाबदारी खासगी क्षेत्रावर- कॉर्पोरेट सेक्टरवर टाकली. या क्षेत्रातून मोठय़ा प्रमाणात रोजगाराची निर्मिती झाली. यात रोजगाराची संधी अगदी आरक्षणविरहित आहे.
४) सर्वात जास्त लौकिक व उत्पन्न मिळवून देणारे क्षेत्र हे चित्रपट, माध्यमे, पर्यटन, जाहिरात, क्रिकेट (स्पोर्ट्स), स्टॉक एक्स्चेंज, जलवाहतूक, व्यापार, मोठे/लघू उद्योग इत्यादी क्षेत्रांतही जातीय आरक्षण नाही.
५) मासेमारी, गोदी कामगार, शेतमजूर, कुक्कुटपालन, पशुपालन, मधुमक्षिकापालन इत्यादी क्षेत्रांतही रोजगाराच्या संधींमध्ये आरक्षण अगदी नगण्यच आहे.
६) सर्व मेहनती व घाम गाळण्याच्या रोजगार संधींमध्ये, मग ते गवंडीकाम असो की वेल्डिंग, सुतारकाम असो की प्लम्बिंग, यासाठी कुठलेही आरक्षण नाही. या संधींतील मेहनत व त्याला मिळणाऱ्या अन्याय्य मोबदल्यामुळे या संधींकडे बघण्याचा दृष्टिकोन हिणकस आहे, कारण श्रमसंस्कार आपल्या अभ्यासक्रमात नाहीत व आपल्या समाजाने श्रमाला प्रतिष्ठाही दिलेली नाही.याचा अर्थ सर्व कष्टकरी क्षेत्रांत आरक्षण नगण्यच आहे. हे क्षेत्र बहुतांशी असंघटित आहे. कल्याणकारी राज्याचे पहिले कर्तव्य रोजगार व त्यातून सन्मानाने जगता येईल अशी संधी देणे, हे आहे.
मग १२५ कोटी लोकांकडून या ना त्या स्वरूपात कर वसूल करणारी राज्यव्यवस्था रोजगारात आरक्षण नेमके कुठे देते? केंद्र शासनाच्या ८३ लाख सरकारी नोकऱ्यांमध्ये ४१.५ लाख लोक आरक्षित जागांवर व ४१.५ लाख लोक खुल्या प्रवर्गात केंद्र शासनाच्या रोजगाराचा लाभ उचलतात. आरक्षित प्रवर्गात ओबीसी, एससी, एसटी, व्हीजे, एनटी इत्यादी समाजाचा ८५ टक्के भाग ५० टक्के जागांवर व उरलेला १५ टक्के समाज हा ५० टक्के जागांवर हे चित्र बघितले तर आरक्षण नेमके कुणाला आहे? म्हणजे, १२५ कोटी लोकसंख्येपैकी ४१.५ लाख लोकांना आरक्षणाचा लाभ केंद्र शासन देते. टक्केवारीत बोलायचे तर ०.३३ टक्के लोकांना, पण ओरड केली जाते ५० टक्के आरक्षणाची. शिवाय, खासगीकरणामुळे हे आरक्षण १९९१ पासून कमीच होते आहे. हे राज्यकर्त्यांच्याच दुर्लक्षामुळे झाले. खासगीकरणाच्या अंधानुकरणामुळे सरकारी रोजगार क्षेत्रात कपातच होत गेल्यामुळे जीवघेणी स्पर्धा सुरू झाली व त्यातून आरक्षणाविषयी द्वेष व तिरस्काराची पेरणी झाली.
आरक्षणाचा लाभ मिळणे आणि योग्य रोजगारसंधी प्राप्त होणे या दोन गोष्टींचा आपल्या देशात काहीही संबंध नाही. जे काही आरक्षण मिळते, ते सरकारी नोकऱ्यांत. अन्यत्र – विशेषत: जेथे श्रमप्रतिष्ठेचा संबंध आहे अशा क्षेत्रात आरक्षण नाही हे आरक्षण विरोधकांच्या लक्षातही येत नाही. खासगीकरण- उदारीकरण यांमुळे आहे ते सरकारी आरक्षणदेखील आक्रसते आहे आणि आरक्षणामागील राज्यघटनेला अपेक्षित असलेला हेतू रसातळाकडे जातो...
राज्यकर्त्यांचे दुसरे अक्षम्य दुर्लक्ष म्हणजे, रोजगाराभिमुख शिक्षणव्यवस्था मूलभूत शिक्षणात नसणे. तिसरे, असलेल्या सार्वजनिक शिक्षणव्यवस्थेविषयी अत्यंत अनास्था, त्यात ग्रामीण व शहरी शिक्षणात जमीन-अस्मानची तफावत. शिकवणी व महागडय़ा उच्चशिक्षणाच्या भरवशावर उच्चभ्रू वर्ग कष्टकरी, गरीब व ग्रामीणांवर वरचढ होणे साहजिक आहे. आरक्षणामुळे सरकारी सावलीतील नोकऱ्या या उपेक्षित वर्गाला मिळण्याची संधी मिळाली. या सावलीची मोठय़ा प्रमाणात वाढ करून रोजगाराचे बरेच वृक्षारोपण करण्याची सरकारकडून अपेक्षा होती. मात्र, सरकारने नवीन रोजगाराचे वृक्ष तर लावलेच नाही, पण असलेल्या रोजगार वृक्षांनाही खासगीकरणाने संपवण्याचा विडा उचलला. या बाबीकडे आरक्षण समर्थक व विरोधक कधीच बघत नाहीत. मुळातच रोजगाराच्या संधी कमी झाल्याने एकमेकांप्रति आकस, ईर्षां व द्वेष पसरत गेला.संविधानाने शूद्रांना शिक्षणाचा व सन्मानाने रोजगार कमावण्याचा अधिकार देऊन हजारो वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्त जरूर केले. मात्र, राज्यकर्त्यांनी रोजगाराची व्यवस्था अत्यंत कमी केली. सार्वजनिक व खासगी शिक्षणव्यवस्था, तसेच ग्रामीण व शहरी शिक्षणव्यवस्थेवर नियंत्रण न ठेवल्याने त्याचे परिणाम शिक्षणाच्या गुणवत्तेवर स्पष्ट दिसून येतात. परिणामी, आजही शूद्र व अतिशूद्र शारीरिक श्रमाच्या रोजगारातच दिसतो. व्यापार, विद्यार्जन, धार्मिक विधी, राज्यव्यवस्था चालवण्यात खर्डेघाशी इत्यादी सावलीतील कामांवर मक्तेदारी असणाऱ्यांना उन्हात राबवणाऱ्या कष्टकरी शूद्रांनी या कामात वाटेकरी होऊ नये, असे आजही वाटते. म्हणूनच नाममात्र असलेल्या आरक्षणाचा फुगा फुगवून सातत्याने तिरस्काराची पेरणी करून ध्रुवीकरण केले जाते. सुज्ञ व जाणकार भारतीयांनी विचार करावा की, खरेच आरक्षणाचा लाभ या देशातील ५० टक्के लोकांना मिळतो आहे का? जर मिळत असेल तर हे इतके दारिद्रय़ का? नसेल तर ही तिरस्काराची पेरणी का?
भारतात कृषी व ग्रामीण क्षेत्राला संपूर्णपणे डावलून विकासाचे आराखडे आखले गेले. कृषीला मूलभूत अभ्यासक्रमात स्थान नसल्याने कृषीवर आधारित ग्रामीण समाज या विकासापासून वंचित राहिला. त्यामुळे ग्रामीण भागात शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व औद्योगिक विकासाची दारे बंद झाली. परिणामी, मोठय़ा प्रमाणावर शेतकरी, शेतमजूर व बलुतेदार शहराकडे स्थलांतरित झाला. शहरात याचे आश्रयस्थान झोपडपट्टी किंवा तत्सम वस्त्या राहिले व जगण्याची एक नवीन परीक्षा सुरू झाली. त्यामुळे शहरात येऊनही मागासलेपणाने पिच्छा सोडला नाही. उच्च कोटीच्या शिक्षण संधी व खासगी शिकवणीचा मुलामा लावून शिक्षण घेणारा शहरी विभाग स्वत:ला उत्तम समजून रोजगाराच्या सर्व जागांवर हक्क सांगायला लागला आहे. आरक्षणाचा आधार ‘आर्थिक’ असावा, असा आग्रह धरू लागला आहे. आरक्षणाचा आधार सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणा असावा, असे संविधान सांगते. आजही संपूर्ण ग्रामीण भारत व शहरी झोपडपट्टय़ांमधील वर्ग सामाजिक व शैक्षणिकदृष्टय़ा मागासलेला आहे. जोपर्यंत ग्रामीण भाग व शहरी झोपडय़ांचा सामाजिक व शैक्षणिक विकास करण्याचा विचार राज्यकर्ते करणार नाहीत तोपर्यंत यात राहणाऱ्या जाती आरक्षणास पात्रच राहतील. गावे असो की शहरे, जातीयता अजूनही संपलेली नाही. आर्थिक समता शैक्षणिक विकास करती झाली, पण सामाजिक समता आजही बरीच दूर आहे. राज्यकर्त्यांनी आरक्षण हे सामाजिक समता प्रस्थापित करण्याचे साधन समजून ते योग्य प्रकारे राबविण्याऐवजी त्याकडे व्होट बँक म्हणून पाहिले आहे. या क्षेत्राला मागास ठेवून ध्रुवीकरण करायचे व आर्थिक व्यभिचार करून लोकशाहीला काळिमा फासत सत्तेचा बीभत्स खेळ खेळायचा, असे सुरू आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आजकल देश मे दलित आरक्षण के विरोध मे जोरदार हवा फैलाई जा रही है।बेशक इसमे सभी उच्च वर्णीय हिंदु शामिल है। इन सवर्णो ने तो खुद ३००० साल तक आरक्षण का उपभोग किया लेकीन आज सिर्फ ५० साल से मिल रहे दलित आरक्षण इनके आँख का काटा बना हुआ है। कई सारे तर्क ये हिंदु सवर्ण करते है दलित आरक्षण के खिलाफ उनके कुछ तर्को मे दलित आरक्षण विरोधीयो का।
सबसे पहला तर्क होता है की दुसरे देशो मे आरक्षण नही है इसलिये वो हमसे ज्यादा प्रगत है।
खंडन: यह दलित आरक्षण विरोधीयो का फैलाया हुआ सबसे बडा झुठ है, विदेशो मे भी आरक्षण की पध्दती है, बल्की प्रगत देश जैसे की अमरिका जपान चीन जैसे देशो मे भी आरक्षण है। बाहर देशो मे आरक्षण को Affirmative Action कहा जाता है, Affirmative Action मतलब समाज के "वर्ण " तथा "नस्लभेद" के शिकार लोगो के लिये सामाजिक समता का प्रावधान है।
1961  को संयुक्त राष्ट्र की बैठक मे सभी प्रकार के वर्ण अथवा नस्लभेद के खिलाफ कडा कानुन बना, इसके तहत संयुक्त राष्ट्र मे सम्मिलीत सभी देशो ने अपने देश के शोषित अथवा दलन किये हुए वर्ग को (दलित) मदत करके पुन्हा समाज मे स्थापित करने का निर्णय लिया है इसी के तहत अलग अलग देशो ने अलग अलग तरिके से आरक्षण लागु किया।
🌹🔥अन्य देशो में आरक्षण🔥🌹
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🏴ब्राझील मे आरक्षण Vestibular नाम से जाना जाता है।
🏴कॅनडा मे समान रोजगार का तत्व है जिसके तहत फायदा वहा के असामन्य तथा अल्पसंख्याको को होता है।
🏴चीन मे महिला और तात्विक अल्पसंख्यको के लिये आरक्षण है।
🏴फिनलँड मे स्वीडीश लोगो के लिये आरक्षण है।
🏴जर्मनी मे जिमनॅशियम सिस्टम है।
🏴इसरायल में Affirmative Action तहत आरक्षण है।
🏴जापान जैसे सबसे प्रगत देश मे भी बुराकूमिन जाती के लोगो के लिये आरक्षण है। (बुराकूमिन जापान की दलित जाती है) 
🏴मॅसेडोनिया मे अल्बानियन के लिये आरक्षण है।
🏴मलेशिया मे उनकी नई आर्थिक योजना के तहत कुछ आरक्षण जारी हुए है।
🏴न्युझीलँड मे माओरिस और पॉलिनेशियन लोगो के लिये Affirmative Action का आरक्षण है।
🏴नॉर्वे मे पीसीएल बोर्ड मे ४०% महिला आरक्षण है।
🏴रोमानिया मे रोमा जाती के लोगो के लिये आरक्षण है।
🏴दक्षिण आफ्रिका मे रोजगार समता (काले गोरे लोगो को समान रोजगार) आरक्षण है।
🏴दक्षिण कोरिया मे उत्तरी कोरिया तथा चीनी लोगो के लिये आरक्षण है।
🏴श्रीलंका मे तमिळ तथा ख्रिश्चन लोगो के लिये अलग नियम अर्थात आरक्षण है।
🏴स्वीडन मे General Affirmative Action के तहत आरक्षण मिलता है।
🏴इतना ही नही संयुक्त राष्ट्र अमरिका मे Affirmative Action के तहत आरक्षण है।
अगर इतने देशो मे आरक्षण है (इनमे प्रगत देश भी शामिल है) तो फिर भारत का आरक्षण किस प्रकार भारत की प्रगती को बाधक है, यहा तो सबसे ज्यादा लोग जातिभेद के ही शिकार है तो फिर दलित तथा पिछडे वर्ग को क्यु न मिले आरक्षण ?अगर आरक्षण हट गया तो फिर से एक ही "विशीष्ट वर्ग" शासन तथा उद्योग व्यवसायो पर कब्जे कर लेगा। फिर किस प्रकार देश की प्रगती होगी ? भारत सिर्फ किसी विशीष्ट समुदाय के लोगो का देश नही है, सिर्फ उनकी प्रगती से भारत प्रगत नही होगा।
जबतक भारत के सभी जातीधर्म के लोग शिक्षा, नौकरी तथा सरकार मे समान रुप से प्रतिनीधीत्व नही करेगे तबतक तो भारत प्रगत होगा ही नही, अगर उपर उल्लेखित किया हुआ हर देश प्रगति के लिये दलितो को साथ लेके प्रगत कर रहा है तो फिर भारत क्यो नही  ?भारत को प्रगत होना है लेकीन सिर्फ एक विशीष्ट वर्ग की प्रगति को लेके नही, तो समाज के सभी जाति के लोगो को लेकर प्रगत होना है।
आरक्षण तो ५० साल पहले आया, लेकीन जात तो ३००० साल पहले आई, ३००० साल से जातिगत शोषण हो रहा है, तब तो आरक्षण हिंदु सवर्णो को था फिर भी दलितो पर अत्याचार हो रहे थे, फिर कैसे कह सकते है लोग की आरक्षण की वजह से जातीवाद बढ रहा है ? जब तक "जात" है तबतक "जातिवाद" रहेगा, और जबतक जातिवाद है तबतक आरक्षण रहेगा।अगर आरक्षण खत्म करना है तो उसी क्रम से पहले जाति खत्म करे, जातिवाद खत्म करे फिर आरक्षण खत्म होगा।
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
तटस्थपणे विचार करा - ब्रिजमोहन हेडा.
मागासवर्गियांना मिळणाऱ्या सवलतीबद्दल बोलताना अनेक लोक म्हणतात की कबूल की आमच्या पूर्वजांनी यांच्यावर अन्याय केला असेल. परंतु आता तर तो होत नाही ना? (वास्तवात हे विधानसुद्धा बरोबर नाही. पण कल्पना करू की हे विधान बरोबर आहे.) मग आता सर्वाना समान वागणूक का देण्यात येऊ नये? आम्ही चांगले गुण मिळवले तरी आम्हाला प्रवेश का नाकारला जावा? (सर्वांना समान वागणूक आज मिळते हे विधानसुद्धा अनेक प्रश्न उपस्थित करते.) परंतु हेही गृहीत धरले तरी एका प्रश्नाचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे. वाडवडिलांकर्फे वारसाहक्कात जशी संपत्ती मिळते तशीच त्यांची पापेही स्वीकारावी लागत असतात. संपत्ती घेऊ पण पापात भागीदार होणार नाही अशी भूमिका चालू शकत नाही.
मी पाप हा शब्द वापरला आहे तो धार्मिक अर्थाने नाही. पाप म्हणजे अन्याय अत्याचार याचे फळ, शिक्षा. माझ्या वडिलांनी जर खून केला असेल तर ज्याचा त्यांनी खून केला त्याच्या कुटुंबियांची घृणा मला सहन करावी लागेल. जर त्याची मुले लहान असतील तर माझ्या आर्थिक व शारीरिक कुवत असेल तर मी त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण ती जबाबदारी झटकू शकतो असे मला वाटत नाही. उलट ती जबाबदारी म्हणजे कर्ज असते. कर्ज झटकता येत नाही. घेणे झटकता येते कारण तो आपला हक्क असतो. पण जबाबदारी अशी झटकता येत नाही.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
माझ्या सख्ख्या लहान भावाची MBBS ची admission आरक्षणामुळेच फक्त एका मार्कांसाठी हुकलीय.म्हणून त्याला dentistry ला जावे लागले.दुर्दैवाने तसेच MDS लाही घडले. तरीही मी देशातील मागास लोकांचा विचार करून आरक्षणाला दोषी ठरवत नाही. शेकडो वर्षांपासून जर उच्च वर्णीयांनी शिक्षणाचेच नव्हे तर सर्व तर्हेचे आरक्षण उपभोगले आणि दलितांना शिक्षणापासून वंचित ठेवले तेव्हा त्यांना किती त्रास झाला असेल याची कल्पना केलेली बरी.जर 60 वर्षातच उच्चवर्णीयांना त्रास सहन करता येत नाही तर दलितांनी शेकडो वर्षे तो कसा काय सहन केला असेल ? म्हणून माणसाने स्वतः पुरता विचार न करता समाजाचा विचार करायला हवा, असे मला वाटते. मग त्यात आपल्याला त्रास झाला तरी त्यांना संधी उपलब्ध होण्यासाठी सहन करायलाच हवा.
समाजशास्त्रात एका प्रयोगासंबंधी मी वाचले. एक सामना सुरू होता. काही लोक एका चमूला प्रोत्साहन देत होते तर काही दुसऱ्या. सामन्यानंतर त्यांना पंचाचे काम कसे होते हा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा प्रत्येक चमूच्या पुरस्कर्त्यांनी पंच विरुद्ध बाजूकरिता पक्षपात भूमिका बजावत होते असे मत दिले. एकूण तटस्थपणे पाहणे आवश्यक असले तरी तसे पाहणे फार कठीण असते. आपले पूर्वग्रह आपल्याला नेहमीच प्रभावित करत असतात.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
एकदा बाबासाहेब घरी संविधान कलमांचा कच्चा आराखडा लिहत बसले होते तर. तेथे बँ पंजाबराव देशमुख हे कुणबी मराठा समाजाचे नेते आले. बाबासाहेब त्यांना म्हणाले
"दादा मी थोडा बाहेर फेरफटका मारून
येतो, तोपर्यंत तुम्ही हे संविधान कलमे वाचा व
सुधारणा सुचवा; मग बाबासाहेब थोडयावेळाने येतात तर पंजाबराव देशमुखांच्या डोळयात पाणी भरून येते ; तेव्हा बाबासाहेब विचारतात दादा का रडताय ? तर देशमुख उत्तर देतात, "भिमराव मी इथे ज्या मराठा कुणबी समाजाला
आरक्षणाची तरतूद तुम्ही संविधानात करा असे सांगायला आलो होतो ते तर तुम्ही सगळयांच्या अगोदर लिहून ठेवलय."
बाबासाहेब यांनी संवीधानाचा मसुदा तयार करुन संवीधान सभेत मांडला प्रत्येक कलमावर चर्चा होत होती नतंर आरक्षणावर चर्चा चालू झाली SC ST चे आरक्षण मिळवण्यासाठी बाबासाहेब यांना जास्त विरोध सहन करावा लागला नाही पण जेव्हा OBC साठी आरक्षण द्यायची वेळ आली तेव्हा बाबासाहेबांना भरपूर विरोधाचा सामना करावा लागला, पण ते बाबासाहेब OBC चे हक्क त्यांना मिळवून दिलेच.
बाबासाहेब यांनी मराठा समाजाला पण आरक्षण देण्याची तरतुद केली आणि मराठा समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आराखडा तयार केला. पण मराठयांचे आरक्षणाबाबत त्या वेळचे विचार काय होते ते कळले तर आज आश्चर्य वाटेल.कारण त्यावेळेसही अशीच आश्चर्याची गोष्ट घडली होती.
हाच मराठा समाज भलामोठा मोर्चा घेउन बाबासाहेब यांचा घरी गेला आणी बाबासाहेबांना त्यांचे म्होरके म्हणाले, "आम्ही ९६ कुळी... आम्ही राजे...आम्ही गावचे पाटील... आम्ही भिकारडे वाटलो का ? आम्हाला आरक्षणाची गरज नाही ."
बाबासाहेब यांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की, 'तुम्ही आज गर्भ श्रीमंत असलात तरी उद्या असणारच असे नाही. आज एका व्यक्तीकडे १०० एकर जमीन असली तरी ते उद्याचा काळात राहणार नाही. उद्या तुमच्या मुलाबाळात ती विभाजीत होणार... नतंर त्यांच्या मुलात... नंतर त्यांच्या पुढच्या पिढीत, असं करता करता ती एकदिवस नाहीशी होणार, म्हणुन मराठा समाजाला आज जरी आरक्षणाची गरज नसली तरी ती उद्या गरज पडणार, आणि ते मिळवुन द्या साठी मी नसणार.'
पण तरीही त्या मराठयांनी बाबासाहेबांचे ऐकले नाही, म्हणून ती तरतूद वगळून कुणबी मराठा म्हणजेच obc ची तरतूद केली.
आज मराठा समाज जेव्हा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरतो तेव्हा मला बाबासाहेब यांचा शब्दाची आठवण होते.प्रश्न असा निर्माण होतो की आजतरी मराठा समाज बाबासाहेब यानां समजुन घेणार का ???
संदर्भ : डॉ.बाबा साहेब आंबेडकर के संर्पक में 25 वर्ष . सोहनलाल शाश्त्री , k k पब्लिकेशन
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
@@"@@@@@@@@@@@@@@@@@
आरक्षण आणि असूया : जेट जगदीश. (^j^)
59 जातीच्या 15 % लोकासाठी SC कॅटेगिरी...
34 जातीच्या   7 % लोकासाठी ST कॅटेगिरी...
346 जातीच्या 53 % लोकासाठी OBC कॅटेगिरी...
89 जातीच्या 25 % लोकासाठी OPEN कॅटेगिरी
जी सिस्टीम आहे ती सर्वानुमते डॉ राजेन्द्रप्रसाद, नेहरु, चव्हाण, देशमुख ,मौलाना आझाद आदींनी स्विकारलेली आहे.
आजही नरेंद्र मोदी, नितीन गडकरी,मोहन भागवत,शरद पवार,प्रफुल्ल पटेल,पी. चिदंबरम, प्रणव मुखर्जी सह खुप लोकांना मंजुर आहे याकडे लक्ष द्यावे...
जे कॅटेगिरीत बसत नाहीत ते सर्व सिख,जैन, मुसलमान,ख्रिश्चन यांना कोणतेही नुकसान न पोहचवता आरक्षण दिले आहे...
काही लोक म्हणतात बाबासाहेबांनी फक्त
बौद्धांना सर्व आरक्षण दिले, आता आरक्षणाचा तक्ताच बघू...
संपूर्ण आरक्षण = 50%.
ओबीसी = 27%
NT+ ST = 10 %
SC = 13%
आता SC मधे 60 जाती त्यात 1 बौद्ध बाकीचे सर्व हिंदु म्हणजे बौद्धांना 50 % पैकी फक्त 0.21% आरक्षण आणी बाकीचे सर्व हिंदुना. तरीही उच्चवर्णीय शंख करणार की, बाबासाहेबांनी फक्त बौद्धांना सर्व आरक्षण दिले.यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा!
*दुसरा महत्वाचा मुद्दा* - आरक्षणाच्या टक्केवारीमुळे खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो अशी आरोळी ठोकणारे काही महाभाग आहेत. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण पन्नास टक्क्यांहून अधिक नसावे असे निर्देश दिले आहेत. NSSO च्या आकडेवारी(2006) नुसार देशातील सुमारे 25% लोकसंख्या SC/ST प्रवर्गात मोड़ते तर साधारणत: 40% च्या आसपास OBC प्रवर्ग. म्हणजे निव्वळ साधे बेरजेचे गणित लावले तरी सुमारे 65% लोकसंख्या मागास म्हणून गणली जाते. 65% मागास समाजासाठी 50% आरक्षण म्हणजे उरलेल्या 35% लोकसंख्येसाठी 50% जागा खुल्या प्रवर्गातून आहेत. ह्याचा अर्थ जितक्या जागा खुल्या प्रवर्गासाठी असायला हव्यात त्याहून अधिकच जागा उपलब्ध आहेत. तेव्हा खुल्या प्रवर्गावर अन्याय होतो ही बोंब मारण्यात कसले आले आहे लॉजिक?
SECC २०११ च्या रिपोर्टनुसार SC / ST लोकसंख्येत (SC 18.46%, ST 10.97%) मध्ये वाढच झाल्याचे निदर्शनास आले आहे . त्यामुळेच इथे जे ३५% ला ५०% चे प्रमाण आहे त्यातून हेच अजून सिद्ध होते कि मागास प्रवर्गातील "मेरिटहोल्डर" खुल्या प्रवर्गातून जरी पुढे आले तरी ह्या प्रमाणानुसार मागासेतर लोकांवर कोणताही अन्याय होतो असे सिद्ध होत नाही.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
कोण म्हणत अमेरिकेत आरक्षण नाही! अमेरिकेत सरकारी सोडा. खाजगीतही आरक्षण आहे . अमेरिकेत " प्रोटेक्टीव डिस्क्रिमिनेशन " ( Protective Discrimination =  याचा अर्थ अतिहुशार जे आरक्षणाला विरोध करतात अश्या महाभागांना माहित आहे का हा मोठा प्रश्न आहे.) नावाचा कायदा असून त्याच्या अंतर्गत एक डायवर्सिटी कमिशन ( Diversity Commission ) आहे . प्रत्येक खाजगी संस्थाना ह्या कमिशन समोर दरवर्षी असा रिपोर्ट / अहवाल सादर करावा लागतो कि आमच्या संस्थेमध्ये कोणताच वंशिक आणी जातिगत भेदभाव होत नाही . अश्या प्रकारे अमेरिकेतही आरक्षणाचा कायदा प्रोटेक्टिव डिस्क्रिमिनशनच्या माध्यमातून लागू आहे .
भारतात आरक्षण आहे कारण भारतात जातिव्यवस्था आहे. अमेरिकेत आरक्षण नाही कारण तिथ समाजव्यवस्था आहे . जिथ Casteism असते तिथ आरक्षण असते .आणी जिथ Resism असते तिथ आरक्षण नसते .हे समजण्यासाठी आपल्याच डोक्यात आपलाच मेंदू लागतो. भारतीयांच्या दुर्दैवाने डोकं आपलं आहे मात्र मेंदू भटाचा आहे . खरे दुखणे हे आहे की,दलित शिकले आणि सावर्णांच्या मांडीला मांडी लावून बसायला लागले ह्याबद्दल सवर्णांच्या मनात एक सूक्ष्म असूया आहे. म्हणून आरक्षणाला विरोध करून ती बाहेर पडते. म्हणतांना म्हणायचे की,'आम्ही जाती पाळत नाही', पण मनातून मात्र म्हणणार, 'माजले आहेत साले सरकारी ब्राह्मण.' दाहक आहे पण वास्तव आहे, म्हणूनच ऍट्रॉसिटी आणि आरक्षण विरोधी पेटलेला हा विस्तव आहे.  - जेट जगदीश.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
*आरक्षण आणि वास्तविकता*
भारताच्या जातवास्तवाची जाणीव करून घेताना आरक्षण हा विषय चर्चेत येतोच येतो. हा शब्द ऐकला तरी हल्ली सरळ दोन गट पडले जातात. एक आरक्षणाचे समर्थन करणारे आणि दुसरा आरक्षणाकडे अत्यंत कुत्सित नजरेने पाहणारे, इक्वालिटीचा आवाज चढवून बेंबिच्या देठापासून विरोध करणारे, व्हाट्सऐप फेसबुक आणि इतर सोशल मिडियाच्या माध्यमातून आरक्षणावर जोक्स शेयर करणारे सो कॉल्ड विकासाभिमुक जनरेशन. ह्या दुसऱ्या गटातील बहुतांश लोक किंवा विचारवंत हे आरक्षणाला समर्थन करने म्हणजे जातीयवादाला समर्थन करणे, गुणवत्तेला डावलने असे समजतात. फ़क्त आर्थिक निकषावर आरक्षण लागू करणे आणि कालांतराने तेही संपूर्ण बंद करून निव्वळ शुद्ध गुणवत्तेच्या आधारावर व्यक्तीला संधी उपलब्ध करून देणे अशी ढोबळ थियरी आरक्षणाला विरोध दर्शवणारे मांडतात. ह्यांचा अजुन एक प्रतिवाद असा असतो की गेल्या साठ वर्षात आरक्षणाचा दरवाजा उघडा ठेवून अमाप समानतेच्या संधी उपलब्ध करून दिल्या असताना, दैनंदिन व्यक्तिगत आयुष्यातून जातिभेद नष्ट(?) होत असताना आता एकविसाव्या शतकात आरक्षणाची गरजच ती काय, आरक्षणामुळेच जात अजुन टिकून नाही का वगैरे. शहरी, महानगरी भागातील विशेषतः सवर्ण तरूण ह्या मागणीसाठी जोरदार बोंब् ठोकतात. आरक्षण असलेच तर ते फक्त आणि फक्त आर्थिक तत्वावर असावे अशी ह्यांची धारणा असते.
भारतीय संविधानातील आरक्षण ही तरतूद व्यक्तिकेंद्रित नसून सामाजिक प्रतिनिधित्वाची सामाजिक न्यायाची तरतूद आहे. कोणत्या विकसित देशात आरक्षण आहे का अशी बालिश विचारणा आरक्षणविरोधक मंडळी करतात. त्याच वेळेस ते हे सोईस्कर पने विसरतात की जगातल्या कोणत्याच विकसित देशात भारताइतकीच भयान जातीय उतरंड नाही! अफ्रीकन अमेरिकन, हिस्पेयिन अमेरिकन, अश्वेत ह्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व देण्याची तरतूद अमेरिकेच्या एफर्मेटिव एक्शन पॉलिसी मध्ये आहे. क्यानडा,जपान, चीन सारख्या देशातही अल्पसंख्याक समूह, ऐतिहासिक सामाजिक बहिष्कृत समजले जाणारे लोकसमूह ह्यांच्यासाठी विविध पॉलिसीजची तरतूद आहे. आरक्षण हा गरीबी हटाव प्रोग्राम, रेशन धान्य वाटप किंवा एलपीजी सब्सिड़ी नाही हे आरक्षणविरोधकांच्या ध्यानात येत नाही.
चातुर्वण्याच्या पायावर रुजलेल्या, हजारो जातींनी दुभंगलेल्या देशातली गरीबी ही केवळ देशाच्या आर्थिक स्थितीचा परिपाक नसून सामाजिक धार्मिक इतिहासाचा परिपाक आहे हे कटु वास्तव आहे. आकडेवारी काढ़ायचीच झाली तर चतुर्थ श्रेणी कामगार, सफाई कामगार, मैला उचलून नेणारे, भूमिहीन शेतमजूर ह्यांची जात कोणती ते पाहावे, आरक्षणाच्या असूनसुद्धा नोकऱ्यांमधील कधीही न भरला जाणारा मागासवर्गीय जागांचा अनुशेष पाहावा, आणि जात आजकाल कोणी मानत नाही म्हणणाऱ्यांनी दलित हत्याकांडाची भीषणता पाहावी. हजारो वर्षे ज्या व्यवस्थेने खालच्या जातितले म्हणून लोकांना शिक्षण नाकारले, रोजगाराच्या नव्या संधीपासून वंचित ठेवले, ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या तटबंदीतून जातीयस्तरामुळे आर्थिक विकासाच्या संधी नाकारल्या, त्या व्यवस्थेच्या दयनीय आजारावर जातीवर आधारित आरक्षण हाच एकमेव उपाय आहे. आर्थिक तत्वावर आरक्षण ही संकल्पनाच् मुळात हास्यास्पद आहे. उद्या विजय मल्ल्या किंवा सुब्रतो राय पूर्ण भिकेला लागले, जागतिक मंदी येऊन त्याच्या धडाक्यात महिना लाखभर पगार घेणारे लाखो इंजीनियर घर नोकरी गमावून बसले, शेयर बाजाराच्या बैलाने लाखो गुंतवणूकदारांना शिंगावर घेतले, आज कौन बनेगा करोड़पती मध्ये पाच करोड़ जिंकलेला उद्या लासवेगास मध्ये माती खाऊन आला, अंगावर पचास तोला मिरवनारा भाई सोने चोरीला जाऊन भनंग झाला, ह्या सगळ्यांना आर्थिक तत्वावर आरक्षण मिळेल काय?? मुळात कोणता व्यक्ति केव्हा कसा गरीब होतो, कसा श्रीमंत होतो ह्याचा इत्यंभूत अद्ययावत ट्रैक रेकॉर्ड ठेवणे शक्य आहे काय? बीपीएल कार्डाचा इतिहास सर्वांनाच ठाऊक आहे. चिरिमिरि देऊन व्यवस्थेशी साटलोट करून बीपीएल कार्ड मिळवने, हव्या त्या उत्पन्नाचे हवे तितके दाखले मिळवने हे व्यवस्था दावनीला बांधणार्यांना, उच्च सामाजिक स्तरातल्या गबरगंडाना काहीच अशक्य नाही. तेव्हा आर्थिक आधारावर आरक्षण हे किती धोकादायक असू शकते ह्याचा विचार करावा.
*तीसरा मुद्दा* - गुणवत्तेचा. वैदिक काळापासून पुष्पक विमाने उडवणाऱ्या ह्या देशातल्या तथाकथित मेरिटहोल्डर बुद्धिवंतांची लायकी काय हे वेगळे सांगायची गरजच नाही. नुसत्या टक्केवारीवरून हुशारी ठरवणाऱ्या मेरिटहोल्डर लोकांनी स्वत: हजारो वर्षांचे आरक्षण फुकट भोगुन कोणते देशोपयोगी शोध लावले आहेत हे जगज्याहिर आहेच. शैक्षणिक प्रवेशाच्या वेळीस जरी गुणांची अट शिथिल असली तरी आरक्षित कोट्यातून आलेली बहुतांश मुले ही सामाजिक भौतिक दृष्टया निम्नस्तरातून, कोचिंगक्लास च्या रेडीमेड पायजम्यात् पाय न घालता, कोणत्याही अभ्यासपूरक साधनसुखसोयींशिवाय, कष्टकरी वर्गातून आलेली असतात. गुणांची अट शिथिल असली म्हणून तशीच पासिंगच्या मार्कात, परीक्षेतल्या प्रश्नात सवलत असावी अशी मुर्ख मागणी कोणीही करत नाही. मागास प्रवर्गातील काहीजन खुल्या प्रवर्गातील जागा बळकवतात हा देखिल एक सर्रास आरोप केला जातो. हा निव्वळ मेरिटच्या नावाखाली केला जाणारा तर्कदुष्ट बुद्धिभेद आहे. नमूद केलेल्या प्रवर्गाच्या आकडेवारीनुसार "जागा बळकवतात" हा आरोप आपोआपच गैरलागु होतो. आरक्षण विरोधकांचे नेमके दुखने काय आहे? मागास वर्गातील मागास मेरिटहोल्डरने जागा बळकावली हे दुखने आहे की आरक्षण हेच दुखने आहे? मेरिटच्या नावाखाली आरक्षणाला काड़ी लावू पाहणाऱ्या विचारवंतांनी हा अंतर्विरोध स्वताशी एकदाचा नीट स्पष्ट करून घ्यावा.
२०११ ची न्यायपालिकेतल्या प्रतिनिधित्वाच्या आकडेवारीनुसार हायकोर्ट च्या ८५० जजेस पैकी केवळ २४ अनुसूचित जाती जमाती मधून आहेत. त्यातही देशातल्या २१ हायकोर्ट पैकी १४ हायकोर्ट मध्ये एकही अनुसूचित जाती जमाती मधील जज नाही. ह्यातूनच अजून एक भीषण बाब सिद्ध होते ती हि कि सरकारदरबारी क्लास वन पोझिशन्समध्ये जरी मेरिटहोल्डर बुद्धिवान मागासवर्गीय असला तरी कास्ट-डीस्क्रिमिनेशन हा मुद्दा बढती मध्ये महत्वाचा अडथळा ठरतो. दर चार भारतीयांमागे एक भारतीय कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जातीयता पाळतो ही नोवेंबर 2014 अखेरीस जाहिर झालेली इंडियन ह्यूमन डेवलपमेंट सर्वे च्या आतापर्यन्तच्या सर्वात मोठ्या सर्वेमधली आकड़ेवारि, सामाजिक जातीय शोषणाची पाळेमुळे भारतात किती खोलवर रुजली आहेत हे दर्शवते. ह्या सर्वेमधून निदर्शनास आलेली आणखी एक महत्वाची बाब म्हणजे आर्थिक उत्पन्नाचा आणि दैनंदिन आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरुपात जातीयता पाळण्याचा थेट संबंध जोड़ता येत नाही. अधिक आर्थिक उत्पन्न म्हणजे कमी सामाजिक शोषण हा संबंध जोड़ने इथे पुन्हा फोल ठरते. त्यामुळे आर्थिक तत्वावर आरक्षणाची मागणी करणा-यांचे सामाजिक आकलन किती तोकडे आहे ह्याची प्रचिती वारंवार येते.
ज्या देशात आजही भंगी, महार, मांग, आदिवासी, पारधी ह्या जातींच्या नावाने थट्टाजनक उदगार् काढले जातात त्या देशात घटनेत नमूद केलेले स्वातंत्र्य समता बंधुत्व किती रुजले आहे ह्याचा विचार "आर्थिक तत्वावर आरक्षण" अशी फोल मांडणी करू पाहणाऱ्या विचारवंतांनी करावा. आरक्षण ही कुबड़ी नाही तर ते वंचितांना लेवल प्लेयिंग फिल्डला आणनारे समतेच्या तत्वाचा पुरस्कार करणारे घटनात्मक प्रभावी शस्त्र आहे. आणि जोपर्यन्त जातीयतेचा राक्षस ह्या देशात जिवंत आहे तोपर्यंत हे शस्त्र "आर्थिक तत्वाची धार" लावून बोथट करण्याचा अट्टाहास करणे हे असंवैधानिक आहे. - मयूर लंकेश्वर.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
जातीय आरक्षण आणि धार्मिक आरक्षण
- डॉ. अभिराम दीक्षित, मुंबई
जातीय आरक्षण आणि धार्मिक आधारावरच आरक्षण - यात जमीन आस्मानाचा फरक आहे. हा फरक कुणीच नीटपणी ध्यानात घेत नाही. आरक्षणाचे समर्थक दोन्ही प्रकारच्या  आरक्षणाला पाठिंबा देत रहातात, आणि विरोधक दोन्हीला विरोध करत रहातात. म्हणून ज्यांना आरक्षण मिळतय ते त्याच्या बाजूचे आणी मिळत नाही ते विरोधक अशी स्पष्ट विभागणी होते ! काही अपवाद असतात, पण मोजकेच. त्याहून धक्कादायक म्हणजे , भारताचे संविधान, त्यातले धर्मस्वातंत्र्य , सेक्यूलर, सर्वधर्मसमभाव आणी धर्मनिरपेक्षता याबद्दल सर्वांनीच दाखवलेले भीषण अज्ञान!
आरक्षणाच्या विरोधक आर्थिक आरक्षणाचा बूट वारंवार उगारतात. सगळ्याच गरिबांना आरक्षण द्या वगैरे वगैरे. आरक्षण म्हणजे काय - गरिबी हटावचा सरकारी कार्यक्रम वाटला की काय तुम्हाला ? का भीक वाटली ? गरिबांना मदत म्हणून भरपूर सरकारी योजना असतात. वेगळ्या रंगाच रेशनकार्ड असतं,  सबसिड्या असतात. बहुसंख्य दलित गरिब आहेत हे खरे आहे.  पण ते गरीब आहेत म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं नाही. सामाजिक गरजेतून दिलेलं आहे. बरं, आरक्षणाची सुरवात कोणी केली ? आंबेडकरांनी ? अजिबात नाही ! शाहू महाराजांनी ? बिल्कूल नाही ! आरक्षणाची सुरवात केली भगवान मनूनी ! किती टक्के ? तर १०० %...कोणाला ? तर उच्चवर्णीयांना! हे विपरीत आरक्षण होतं मित्रांनो!! ब्राह्मण, क्षत्रीय आणि इतर पुढारलेल्या जातींनी गेली हजारो वर्षे या विपरीत आरक्षणाची मजा घेतली!!! १००% सत्ता, १००% धर्माधिकार, १००% न्यायव्यस्था, १०० % उच्च उत्पादनाचे उद्योग, १००% शेतजमीनी  गेली हजारो वर्षे ठराविक जातींच्याच हातात होत्या.
समजा, घोड्यांची शर्यत लावली. सगळे घोडे तगडे. एक मात्र लंगडा. मुद्दाम लंगडा केलेला घोडा. कुणी केला त्याला लंगडा ? तर तगड्या घोड्यांनी. ही काय स्पर्धा झाली ? मेरीट माय फूट ! त्या लंगड्या घोड्याला आरंभरेषेच्या थोडं पुढे उभ करावं लागेल. तेंव्हाच खरी स्पर्धा होईल. हे आहे सामाजिक आरक्षण. २२.५ %. लोकसंखेच्या प्रमाणात. दलित आणि  आदिवासिंना , भटक्या आणि विमुक्तांना दिलंय. रेषेच्या पुढं उभ केलंय. काय चुकलं ? गेली हजारो वर्षे अभ्यासाची परंपरा नाही. पाढे बापानी शिकवले नाहीत. आईने अभ्यास घेतला नाही. देवळात यायला बंदी. शिकायला बंदी. अस्पृष्यता. मग रेषेच्या पुढे उभं करायाला काय हरकत आहे ? त्यालाच म्हणतात सामाजिक आरक्षण. सरकारी जावई न्हवे... दुबळा भाऊ म्हणा.
दुसरी गोष्ट आर्थिक आरक्षणाची. तेही आहेच की दिलेलं . फक्त गरीब व्यक्तींना ते दिलेलं नाही. गरीब जातींना दिलंय. त्याला म्हणायचं ओ. बी. सी. आरक्षण. गरीब व्यक्तींना कसं देणार आरक्षण ?  गरीब शोधायचा कसा ? माझ  हॉस्पिटल आहे. भावाचा कारखाना आहे. बायकोच्या नावावर काही नाही. ती झाली की गरीब !  माझ हॉस्पिटल बायकोच्या नावावर केलं की मी झालो गरीब !! समजा एक श्रीमंत व्यापारी आहे. सोन्याच्या दागिन्यांच दुकान आहे त्याचं. . . डान्स बार मधे उधळल्या - गड्याच्या गड्या -  नोटांच्या. दारू प्याला, शौक केला, बाई ठेवली, उधळले सगळे पैसे. झाला गरीब. बोला... देणार त्याला आरक्षण ? एक महा मूर्ख आहे महिपतराव , एक आळशी  आहे सुस्तराव ... दोघेही गरीब आहेत. देताय आरक्षण ह्या दोन रावांना  ? म्हणे आर्थिक आधार ! सरसकट गरीबांना आरक्षण देता येत नाही हो. तो का गरीब झाला हे पहावं लागतं. तो त्याच्या वैयक्तिक दुर्गुणांमुळे गरीब आहे का ? की त्याला संधी नाकारलीय व्यवस्थेनं... श्रीमंत होण्याची संधी.
भारतात जातिव्यवस्था आहे. ते एक भयानक वास्तव आहे. जेंव्हा जातीच्या जाती गरीब रहातात. तेंव्हा नक्कीच त्याना संधी नाकारलेली असते...समाजानं... व्यवस्थेनं. अरे सुतारानं सुतारच राहायचं,लोहारानं लोहार,जास्त पैसे मिळणारे धंदे करायचेच नाही त्यानं. कोणी नाकारली संधी ? -  पैसे मिळवण्याची संधी? व्यवस्थेनं! म्हणून अनेक जाती गरीब राहिल्या. मग आला मंडल आयोग. मंडल न काय केलं ? निकष लावले. आर्थिक, सामाजिक आणी शैक्षणीक . (आसाशै ) मंडलने पहाणी केली सगळ्या जातींची. शिक्षणाचं प्रमाण कुठल्या जातीत कमी आहे ? कोणत्या जाती गरीब आहेत ? त्यांना म्हटलं ओ.बी.सी. आणि दिलं आरक्षण. या ओबिसीत माळी आणि कुणबी यासारख्या शेतकरी जाती आहेत. दैवेज्ञ ब्राह्मण ही उच्चवर्णीय जात ही आहे ओबीसी आरक्षणात. तेंव्हा गरीब किंवा मागास उच्चवर्णीयांना आधीच आरक्षण मिळालेलं आहे.  पुन्हा द्यायचा प्रश्नच कुठे येतो ?  तेंव्हा लक्षात ठेवा आर्थिक आधारावर आरक्षण व्यक्तीला देता येत नाही. गरीब जातीना देता येत  - ते दिलेलंच आहे. मग आर्थिक आरक्षणाचा बूट काय म्हणून?
जातिय आरक्षणाचा काही काही व्यक्तीना गैर फायदा होतो म्हणे. मागासवर्गीय कलेक्टरचा मुलगाही आरक्षण मिळवतो. अरेच्च्या पुन्हा तेच तेच. जातिच्या लॉब्या असतात की नाही ? ज्यांच्या लॉब्याच नाहीत सत्ताकारणात. त्यांना पुढे आणायला आहे आरक्षण. ते व्यक्तीला नाहीच -  समाजाला आहे. बटाट्याची तुलना बटाट्याशी करा हो - टोमेटोशी नको. जर ठराविक समाजाला आरक्षण आहे तर - व्यक्ती गैरफायदा मिळवतेचा -  टॉमेटो आणला कुठून ?  हरेक व्यक्तीच्या मागासपणाची कारण शोधणं सरकारला शक्य नाही. जातींच्या मागासपणाची कारणं शोधता येतात आणि त्यावरचा उपाय म्हणजे आरक्षण. मग विचारता हे संपेल कधी ? प्रश्न विनोदी आहे. आरक्षण म्हणजे सत्ताकारणातला न्याय्य वाटा. तो संपायला कशाला पाहिजे ? जेव्हढे टक्के हक्काचा वाटा आहे. तो मिळालाच पाहिजे. कायम.निरंतर.मिळाला पाहिजे आणि  अनुशेष म्हणजे काय ? मागासांना आरक्षण आहे २२.५% + २७.५ % ओबीसींना = ४९ %.
एकूण आरक्षण ४९ %
बरं, हे आरक्षण कागदावर आहे. खरोखर जागा भरल्या किती ? दिल्लीत कॅबिनेट सचीव दर्जाच्या ९६ पोस्ट आहेत. दलित किती त्यातले १ ...फक्त एक! म्हणजे एक टक्का!! ओबीसी कीती ? अ ग्रेडचे केंद्र सरकारी अधिकारी घेतले तर त्या ओबीसी ४% हून कमी आहेत. म्हणजे ४९% आरक्षण फक्त कागदावर आहे. प्रत्यक्षात ते आलेलंच नाही. राखीव जागांचा अनुशेष भरून काढणे अजून बाकी आहे. आधी अनुशेष भरा नंतर तोंड वर करून विचारा की - संपेल कधी ? पदोन्नती मध्ये आरक्षण दिलं पाहिजे ते म्हणूनच. अनुशेष भरण्यासाठी.
घरात घुशी झाल्या म्हणून कोणी घर जाळत नाही. तस  कुठल्याही सरकारी योजनेत काही दोष रहाणारच. म्हणून कुणी योजनाच बंद करत नाही. शिवाय श्रीमंत ओबीसींना म्हणजे क्रीमी लेयरला आरक्षणाचे लाभ मिळतही नाहीत. तशी तरतूदच कायद्यात आहे. प्रथम अनुशेष भरला पाहिजे. सत्तेत हक्काचा वाटा मिळाला की हळूहळू लंगडा घोडा तगडा होईल. स्वतःच्या हिमतीवरच पळू लागेल. स्पर्धा करेल ओपनशी. माझ्या एका मित्राची गोष्ट. विजय. तो ओबीसी आहे. ओबीसीच्या सीटांचे मार्क क्लोज झाले ओपनच्या वर. त्याला आरक्षणाचा काहिच उपयोग झाला नाही. ओपनलाही काही तोटा नाही. त्या कॉलेजपुरतं तरी -  आरक्षण नसल्यातच जमा आहे. या एव्हढ्या शर्यतीपुरता घोडा तगडा झालाय. आरक्षण अस संपतं. आपोआप!
ओबीसी आणि एस.सी. या दोन्ही आरक्षणाचे हेतू भिन्न आहेत . ओबिसीना  (आसाशै ) आणि एस.सी. ना अस्पृश्यता आणि शोषण याविरुद्ध आरक्षण आहे .
१) ओबीसी आरक्षण हे प्रामुख्याने (आसाशै ) आर्थिक/सामजिक /शैक्षणिक मागास जातीना दिले आहे. (मंडल आयोग क्रायटेरिया ) माळी , साळी,   कोळी,  सुतार,  दैवज्ञ ब्राम्हण अशा बारा बलुतेदार  जाती ओबीसीत येतात. यांचे  (आसाशै ) उत्थान झाले कि क्रिमी लेयर लावून वगळता येते. कारण ज्या  क्रायटेरियावर आरक्षण दिले आहे - त्याची पूर्तता होते
२) एस.सी. / एस.टी.चे आरक्षण हे पूर्व अस्पृश्य  शोषित आणि दुर्लक्षित जातीना आहे. यात नवबौद्ध , महार , मांग , चांभार, ढोर , आदिवासी या जाती येतात   त्यांचे (आसाशै ) उत्थान झाले तरी इतरांच्या  (मनातली ) अस्पृश्यता - शोषण आणि हलके मानले जाणे संपत नाही - भेदभाव तसाच राहतो -  म्हणून  एस.सी./ एस. टी.ला (आसाशै ) क्रिमी लेयर लावता येत नाही . यावर य.दी. फ़डकेंच्या "खरी ही न्यायाची रीती"   या पुस्तकात  विस्तृत विवेचन आहे.
मुस्लिम आरक्षण.
आता आपण धार्मिक आरक्षण विषयावर येवू.  म्हणजे मुस्लिम आरक्षण. कारण मुसलमान अल्पसंख्यातले बहुसंख्य आहेत. मुस्लिमांना आरक्षण द्यावे का ? दिल्यास भारतातली एकात्मता वाढेल का कमी होईल ?
संविधान आणि सर्वधर्म समभाव हा विषय प्रत्येकाने चघळला आहे,आणि प्रचंड घोळ घातला आहे. सभ्य स्त्री-पुरुष हो, आपल्या राज्यघटनेत सर्वधर्मसमभाव नाही. धर्म पाळण्याचे स्वातंत्र्य ही घटनेत नाही.  घटनेत सेक्यूलारिझम आहे. सर्वधर्मसमभाव आणि सेक्युलारिझम या एकमेकांच्या विरुद्ध गोष्टी आहेत.सर्वधर्म समभाव - सर्व धर्म सारखेच आहेत. त्यांची शिकवण एकच आहे. सर्व देव नमस्कारः केशवं प्रति गच्छती -  ही हिंदुधर्माची शिकवण आहे. संविधानातला कायदा न्हवे ! उलट जाहीर धर्मपालनाचे कोणतेच हक्क संविधान देत नाही. भारताच्या राज्यघतनेत सेक्युलारिझम आहे. म्हणजे इहवाद आहे. कुठल्याही धर्मावर तुम्ही श्रद्धा ठेवू शकता. प्रेम करू शकता पण कसं ? मनातल्या मनात ! तुम्ही म्हणाल आमच्या धर्मात अस्प्रुश्यता आहे. आम्ही ती पाळणार... नाही चालणार!
तुम्ही म्हणाल आमच्या कुराणात लिहिलंय . मूर्त्या फोडा...काफरांविरुद्ध जिहाद करा.म्हणा की,पण मनातल्या मनात म्हणायचं. खरोखर कुणी जिहाद करू लागला तर नाही चालणार!
धर्माच्या चिकित्सेत संविधान शिरत नाही. पण २५ व्या कलमात बजावून सांगतं - धर्म पाळायचा पण मनातल्या मनात. इहलोकात कसं जगायचं ते कायदा ठरवेल. लग्नाच वय किती असावं ते कायदा ठरवेल,धर्म नाही.
संविधान नावाची अप्सरा हातात आसूड घेऊन उभी आहे . मनातल्या मनात धर्म पाळा की ! पण तुमच्या घरात - नाही - नाही तुमच्या बेडरुम मध्ये किती बायका असाव्यात ? त्याच्याशी कसा व्यवहार करावा ? हे कायदा ठरवणार आहे . तुम्ही तुमच्या धर्माचे किती पालन करावे ? हेही कायदा ठरवणार आहे !
सर्व धर्म चांगले आहेत ते जवळ घ्या म्हणजे सर्वधर्म समभाव. शासकीय निर्णयातून धर्म वगळा. धर्म दूर ठेवा म्हणजे सेक्यूलारिझम. म्हणजेच इहवाद. हा सेक्युलारिझम आपल्या संविधानाचा पाया आहे, आणि अशा प्रकारचा पारलौकिक श्रद्धेसाठीचा कोणताही धर्म तुम्ही पाळू शकता. नवा धर्म बनवू शकता. धर्म बदलू शकता. धर्मांतराचे स्वातंत्र्य ही आहे.(पण मनातल्या मनात.) आता मला सांगा. शासकीय निर्णयात धर्म आणायचा नाही हाच जर सेक्युलारिझमचा अर्थ आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे काय देता येईल ? दुसरं धर्म ही ऐच्छीक गोष्ट आहे. धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य आहे तर धर्मावर आधारित आरक्षण कसे देता यील ? नीट विचार करा. समजा मुस्लिमांना आरक्षण दिलं. तर मुस्लिम कोण ? हे ठरवायचं कसं ? सुन्नी म्हणतात की शिया हे खरे मुसलमान नाहीत. कादियानी / अहमदिया पंथाचे लोक खरे मुसलमान नसून ते काफिर आहेत. त्यांच्या विरुद्ध जिहादचे फतवे ही निघतात पाकिस्तानात. मुसलामान कोण ? व्याख्या काय मुसलमानाची ? नाव ? समीर आणि कमल नावाच्या मुसलमानांना मी ओळखतो. अंतुले आडनावाचे मुसलमान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते.  सरकारने मुसलमानाची पहिल्यांदा व्याख्या करावी लागेल. टोपी, दाढी, नमाज हे सर्व नाकारणारेही मुसलमान असतातच.म्हणजे शेवटी सरकारला अ‍ॅफीडेव्हीट घ्यावे लागेल की मी मुसलमान आहे. आणी मगच आरक्षण देता येईल.
पण गोची अशी आहे की घटनाकारांनी धर्म बदलण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.  आरक्षण मिळवण्यासाठी मी काय करावे ? एक अ‍ॅफीडेव्हीट करावे. मी मुसलमान आहे. आरक्षणाचा लाभ मिळाला की, पुन्हा धर्म बदलावा. हिंदू व्हावे. आता सरकार काय करणार ? माझी नोकरी काढून घेणार ? बरं, मी समजा गुप्तपणे धर्म बदलला... अगदी गुपचूप.  तर सरकारला कसे कळणार ? आरक्षणाचा लाभ मिळालेले लोक इस्लाम पाळतात का ? यावर लक्ष ठेवण्यासाठी सरकार मौलवींची कमीटी नेमणार आहे काय ? अहो दिवसातून पाच वेळा धर्म बदलता येतो. एक  अ‍ॅफीडेव्हीट तयार केले की, खेळ खलास. जी गोष्ट ऐच्छीक आहे ती गोष्ट कुठल्याही सवलतीसाठी अट म्हणून घालता येत नाही. एवढी साधी गोष्ट सरकारला कळू नये.जातीचे खोटे दाखले मिळवून सवलती लाटणार्यांवर कायदेशीर कारवाई करता येते. कारण जात बदलता येत नाही. त्यात जन्म घ्यावा लागतो. पण धर्म ही ऐच्छीक बाब आहे. त्यावर आधारित सवलती देता येत नाहीत. धर्मांतराचे स्वातंत्र्य आणि धार्मिक आधारावर सवलती एकाच वेळी कशा देता येतील ?
सर्वात महत्वाचं म्हणजे आज मुस्लिमांना आरक्षण आहेच. मुस्लिमातल्या मागास जातींना आरक्षणाचा लाभ मिळतोच आहे. सर्वच धर्मातल्या मागास आणि गरीब जातींना आरक्षण आहे. ते तसेच राहिले पहिजे. पण सरसकट सर्व मुस्लिमांना आरक्षण मिळू शकत नाही. कोणत्याच धार्मिक आधारावर आरक्षण मिळू शकत नाही.मुस्लिमांना समजायला हवं कीधार्मिक आधारावरचं आरक्षण घटनाविरोधी तर आहेच, पण ते देता येणंही अशक्य आहे. त्यामुळेच ते कोर्टात टिकणार नाही. सरकार तुम्हाला उल्लू बनवते आहे, हे जेवढ्या लवकर लोकांच्या लक्षात येईल तो सुदिन!
**********************
भारतात एकूण *6743*च्या वर जाती आहेत.खालील माहीतीमध्ये सामाविष्ठ जाती या महाराष्ट्रापुरत्या मर्यादित आहेत. (संकलीत माहिती)
1)  *SC*
     (अनुसुचित जाती)
     एकूण जाती - *59*
     आरक्षण - 13%.
2)  *ST*
       (अनुसुचित जमातीं)
       एकूण जाती - *47*
       आरक्षण - 7%.
3) *OBC*
       (इतर मागासवर्ग)
       एकूण जाती - *349*
       आरक्षण - 19%.
4) *SBC*
      (विशेष मागासवर्ग)
      एकूण जाती - *7*
      आरक्षण - 2%.
5)  *VJ*
        (भटक्या जमाती 'अ')
        एकूण जाती - *14*
        आरक्षण - 3%.
6)  *NT - B*
        (भटक्या जमाती 'ब')
        एकूण जाती - *35*
        आरक्षण - 2.5%.
7) *NT - C*
  (भटक्या जमाती - क)
    एकूण जाती - *01* (धनगर), आरक्षण - 3.5%.
8) *NT - D*
      (भटक्या जमाती - ड)
       एकूण जाती - *01* (वंजारी), आरक्षण - 2%.
*एकूण आरक्षण - 52%.*
*व ते घेणाऱ्या एकूण जाती - 510.*
त्यातील अनुसुचित जातीसाठी 13% आरक्षण. व ते घेणाऱ्या एकूण जाती - *59*.
तर फक्त बौध्द समाजाचा (आंबेडकरी) आरक्षणाचा टक्का काढला. तर तो *पूर्णाकात नव्हें तर पॉंईंटमध्ये येतो....... "म्हणजे एक टक्काही नव्हें".*
तसेच *Atrocity* कायदयाचे संरक्षण आहे. अशा अनुसूचित जाती (59) व अनुसूचित जमाती(47). म्हणजे एकूण = *108 जाती* येतात.
  म्हणजे *सुधारणाच काय ? हा कायदा रद्द जरी झाला, तरी त्याचे दूष्यपरीणाम या सर्व 108 जातींना भोगावे लागतील*... एकटया बौध्दसमाजाला नव्हें.
असे सर्व *वास्तव* असतानाही सगळ्यांच्या डोळ्यात येतो तो *बौध्दसमाज.* व यांनीच सर्वांच्या नोकऱ्या पळविल्या *असा गुडघ्यात मेंदू तर्क* लावला जातो.

स्वपरिचय

नाव: जगदीश काबरे.
भ्रमण्ध्वनी: 9969626682
                   9820197680
ईमेल : jetjagdish@gmail.com
जन्मतारीख: 1/10/1951
शिक्षण: B. Sc.,B. Ed.
जगदीश काबरे सर हे वैज्ञानिक विषयांवर लेखन करणारे एक मराठीतील एक लेखक आहेत. त्यांनी एकूण ३६हून अधिक मराठी विज्ञानविषयक पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांपैकी 'शून्याचा प्रवास' या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला आहे. त्यांची अनेक पुस्तके मुलांसाठी आहेत. हे शाळेमध्ये विज्ञान शिक्षक आहेत.
1) लोक विज्ञान संघटना, अंधश्रद्धा निर्मूलन चळवळ, मराठी विज्ञान परिषद, ग्रंथाली चळवळ यामाधून 1985 ते 2005 सालापर्यंत सक्रिय सहभाग. त्यासाठी महाराष्ट्रभर भ्रमंती.  खगोल मंडळाचे संस्थापक अध्यक्ष. सध्या "ब्राईट" या नास्तिक विचाराच्या कार्यकर्त्यांबरोबर सक्रिय.
2) BEST TEACHER award given by :
i] Navi Mumbai Mahanagar palika.(1997)
ii] Chaturang Pratishthan.(1985)
iii] Yashwant Ramkrishna Pratishthan.(1984)
3) State government award for the best book of the year "SHOONYACHA PRAVAS" published in 1993.
4) Award given on regional level for the best SCIENCE EXIBIT in 1983 &1984.
5) SAMAJ BHUSHAN award given by Ashokpushp publication, Navi Mumbai in 2014.
6) CHARVAK AWARD given by *Bright* group, in Mumbai on 26/03/2016.
7) विज्ञान-जागृती-वर्धक लेख अनेक नियतकालिकांतून आणि संकेतस्थळावरून प्रकाशित होत असतात.
8) ते शाळाशाळांमधून मुलांसाठी "विज्ञान खेळ" नावाचा जादू वाटावी असा मंचीय प्रयोगही करतात.(आत्तापर्यंत असे 1236 कार्यक्रम झाले आहेत.)
9) आकाशवाणी आणि दूरदर्शनवर अनेक कार्यक्रम प्रसारित.
10) 1989 ते 1990या काळात दर सोमवारी दिल्ली दूरदर्शनवरून "विज्ञान के खेल" ही मालिका सादर केली.
जगदीश काबरे यांनी लिहिलेली काही पुस्तके......
*अतूट नाते रक्ताचे
*अवकाशयात्रेची पूर्वतयारी
*असे का बरे !
*आज असं घडलंय : विज्ञान जगतात (माहितीपर)
*साधेच की अद्भुत
*चंद्रशेखर व्यंकट रमण (चरित्र)
*चंद्राची दुनिया
*ज्योतिषशास्त्रावर प्रकाशझोत
*फलज्योतिषाचा बोजवारा (संपादित)
*फलज्योतिषाचे मूल्यांकन (संपादित)
*माणसाला हवंय तरी काय (विज्ञानकथा)
*लपंडाव
*विज्ञान कुतूहल (सहलेखक - अरविंद कुलकर्णी)
*विज्ञानखेळ
*विज्ञानगोष्टी भाग १ ते ३
*विज्ञाननिष्ठ निबंध
*विज्ञान नाटुकली
*विज्ञानाच्या खिडकीतून
*विज्ञानाशी हितगुज
*वैज्ञानिक इसाप
*वैज्ञानिक धमाल
*शून्याचा प्रवास
*सत्यकथा
*साधेच की अदभुत
*हे विश्वचि माझे घर
*कालयंत्र
*वैज्ञानिक इसाप
*मुलांसाठी विज्ञान कथा
*बळी अंधश्रध्देचे
*नाचणारी भूते
*रोगांविरुद्ध लढा
*जिज्ञासा
*कथाबोध
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
नाव: जगदीश काबरे. 
पत्ता: 10/20, सेक्टर -8, आर्टिस्ट व्हिलेज,
सीबीडी-बेलापूर, नवी मुंबई.pin:400614.
दूरध्वनी: घर: 022-27563199
   भ्रमण्ध्वनी: 9969626682
                    9820197680
ईमेल : jetjagdish@gmail.com
जन्मतारीख: 1/10/1951
शिक्षण: B. Sc.,B. Ed.
कार्य: शिक्षक. 
1) 1976 ते 1978 स्वामी मुक्तानंद शाळा,चेंबूर. 
2) 1979 ते 1985 अफँक इंग्लिश स्कूल, चेंबूर.
3) 1985 नंतर नवी मुम्बईतील अनेक शाळांमध्ये visiting शिक्षक म्हणून आजतागायत कार्यरत. 
4) 1989 ते 1991 मध्ये मुंबई दूरदर्शन वर 'विज्ञानके खेल' नावाची भारतभर प्रसारित होणारी मालीका हिंदीतून सदर केली. 
5) 1984 ते 1992 मध्ये शालेय चित्रवाणीत विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले. 
6) 1986 साली खगोल मंडळ,मुंबई या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष.
7) 1980 ते आजतागायत महाराष्ट्रातील विविध शाळांमध्ये 'विज्ञानातील जादूई खेळ' हा प्रयोगशील कार्यक्रम सादर करणे चालू आहे.
(जप)
8) 1980 ते 1994 दरम्यान आकाशवाणी वरुन भाषणे, नाटिका,श्रुतिका आदी विविध कार्यक्रमात सहभाग. 
9) लोक विज्ञान संघटना, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, मराठी विज्ञान परिषद, ग्रंथाली या संस्थामध्ये सक्रीय सहभाग.
10) 'आदर्श शिक्षक' म्हणून नवी मुंबई महानगरपालीके तर्फे 1996 साली सन्मानित केले गेले.
11) अशोकपुष्प पब्लिकेशन, नवी मुंबई तर्फे 2014 साली "समाजभूषण" पुरस्काराने सन्मानित केले गेले.
12)  यशवंत रामकृष्ण प्रतिष्ठान तर्फे 1989 साली 'आदर्श शिक्षक' पुरस्कार मिळाला.
13) आर्टिस्ट व्हिलेज सांस्कृतिक मंडळ तर्फे 2001 साली "आदर्श नागरिक" म्हणून सन्मानित केले गेले.
14) खानदेश शिक्षण सभा, जळगाव तर्फे 1990 साली "विज्ञान प्रसारक" पुरस्कार मिळाला.
15) आजवर एकूण विज्ञानविषयक 36 पुस्तके प्रसिध्द झाली. त्यापैकी 'शून्याचा प्रवास' या पुस्तकाला 1994 साली मुख्यमंत्री माननीय शरद पवारांच्या हस्ते राज्य पुरस्कार मिळाला.

सह्याद्रीच्या वाटा

ही गोष्ट आहे, एका नैसर्गिक रचनेची, भौगोलिक आविष्काराची! पुणे जिल्ह्य़ातील जुन्नर तालुक्यातून जाणाऱ्या कल्याण-नगर रस्त्यावर आळेफाटय़ाच्या पूर्वेला गुळुंचवाडी गावाजवळ हे निसर्गनवल दडलंय. पुण्याहून आळेफाटा ९६ किलोमीटर तर आळेफाटय़ाहून साधारण १८ किलोमीटरवर हे गुळुंचवाडी गाव. हे गाव ओलांडताच लगेच अणे घाट सुरू होतो. या घाटाची दोन-चार वळणे घेताच डाव्या हाताला दरीत एक दृश्य पाहणाऱ्या प्रत्येकाचे कुतूहल चाळवते.
या डोंगराच्या एका शिरेवरच एक भलामोठा नैसर्गिक बोगदा तयार झालेला दिसतो. एखाद्या पुलाच्या कमानीप्रमाणे त्याची ही रचना. उत्सुकतेपोटी हे स्थळ पाहण्याची इच्छा होते. ती दरी उतरत खाली जावे आणि त्या भौगोलिक आविष्काराच्या पुढय़ात उभे राहावे. केवळ दर्शनानेच एक क्षण उडायलाच होते. निसर्गाचे हे कोडे अजब रसायन वाटू लागते.
कुणी, कशी आणि कधी तयार केली ही रचना? त्या कमानीवर नजर टाकत असतानाच हे असे असंख्य प्रश्न सतावू लागतात. सुरुवातीचा काही काळ केवळ हे आश्चर्य बघण्यातच जातात. मग हळूहळू या कोडय़ाचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न सुरू होतो. हा शोध घेण्यासाठी थोडेसे भू-शास्त्राकडे वळावे लागते. आपला भू-प्रदेश हा विविध प्रकारच्या खडकांच्या स्तरांनी तयार झाला आहे. यातील काही स्तर हे कठीण तर काही मऊ-मुदू प्रकारातील आहेत. या भू-स्तरांवर निसर्गातील ऊन, वारा, पाऊस आणि पाणी हे बाह्य़घटक सतत परिणाम करत असतात. हजारो वर्षांच्या या संघर्षांत (घर्षण) मृदू खडकाचे भूस्तर नष्ट होतात. क्वचित प्रसंगी त्यांचे रूप-आकारही बदलतात. निसर्गाने तयार केलेले हेच आकार – चेहरे मग आमच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरतात. गुळुंचवाडीच्या या शिलासेतूमागेही हेच कारण.
घडले असे, की गुळुंचवाडीच्या या बोगद्याजवळूनच वरच्या बाजूने एक ओढा खाली येतो. एरवी कोरडय़ा असणाऱ्या या भागात पावसाळय़ात मात्र या ओढय़ातून साऱ्या डोंगराचे पाणी खाली वाहत येते. ते इथे या बोगद्याच्या डोंगररांगेला येऊन अडते. मग अशा वेळी कित्येक वर्षांपासून या पाण्याने वाट मिळवण्यासाठी या डोंगराशी संघर्ष सुरू केला. पाण्याच्या या संघर्षांतून डोंगराच्या पोटातील मृदू खडकाच्या स्तराची झीज होत गेली. छताच्या व तळाच्या बाजूचा कठीण खडक तसाच राहिला. पाण्याने स्वत:ला वाट तयार करून घेतली. पुढे हजारो वर्षे हे पाणी या जागेतून असेच वाहत – घर्षण करत राहिले आणि ज्यातून मग तयार झाला हा नैसर्गिक बोगदा!
गुळुंचवाडीचा हा बोगदा तब्बल २१ मीटर लांब, ९ मीटर रुंद आणि २ ते ६ मीटर उंचीचा आहे. या अदूभुत बोगद्याखालून जाताना निसर्गाच्या या चमत्कारात अडकायला होते. या बदलांचे आश्चर्य वाटू लागते. विज्ञानाची ही रहस्ये मनाला भुरळ पाडतात. बरोबरच्या एखाद्या गावक ऱ्याशी हा सारा अनुभव जोडावा तर तो आपला त्याचे श्रेय पांडवांना देऊन रिकामा होतो. ‘‘कौरव-पांडव युद्धात पांडवांपैकी कुणाच्या तरी एकाच्या बाणाचा नेम चुकला अन् इथं डोंगराला भोक पडलं!’’ त्याची ही कथा ऐकत आपण आपले गालातल्या गालात हसायचे आणि या भू-शास्त्रीय आविष्काराला एका लोककथेचीही जोड द्यायची!
पावसाळय़ात इथे आले, की या बोगद्याखालून ओढय़ाचे पाणी एका छोटय़ा धबधब्याचे रूप घेऊन धावत असते. आता या पाण्यावर पुढे एक पाझर तलावही बांधला आहे. या बोगद्यातून पाणी खळाळू लागले, की भोवतालच्या हिरवाईवर या नवलाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त होते. एरवीही कधी आलो तर या बोगद्याच्या शांत सावलीत बसून अणे घाटातून होणारी वाहतूक पाहण्यातील बालसुलभ भावावस्था अनुभवावी वाटते. मध्येच या कमानीत शिरणारा वारा सूं-सूं आवाज करत वाहू लागतो. तर संध्याकाळी मावळतीचे रंग या कमानीला न्हाऊ घालू पाहतात. अमेरिकेतील ती ‘गोल्डन आर्च’ही अशीच केशरी रंगात न्हाणारी. एक क्षण तिचीच आठवण झाली. अगदी त्या सारखी नसली, तरी त्या पठडीतील हे निसर्गनवल! फरक एवढाच, की ‘गोल्डन आर्च’च्या वाटय़ाला अमाप प्रसिद्धी आली. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक तिथे आपली हजेरी लावतात. तर आमच्या या गुळुंचवाडीच्या बोगद्याच्या वाऱ्याला मात्र त्या गावचा खेडूतही उभा राहत नाही. गुळुंचवाडीच्या कमानीच्या मनातले हे दु:ख जाणून घेत तिच्या शरीरावरून प्रेमाने एक हात फिरवला आणि घाटवाटेने पुढच्या प्रवासाला निघालो.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
2) Trek इट »जुन्नरची पर्यटनवाट
मनोज हाडवळे | October 29, 2015
डोंगरदऱ्यांमध्ये भटकंती करणारे अनेकदा या डोंगरांच्या जगातून धावणाऱ्या वाटांवरही रमतात. जुन्नरच्या पश्चिमेला अशीच एक वाट या भटकंतीच्या जगात रममाण झाली आहे.
पुणे जिल्ह्य़ातील जुन्नरमध्ये फिरण्यासारखी खूप काही स्थळे आहेत. किल्ले, लेणी, प्राचीन मंदिरे, देवराया, ग्रामीण आदिवासी संस्कृतीचे दर्शन देणारी जंगलांच्या कुशीत विसावणारी गावे असे बरेच काही इथे आहे. अशाच काही स्थळांची भेट घडवणाऱ्या जुन्नरमधील एका वाटेवर आज स्वार होऊयात.
जुन्नरहून आपटाळेमार्गे नाणेघाट आणि पुन्हा नाणेघाटातून घाटघरमार्गे जुन्नरला येणारी ही वर्तुळवाट. शिवनेरीच्या कुशीतून ही वाट निघते. थोडेसे अंतर गेलो, की डोंगरकुशीतील बौद्धकालीन तुळजा लेणी भेटते. तिचे ते कोरीव काम पाहायचे आणि पुन्हा पुढे निघायचे. थोडय़ाच वेळात आपण आपटाळे गावात पोहोचतो. या प्रवासात डाव्या बाजूला दिसणारे वरसुबाईचे डोंगर, आंबे हातविजला जाणारा इंगळूनचा घाट आपली सोबत करत असतो. आपटाळय़ातून २ मार्ग फुटतात. एक दाऱ्या घाटाकडे तर दुसरा आपल्या ठरलेल्या नाणेघाटाकडे जातो.
एव्हाना आपण घाटमाथ्यावरील वातावरण सोडून हळूहळू कोकणचा अनुभव घ्यायला सुरवात केलेली असते. जुन्नरच्या अगदी १५-२० किलोमीटरवर हा कोकणचा अनुभव. तो मनाची अवस्था तरल करून जातो. आजुबाजुला लाल माती, खळाळणारे झरे, देवराया वाटाव्यात अशी घनदाट झाडांची जमावट आणि या सर्वात आपल्याला घेऊन जाणारी ही वळणदार वाट. थोडय़ाच वेळात समोर एक अजस्र डोंगर दिसू लागतो. सगळीकडून २५०-३०० फूट नसíगकरीत्या तुटलेला कडा. या कडय़ावर तटबंदी. अरे हा तर चावंड किल्ला. तोंडातून शब्द बाहेर पडेपर्यंत आपण रस्त्यावरील चावंड पाटीजवळ येतो. उजवीकडे वळायचे आणि जंगल वाटेत हरवून जायचे. ही वाट आपल्याला चावंड किल्ल्याला थोडासा वळसा घालून चावंड गावात घेऊन जाते. डोक्यावरील टोपी पडेल एवढा उंच किल्ला आणि त्यावर चढण्यासाठी असणारी डोंगराच्या पोटात लपलेली वाट पाहून आपण अचंबित होतो. जितका चावंड किल्ला अजस्र, अभेद्य आणि अचल तितकेच सुंदर, निसर्गरम्य असे चावंड गाव.
गडावरची पुष्करणी, खोदीव तळी, अन्य वास्तू पाहायच्या आणि गड उतरत पुढे निघायचे. पुन्हा थोडय़ाच अंतरावर आणखी एक फाटा फुटतो. पूर गावाकडे निघतो. या गावात एक प्राचीन मंदिर दडलेले. कुकडेश्वर! कुकडी नदीच्या उगमस्थळी हे कोरीव मंदिर ९ व्या शतकात कुणा झंज राजाने बांधले. मध्यंतरी पुरातत्त्व खात्याने या मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे मंदिर पाहायचे आणि पुन्हा मुख्य रस्त्याला येत नाणे घाटाकडे कूच करायची.
डावीकडे असणारा शंभूचा डोंगर जणु एखादा किल्लाच वाटावा अशा दिमाखात उभा असतो. मजल दरमजल करत, आजूबाजूचा निसर्ग अनुभवत, छोटे मोठे जलाशय, भाताची शेते आपली सोबत करत आपला प्रवास सुरू असतो. थोडय़ाच वेळात समोर तो नानाचा अंगठा दिसू लागतो. वातावरण स्वच्छ असेल तर उजवीकडे दूरवर भरवगडाची भिंत दर्शन देते. थोडय़ाच वेळात डावीकडे जीवधन किल्ला हसतमुखाने आपले स्वागत करतो. जीवधनचा सोबती वानरिलगी चा सुळकाही आव्हान देत असतो. वेळ असेल तर गडावर जायचे, नाहीतर पुढे निघायचे.
थोडे पुढे आलो, की नाणे घाटाच्या आधीच एकदम तुटलेला कडा आणि खोल दरी मनात धडकीच भरवते. हा अपूर्ण अवस्थेतला गुणा घाट. अजून पुढे गेलो, की नाणे घाटातील उजवीकडचा दगडी रांजण आणि गणेश मंदिर दिसू लागते. पावसाळ्यात इथे बऱ्याचदा धुके असते, त्यामुळे फार लांबचा परिसर दिसत नाही. पण धुक्याचा हा खेळही अनुभवण्यासारखा. नाणेघाट गेल्या २३०० वर्षांपासून महाराष्ट्राच्या आद्य राजा सातवाहनांचे भूषण सांगत आहे. दख्खनच्या तत्कालीन समृद्धीत नाणे घाटाचा फार मोठा वाटा राहिला आहे. त्याच्या या निमुळत्या नाळेतून खाली उतरताच समोर विस्तीर्ण पसरलेले कोकण उभे राहते. तळाशी सर्वत्र हिरवाई पसरलेली. नाणे घाटाची नागमोडी वाट या हिरवाईतून खाली उतरत असते. नाणे घाटातील गुहेत सातवाहनांनी केलेल्या दानधर्मावरचे ब्राह्मी लिपीतील लेख आहेत. या परिवारातील सदस्यांची शिल्पेही इथे कोरण्यात आली होती. पण आता त्यांचे अवशेष शिल्लक आहेत. मनात आले तर जीवधनची चढाई करावी, नाणेघाट उतरून खाली जंगल वाट तुडवत कोकणात उतरावे किंवा बाजूच्या भोरांडय़ाच्या नळीने खाली उतरण्याचा आनंद घ्यावा आणि नसेलच काही करायचे तर इथेच नाणे घाटाच्या डोक्यावर निरभ्र आकाशदर्शन करत मुक्काम करावा. जुन्नर शहरापासून नाणेघाट ४५ किलोमीटर दूर आहे. पण मजल दरमजल करत हे अंतर जास्त वाटत नाही.
आता परत फिरताना निमगिरी-हजसरची वाट पकडायची. परतीच्या या वाटेवर नाणेघाटातून साधारण ५ किलोमीटरवर अजनावळे गाव लागते. या निसर्गरम्य गावातील देवराई बघण्यासारखी आहे. आपण पुढे जात राहावे आणि निसर्गाने मुक्त हस्ते सौंदर्याची उधळण करत राहावी..असाच हा रस्ता. काही अंतर गेलो, की निमगिरी गाव लागते. निमगिरी गावच्या पश्चिमेला डोक्यावर निमगिरीचा किल्ला छत्रछाया धरून अविचलपणे उभा असतो. वेळ असेल तर या गडाचे दर्शन घ्यायचे नाहीतर पुढे मार्गस्थ व्हायचे. परतीच्या या वाटेवर आपल्या एका बाजूला विविध डोंगर रांगा तर दुसऱ्या बाजूला माणिकडोह जलाशय आपली सोबत करत असतो. जलाशयाच्या पलीकडच्या तीरावर दिसणारा चावंडही आपल्यावर करडी नजर ठेवून असतो. नागमोडय़ा वाटेने सरकत असताना वाटेतच अचानकपणे हडसर गाव येते. याच्या डोक्यावरच तो हडसरचा किल्ला. खाली पायथ्यावरूनही त्याची ती अभेद्यता डोळय़ांत भरते. डोंगर कपारीशी लपून बसलेली वाट गडाचे निमंत्रण देते. हाताशी वेळ असेल तर या गडाचीही वारी करायची, अन्यथा पुढे सरकायचे. थोडय़ाच वेळात माणिकडोह धरणाजवळून ही वाट पुन्हा जुन्नर शहरात दाखल होते.
साधारण शंभर किलोमीटरच्या या प्रवासात शिवनेरी, चावंड, जीवधन, निमगिरी, हडसरसारखे किल्ले; तुळजा लेणी, कुकडेश्वर मंदिर, प्राचीन नाणेघाट अशी अनेक गिरिस्थळे त्यांचे दर्शन देतात. छोटी गावे, त्यातील देवराया, भोवतीच्या डोंगररांगा, त्यावरचे जंगल, नद्या, जलाशय असे बरेच काही या वाटेवर भेटते. डोंगररांगा भटकणाऱ्यांसाठी हा सारा भागच वेड लावणारा आहे. मग चला तर!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Trek इट »मांजरसुबा
सुधीर जोशी | August 27, 2015
वर्षां सहल म्हटल्यावर नगर जिल्हा कधी कुणाच्या डोळय़ांसमोर येण्याची शक्यता कमीच आहे. पण या शहराच्याच जवळ असलेला हा मांजरसुबा किल्ला भवतालच्या ओसाड माळावरही या दिवसात वेगळा भासतो.पर्जन्य सहल आणि तीसुद्धा अहमदनगरला म्हटलं तर कोणीही वेडय़ातच काढील, पण खरोखरच नगरच्या अगदी जवळ नगर-वाम्बोरी रस्त्यावरील मांजरसुबा हा किल्ला आणि जवळील डोंगरगणला भेट द्याल तर थक्कच व्हाल. एका नयनरम्य ठिकाणाला भेट दिल्याचा आनंद नक्कीच होतो.जुलै ते सप्टेंबर हा काळ फारच छान. हा किल्ला पूर्वीच्या नगर- औरंगाबाद आणि नगर-मनमाड या दोन्ही व्यापारी आणि लष्करी महत्त्वाच्या मार्गावर मोक्याच्या जागी आहे. दोन्ही मार्गावरील एक एक घाट या किल्ल्याच्या पायथ्याजवळून जातात. टेहळणी आणि घाटमार्गाचे संरक्षण याकरिता अगदी मोक्याची जागा.या किल्ल्याचे खरे नाव ‘मजार-ए-सुबा’ अपभ्रंश मांजरसुबा. साधारणपणे पर्वतीइतकाच उंच. चढण अतिशय सोपी. किल्ला दुर्गम नाही. किल्ल्याचे प्रवेशद्वार म्हणजे एक चिरेबंदी बांधकामाची आजही सुस्थितीतील इमारत आहे. येथे कचेरी आणि महत्त्वाच्या अधिकाऱ्यांचे निवासस्थान असावे. या इमारतीच्या गच्चीवर जाता येते. येथून दूरवरचा प्रदेश निरखता येतो. या किल्ल्यावर एक भव्य दुमजली महालही आहे, पण आज तो पूर्णपणे पडलेला आहे. पणत्याच्या भिंती तो किती देखणा असावा याची साक्ष देतात. हे निजामशाहीतील बांधकाम नगरमधील ‘फरहाबाग’ या सुंदर राजवाडय़ाशी साम्य दाखवते.आपले स्वत:चे वाहन असल्यास आपण फरहाबाग या ऐतिहासिक महत्त्वाच्या व सुस्थितीतील वास्तुलाही याच सहलीत भेट देऊ शकता. या किल्ल्याचे वैशिष्टय़ म्हणजे येथील जलतरण तलाव आणि हमामखाना. आज ह्य़ा हमामखान्याची पडझड झाली आहे. पण एक गोष्ट जाणवते की नगरसारख्या निपाणी प्रदेशात आणि तेसुद्धा टेकडीवर हमामखाना आणि जलतरण तलाव कसा? आणि हेच येथील नवल आहे. या टेकडीच्या उत्तरेला पावसाचे पाणी अडवून त्याची साठवण टाकी खोदून केलेली आहेत. याकरिता निजामशाहीत अरबस्तानातून जलसंधारणतज्ज्ञ बोलावले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली येथील अहमदनगरमधील पाणीपुरवठा योजना अमलात आली. उत्तरेकडील रंगमहालातील मोटेच्या सहाय्याने हे पाणी उचलले व खेळवले जाई. आजही येथे मुबलक पाणीसाठा असतो. या पाणसाठय़ाकडे जाण्यास एक भुयारी जिना असून पुढे डोंगरकडय़ाच्या बाजूने अवघड रस्ता आहे. किल्ल्याच्या एकंदरीत परिस्थितीवरून हे लष्करी ठाणे तसेच विलासक्रीडा स्थान असावे. किल्ल्याच्या वरील व पायथ्याशी असलेल्या छोटेखानी पठारांवर ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये अनेक रंगीबेरंगी रानफुलेही आढळतात.या किल्ल्याच्या पायथ्याजवळील डोंगरघळीत विसावले आहे निसर्गरम्य निवांत ठिकाण डोंगरगण. येथे एक जागृत शिवमंदिर आहे. येथे श्रावणात यात्रा भरते. येथे पावसाळ्यातील पाण्याचे प्रवाह आणि  छोटेखानी धबधबा आपल्याला सुरक्षित जलक्रीडेचा आनंद देतात. येथे असलेल्या एका गुंफेला सीतेची न्हाणी म्हणतात. येथेही आपल्याला फार चढउतार करावी लागत नाही. अहमदनगर परिसरात पाऊस फारच कमी असतो, पण ही वर्षांसहल मात्र नक्कीच संस्मरणीय होईल. याशिवाय अहमदनगरमध्ये अनेक सुंदर ऐतिहासिक ठिकाणांनाही आपण भेट देऊ शकतो.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
3) Trek इट »मुशाफिरी : आंबवडे
अभिजित बेल्हेकर | August 6, 2015
वर्षां सहलींना सध्या गती आली आहे. यामध्ये कुटुंबासह जाऊन पाहण्याजोगी आणि शांततेचा स्पर्श देणाऱ्या स्थळांच्या शोधार्थही अनेक जण असतात. अशांसाठीच पुणे जिल्हय़ातील भोर तालुक्यातील आंबवडे गाव खूप काही देऊनजाईल.
पाऊस कोसळू लागला, की ज्या काही ठिकाणांची आठवण होते त्यामध्ये पुणे जिल्हय़ातील रायरेश्वर ही अशीच एक हमखास जागा. वर्षां ऋतू सुरू झाल्यावर एकदा तरी या रायरेश्वराच्या पठारी जाणे होते. या प्रत्येक वेळी धावताना आणखी एक जागा मध्येच अडवते. पायांना बांधून ठेवते आणि मनाला भुरळ पाडते. ती म्हणजे आंबवडे!
हिरडस मावळातील हे एक छोटेसे गाव. डोंगरदरीत, हिरवाईच्या कुशीत पहुडलेले. गावाला खेटूनच एक खळाळता ओढा वाहतो. या ओढय़ाच्या काठावर दाट झाडीत एक प्राचीन शिवालय दडले आहे आणि या साऱ्यांच्या सहवासात कधीही गेलो, तरी केवळ नीरव शांतता आणि भरून राहिलेली प्रसन्नताच अनुभवायला मिळते!
..आंबवडेची ही अनुभूती गेली कित्येक वर्षे हृदयात साठवलेली आहे. म्हणून तर दरवर्षी वर्षांकाळ सुरू झाला, की रायरेश्वराच्या वाटेवर निघायचे आणि वाटेतील या आंबवडय़ात अडकायचे असा जणू नियम झाला आहे.
भोरपासून १० किलोमीटरवर हे आंबवडे गाव. इथपर्यंत येण्यासाठी भोरवरून एसटीची सोय आहे. डोंगरदरीतली ही वाट हिरवाईची सोबत करतच निघते. पावसाने सारा भवताल भिजून चिंब झालेला असतो. रस्त्याकडेला खाचरांमध्ये तरारलेला भात त्याचा गंध उधळत असतो. या अशा धुंदीतच आंबवडय़ाला पाय लागतात आणि मनातील ते स्वप्न सत्यात उतरलेले दिसू लागते.
खळखळत्या ओढय़ाच्या काठावर शांतपणे पहुडलेले ते गाव. ओढय़ाच्या पलीकडच्या तीरावर घट्ट झाडी आणि या झाडीतच दडलेले ते नागेश्वराचे प्राचीन शिवालय. नुकत्याच पडून गेलेल्या पावसाच्या एखाद्या सरीने स्वच्छ-ताजे झालेले हे दृश्य. त्याला पाहताच शरीराआधी मन चिंब भिजून जाते.
या दृश्यातील ते ओले रंग अनुभवण्यासाठी निघावे तो अगदी सुरुवातीलाच एक कमान आपले स्वागत करत पुढय़ात येते, ‘सर जिजिसाहेब सस्पेंशन ब्रिज’! आंबवडय़ाचे पहिलेच नवलविशेष!
आंबवडे हे भोरचे संस्थानिक पंतसचिव यांचे गाव. या संस्थानचे संस्थापक शंकराजी नारायण सचिव यांची समाधी गावातच आहे. ही समाधी आणि नागेश्वर मंदिर या संस्थानकाळच्याच आठवणी. ही दोन्ही स्थळे ओढय़ाच्या पलीकडे. या पैलतीरी जाण्यासाठीच कधी संस्थानकाळी हा झुलता पूल इथे आकारास आला. आंबवडय़ात शिरणाऱ्या प्रत्येक पावलांचा काही काळ इथे या झुलत्या पुलावर रेंगाळतो.
आंबवडे गावाशेजारून वाहणारा हा ओढा म्हणजे छोटीशी नदीच आहे. चांगली रुंदी आणि खोली. म्हणून मग हे पात्र ओलांडण्यासाठी १९३६ साली या झुलत्या पुलाची उभारणी केली. याची रुंदी ४ फूट तर लांबी दीडशे फुटांच्या घरात आहे. पुलाच्या दोन्ही अंगास रेखीव कमानी आहेत. त्यावर पुलाच्या बांधकामाचे तपशील सांगणारे लेख आहेत. माथ्यावर ‘ओम’ हे शुभचिन्ह कोरलेले आहे.
हा झुलता पूल भोर संस्थानचे राजे श्रीमंत रघुनाथराव शंकरराव पंडित पंतसचिव यांनी आपली आई श्रीमंत जिजिसाहेब पंतसचिव यांच्या स्मरणार्थ बांधला. यासाठी त्या वेळी १० हजार रुपये खर्च आला. १५ नोव्हेंबर १९३७ रोजी मिरजेचे राजे सर गंगाधरराव ऊर्फ बाळासाहेब पटवर्धन यांच्या हस्ते याचे उद्घाटन झाले. या साऱ्या तपशिलाची नोंद या पुलाच्या दोन्ही बाजूकडील स्वागत कमानींवर घेतलेली आहे.
झुलत्या पुलाचा तपशील वाचला, की त्याच्यावरचे हे चालणे, हलणे आणखी मजेशीर वाटू लागते. ही गंमत अनुभवायची आणि पलीकडच्या तीरावर दाखल व्हायचे. अगदी सुरुवातीला आपण समाधी परिसरात येतो. एका मोठय़ा इमारतीत मधोमध भोरच्या राजाची, शंकराजी नारायण सचिव यांची समाधी आहे. छत्रपती संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्याच्या सीमांचे रक्षण करण्यात या पंतसचिवांचा मोठा वाटा होता. या समाधीशेजारीच संस्थानच्या राणीसाहेब जिजिसाहेब यांचा अर्धपुतळा आहे. ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांनी घडवलेला हा पुतळा पाहण्यासारखा आहे. या अशा स्मारकांच्या केवळ दर्शनातूनही इतिहासाच्या त्या पर्वात बुडायला होते.
या स्मारकाशेजारूनच एक वाट नागेश्वराकडे उतरते. हे मंदिर थोडेसे खोलगट भागात आहे. जुन्या मोठाल्या वृक्षांच्या गर्दीतूनच एक पायरी मार्ग वळणे घेत या नागेश्वरासमोर दाखल होतो. मोठा फरसबंदी प्राकार, भोवतीने तट, ओवऱ्या, पाण्याची कुंडे, पाण्याचे वाहते प्रवाह आणि या साऱ्यांच्या मधोमध उभे असलेले नागेश्वर मंदिर! एखादा नायक असावा असे.
दूरवरूनच ही रचना लक्ष वेधून घेते. पश्चिमाभिमुख असलेले हे मंदिर एका उंच जोत्यावर उभे आहे. मंदिराच्या दर्शनी भागावरच एक लेख लावलेला आहे. ज्यामध्ये नागसंस्कृतीतील लोकांचा हा देव असून, या मंदिराचा वेळोवेळी जीर्णोद्धार केल्याचा अल्लेख आहे.
मुखमंडप, सभामंडप आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. प्रवेशद्वाराभोवती नाजूक शिल्पकाम केलेले आहे. आतील स्तंभही शिल्पकलेने नटलेले आहेत. बाहय़भिंतीवर उमलती कमळे, झाडांच्या पानांचे नक्षीपट उठवण्यात आले आहेत. हत्तीवर अंबारीत स्वार झालेली कुणी राजमान्य व्यक्ती, शरभ, मोर आदी शिल्पांची रचना आहे. शिखरही असेच कोरीव. पश्चिमाभिमुख असलेल्या या मंदिराच्या मागील पूर्व अंगासही एक कोरीव दरवाजा असल्याचा भास होतो. पण जवळ गेल्यावर तो त्या स्थापत्याचाच एक भाग असल्याचे समजल्यावर उडायला होते.
आंबवडय़ाला वळसा घालत निघालेला तो ओढा इथे नागेश्वराजवळ एखाद्या धबधब्याप्रमाणे उडय़ा घेत धावत असतो. जवळ गेल्यावर त्याच्या तुषारांमध्ये भिजायला होते. पावसाळय़ातील त्याचे हे विराट रूप पाहण्यासारखे असते.
ओढय़ाचा हा खळखळाट अनुभवत मंदिर प्राकारात यावे तो ती नीरव शांतता पुन्हा स्पर्श करू लागते. मंदिराभोवती पाण्याच्या कुंडांची रचना आहे. ज्यातून पाण्याचे अनेक प्रवाह मंदिराभोवती खेळते आहेत. पाण्याच्या या प्रवाहांनाही एक नाद असतो.
भोवतीची गर्द झाडी, त्यातील पक्ष्यांचा किलबिलाट, पाण्याचे खेळते प्रवाह आणि या साऱ्यांच्या मधोमध उभा नागेश्वराचा तो प्राकार! हे सारे पाहता-अनुभवताना चित्त एकाग्र होऊ लागते. आपल्या या समाधीला, या शांत अनुभूतीला गाभाऱ्यातील तो घंटानाद खोलवरची कंपने पुरवत असतो. मध्येच पावसाची एखादी सर येते. तिच्या पाठी दरीत कोंडलेले ढगही उतरतात आणि सारेच चित्र धूसर होते. त्या धूसरपणात दिसणाऱ्या आकृतीलाही एक गूढता असते.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
4) Trek इट »रतनवाडीचा अमृतेश्वर
अभिजित बेल्हेकर | June 18, 2015
निसर्ग भटक्यांसाठी सदैव आकर्षण ठरणारा भाग म्हणजे नगर जिल्ह्य़ातील भंडारदरा. डोंगरदऱ्या, जंगलझाडी, घाटवाटा, गडकोट, जलाशय अशा या विविधतेने हा भाग समृद्ध आहे. या मांदियाळीतच रतनवाडीचे अमृतेश्वराचे कोरीव राऊळही भटक्यांची पावले जखडून ठेवत असते.
अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले तालुक्यातील भंडारदरा धरण परिसर, रंधा धबधबा ही स्थळे आता पर्यटकांच्या चांगल्याच परिचयाची बनली आहेत. पण या भागाचे खरे सौंदर्य हे या धरणाच्या पल्याडच्या भागात दडले आहे. घाटमाथ्यालगतच्या या भागात उंच डोंगररांगांनी एक वेगळाच खेळ मांडला आहे. या खेळात आहेत आकाशात घुसलेले उंच पर्वत-सुळके, कोकणात कोसळणारे खोल कडे, देशावर चढणाऱ्या अनेक घाटवाटा, रतन, अलंग, कुलंग आणि मदन सारखे गडकोट, सर्वोच्च स्थानी विसावलेली ती कळसुबाई, या साऱ्यांवर पसरलेली दाट वनसंपदा, जीवसृष्टी, छोटी-छोटी आदिवासी खेडी, त्यांची संस्कृती आणि या साऱ्या रहाळावर लक्ष ठेवून मधोमध विसावलेला तो रतनवाडीचा अमृतेश्वर!
भंडारदरा पुण्याहून २०० तर मुंबईहून १८० किलोमीटरवर. या दोन्ही ठिकाणांहून भंडारदऱ्यापर्यंत थेट एसटी बससेवा आहे. या भंडारदऱ्याच्या जलाशयावर आलो, की निळाशार जलाशयाभोवतीचा डोंगरदऱ्यांचा हा सारा खेळ समोर उभा राहतो. खरेतर हाच भाग हिंडण्या-फिरण्याचा, निसर्गाच्या जवळ घेऊन जाणारा, इथला इतिहास जागवणारा. या देखाव्यात शिरायचे असेल, तर धरणाच्या डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही बाजूने गेलेल्या वाटांवर स्वार व्हावे. या दोन्ही वाटा बरोबर मध्यावर असलेल्या घाटावरच्या घाटघरला जाऊन मिळतात. यातल्या डाव्या हाताच्या वाटेवर आहे रतनवाडी आणि या वाडीत दडले आहे एक देखणे कातळशिल्प अमृतेश्वर! भंडारदरा ते रतनवाडी हे अंतर आहे वीस किलोमीटर. वाडीपर्यंत एसटी बसही धावते. कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याचा हा भाग आहे. वाडीकडे निघालो, की सुरुवातीला पाबरगड, घनचक्कर हे ओळखीचे डोंगर हाक देतात. त्यांच्या नंतर मग रतनगड उगवतो त्याच्या त्या खुट्टा नावाच्या सुळक्याला घेत. या खालीच गडाची रतनवाडी. तसे वाडीत येण्यासाठी आणखी एक मार्ग आहे. भंडारदऱ्याहून धरणाच्या आतील भागात ये-जा करण्यासाठी लाँच-बोटी धावतात. यातील एकात बसायचे आणि आपल्या भाषेत रतनवाडीचा स्टॉप सांगायचा. कुठल्याही मार्गे आलो, तरी या भागाला पाय लागण्यापूर्वी त्या निळय़ा जलाशयाच्या पाश्र्वभूमीवर काठावरचा अमृतेश्वर, मागची छोटीशी रतनवाडी, त्यामागचा रतनगड, त्याच्या शेजारचा खुट्टा हे सारे निसर्गचित्र पाहणाऱ्याला गुंतवून टाकते. यातून त्या अमृतेश्वराबद्दलची उत्कंठा वाढते आणि मग या धुंदीतच त्या कोरीव वास्तू प्राकाराला आपण सामोरे जातो.
जलाशयाच्या काठावर एखाद्या गायीने पाय दुमडून बसावे तसे हे मंदिर दूरवरून दिसते. जवळ जाऊ तसे त्याचे कोरीव देखणेपण, सुडोल रचना मन खेचू लागते. नंदीमंडप, गाभारा, सभामंडप आणि शिखर अशी रचना असलेल्या या मंदिरास पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही बाजूने प्रवेशद्वारे आहेत. मंदिर वास्तुशैलीतील हे नवलविशेष याच भागातील सिद्धेश्वर (अकोले), हरिश्चंद्रेश्वर (हरिश्चंद्रगड) येथेही पाहण्यास मिळते. या आगळय़ा शैलीमुळे नंदीमंडपातून गाभारा आणि त्यानंतर सभामंडप असा आपला प्रवास होतो. आत शिरताच इथले कोरीवपण आपला ताबा घेते. नक्षीदार खांब, कोरीव प्रवेशद्वारे, बाह्य़ भिंतीवरील विविध भौमितीक रचना, आतील भिंतीवरील मूर्तिकाम, छतावरील शिल्पपट हे सारे एकेक करत मंत्रमुग्ध करू लागते. या साऱ्यांवर पुन्हा ते यक्ष, अप्सरा, गंधर्व स्वार झालेले असतात. देव, दानव आणि नरांनीही इथे आपआपली जागा पटकावलेली असते. मैथुन शिल्पेही इथे आहेत. यातील तो समुद्रमंथनाचा देखावा तर अवश्य पाहावा असाच. आतील स्तंभ भरजरी आहेत. गर्भगृहाच्या दारी कीर्तिमुख, शंख, कमळवेलींच्या पायघडय़ा घातल्या आहेत. मंदिरात प्रकाश येण्यासाठी जागोजागी दगडी जाळय़ांची रचना केलेली आहे. सारेच विलक्षण! एखादा लेण्यात फिरल्यासारखे!!
या मंदिराचे शिखरही तेवढेच कोरीव, श्रीमंत! जाळीदार नक्षीचे उभे थर, त्यावर पुन्हा शिखरांच्या छोटय़ा प्रतिकृतींची रचना, समोरच्या बाजूस शूकनास..प्राचीन स्थापत्यातील ‘नागर शैली’ अमृतेश्वराच्या देहबोलीवर जागोजोगी विसावलेली. या साऱ्या सौंदर्याचे रसपान करता करता आपल्याच मनाचा गोंधळ उडतो. मग अशा या गोंधळलेल्या अवस्थेतच अमृतेश्वराचे दर्शन घ्यायचे. खरेतर अमृतेश्वराची ही शिवपिंडीही कोरीव अशा पाच थरांपासून बनवलेली होती. पण कुणाच्या तरी डोक्यात खुळ आले आणि त्यांनी देव जुना झाला म्हणून हे दगड बाजूला करत त्या जागी नव्या शिवलिंगाची स्थापला केली. अमृतेश्वराचे दर्शन घेत पुन्हा बाहेर येत त्याच्यावर प्रेमाने नजर फिरवावी. या राईत एखादे रानफुल उमलावे तसे हे मंदिर भासते. त्या जलाशयाच्या काठावर आणि या कोरीव शिल्पासवे खूप सुखद, शांत आणि समृद्ध वाटू लागते. वैशाखाचे तप्त ऊन खात आलेल्या पावलांचा सारा क्षीण नाहीसा होतो. अमृतेश्वराचे दर्शन झाले तरी खरे ‘अमृत’ मात्र अजून आपल्या प्रतीक्षेत असते. मंदिरातून वाडीच्या दिशेने निघावे. शेतीवाडीतून जाणाऱ्या या वाटेवर थोडे अंतर गेलो, की जमिनीलगत साकारलेली एक जलवास्तू तिच्या सौंदर्यात बुडवून टाकते. पुष्करणी! नावाप्रमाणेच सुंदर! आपल्याकडे आड, विहीर, तलाव, तळी, टाकी अशी पाण्याशी नाते सांगणाऱ्या अनेक वास्तू आहेत. या साऱ्यांतील देखणी, कोरीव श्रीमंती लाभलेली वास्तू म्हणजे पुष्करणी! देवांचा सहवास लाभलेली ही जलवास्तूची निर्मितीही त्या देवांसाठी. प्राचीन मंदिराच्या भवतालात ही अशी पुष्करणी हमखास दिसणार. या पुष्करणीची निर्मितीही या अमृतेश्वराच्या रहाळात झालेली. सौंदर्य आणि पावित्र्य यांचा एकत्रित मिलाफ असलेला मंदिरानंतरचा हा दुसरा वास्तुप्रकार. त्याच्या ‘पुष्करणी’ या शब्दाएवढाच दुर्मिळ!
अमृतेश्वराची ही पुष्करणी तब्बल वीस फूट लांब-रुंद. जमिनीलगत कोरीव, आखीव-रेखीव अशी तिची रचना. एका बाजूने आत उतरण्यासाठी पायऱ्या. आत फिरण्यासाठी धक्के ठेवलेले. भोवतीच्या भिंतीत सालंकृत अशी बारा देवकोष्टकांची रचना केलेली. त्यांच्या डोईवर पुन्हा छोटय़ा-छोटय़ा कोरीव शिखरांची रचना. या कोष्टकांमध्ये गणेशाची एक मूर्ती सोडल्यास उर्वरित सर्व ठिकाणी विष्णूचे अवतार विसावलेले. ही सर्वच शिल्पे पुन्हा सालंकृत. ही जलवास्तू जेवढी देखणी, तितक्याच नितळ पाण्याचीही तिला साथ मिळालेली. यामुळे की काय अमृतेश्वराच्या त्या भव्य शैल मंदिराने जसे सारे अवकाश व्यापल्यासारखे वाटते तेच सारे निळे रंग इथे या पाण्यावर विश्रांतीला आल्यासारखे वाटतात. कुठल्याही स्थापत्याला असे निसर्गाचे कोंदण मिळाले, की ते अजून खुलते. प्रसन्न होते. स्थानिक लोक या पुष्करणीला विष्णूतीर्थ म्हणतात आणि समुद्रमंथनाच्या चौदा रत्नातून हे मंदिर आणि तीर्थ तयार झाल्याची कथा ऐकवतात. या कथांमधून बाहेर येत खरा इतिहास शोधू लागलो, की आपल्याला दहाव्या शतकातील झंज नावाच्या राजाजवळ येऊन थांबावे लागते. या झंज राजाने गोदावरी ते भीमा दरम्यानच्या प्रमुख बारा नद्यांच्या उगमस्थळी एकेका सुंदर शिवालयाची निर्मिती केली. यातील प्रवरा नदीच्या उमगस्थळीचे हे अमृतेश्वर!
पूर्वजांच्या या कलासक्तीचे कधी-कधी खूप कौतुक वाटते. ..आज हजार एक वर्षे उलटून गेली. काळही बराच पुढे सरकला. इथले हे निर्माणही आता एक इतिहास झाला. इथल्याच निसर्गाचा एक भाग बनला. अगदी त्या डोंगर-झाडी, निर्झर पाण्याप्रमाणे..!
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Trek इट »जयगडची सफर
गीता सोनी | May 7, 2015
गणपती पुळय़ाला अनेक जण जातात. पण या पुळय़ाच्या परिघातच अनेक आडवाटेवरची प्रेक्षणीय स्थळे दडलेली आहेत. यातीलच जयगड परिसरातील स्थळांची ही सफर ..
रस्त्याच्या उजव्या बाजूला लालसर जांभ्या दगडाचे कातळ, डाव्या बाजूला हाताच्या अंतरावर अथांग पसरलेला शब्दश: निळाशार समुद्र, किनाऱ्यावरची हिरवीगार दाट झाडी, त्यातून मधूनच डोकावणारे उतरत्या कौलारू लाल छपरांचे पुंजके, समुद्रातील पाण्याला समतल उडणारे पांढरे शुभ्र सी-गल्स आणि या ‘लाइव्ह’ निसर्गचित्राचा ‘गेटअप’ वाढवणारे काळेभोर गुळगुळीत नागमोडी रस्ते. अगदी बरोबर ओळखलत, हे सारे वर्णन आहे आपल्या कोकणाचे आहे.
गेल्याच आठवडय़ात धावत पळत केलेल्या कोकणभेटीत याहूनही कितीतरी अनुपम निसर्गसौंदर्य आमची साथ करीत होते. श्रीगणपती-पुळे आणि रत्नागिरी टापूतील ठरावीक प्रेक्षणीय स्थळे पाहिल्यावर आम्ही काही हटके ठिकाणांकडे मोर्चा वळविला होता. यातच काही हाताशी गवसली.
जयगडची ओळख खरेतर आपल्याला शालेय पुस्तकांतच झालेली आहे. छत्रपती शिवाजीमहाराजांच्या इतिहासापासूनच आम्ही हे नाव वाचत आलो आहोत. प्रसिद्ध देवस्थान असलेल्या गणपती पुळय़ापासून हे ठिकाण अवघे अठरा ते वीस किलोमीटरवर. शास्त्री नदी ज्या ठिकाणी समुद्रास मिळते अशा खाडीकाठावर हा जयगड उभा आहे.
जवळ येताच त्याची तटबंदी खुणावू लागते. त्याची भक्कम तटबंदी आजही शाबूत आहे. आत शिरताच त्याचे ते वास्तुवैभव भुरळ पाडू लागते. सभोवती उंच तटबंदी, त्यावर वर-खाली करण्यासाठी बांधलेले उंच दगडी जिने अजूनही उत्तम अवस्थेत आहेत. तटबंदीवरून टेहाळणी करण्यासाठी बांधले गेलेले झरोके, बुरूज सुस्थितीत आहेत. तटावरून फिरताना गडाभोवतालच्या तीनही बाजूंस पसरलेला समुद्र, वाळूचा किनारा, नारळाच्या झाडांची दाटी हे सारे ‘दिल खुश’ करून टाकते.
किल्ल्यात मध्यभागी हनुमान आणि गणपतीचे मंदिर आहे. जवळच एक पडका वाडाही आहे. ही वाडय़ाची वास्तू मराठा आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांची असल्याचे सांगितले जाते. या गडाचे बांधकाम अंदाजे सतराव्या शतकात, आदिलशाही राजवटीत झाले. पुढे हा किल्ला मराठा आरमारात सामील झाला आणि शेवटी सन १८१८ मध्ये तो इंग्रजांच्या ताब्यात गेला असे इतिहास सांगतो.
या किल्ल्याच्या नावाबद्दलही एक आख्यायिका इथे सांगितली जाते. किल्ल्याचे बांधकाम सुरू असताना, कामात कोणतेही विघ्न येऊ नये म्हणून नरबळी देण्याचे ठरले. यासाठी ‘जयबा मल्हार’ नावाच्या व्यक्तीने स्वेच्छेने प्राणार्पण केले. यामुळे त्यांच्या सन्मानार्थ गडाचे नाव ‘जयगड’ असे निश्चित झाले.
तसा विचार केला तर पाहणाऱ्याला जयगड ही एखादी पडकी वास्तू वाटेल. पण आपल्या मराठी मनांसाठी मात्र अशा वास्तू केवळ इमारती नसतात. तिथे पाय ठेवता क्षणीच आपल्यातील इतिहास जागा होतो. कधी काळी या मातीला झालेला शिवरायांचा पदस्पर्श, इथे घुमलेले त्या पराक्रमी मावळ्यांचे ‘हर हर महादेव’चे नारे हे सारे आठवू लागते. हा सारा थरार अनुभवण्यासाठी तरी आपण जयगड किल्ला पाहायला हवा.
या किल्ल्यापासून जवळच असलेले, लाल-पांढऱ्या रंगातील ब्रिटिशकालीन जयगडचा दीपस्तंभही पाहाण्यासारखा आहे. सन १९३२ मध्ये ब्रिटिशांनी याची रचना व बांधकाम केले. अजस्त्र महाकाय लोखंडी पाया असलेल्या या दीपगृहाचा वरील भाग पितळेचा आहे. साधारण ८२ वर्षांपूर्वी उभारलेल्या या ‘लाइट हाउस’ची तत्कालीन रचना व यंत्रणा इतकी अद्ययावत आहे, की आजही ती कार्यरत आहे. हे दीपगृह पर्यटकांना पाहण्यासाठी खुले आहे. कोकण किनारपट्टीवरील समुद्री पर्यटनस्थळांना एक वेगळे वैशिष्टय़ प्राप्त करून देणाऱ्या या दीपगृहांची रचना व कार्य अभ्यासणे हे जिज्ञासू पर्यटकांना निश्चितच रोचक वाटू शकेल.
जयगड गावापासून चारपाच किलोमीटर अंतरावर असलेले कऱ्हाटेश्वर शिवमंदिर देखील पाहण्यासारखे आहे. हे पूर्णपणे लाकडी बांधकामाचे देऊळ एका तुटक्या कडय़ावर असल्यासारखे भासते. मुख्य म्हणजे मंदिरामागे असलेल्या साठसत्तर पायऱ्या उतरून गेल्यावर दिसणारा काळा दगडी कातळ, समोरचा निळा फेसाळणारा समुद्र, नारळीची झाडे, तिथे मिळणारा शांत एकांत, हवेचा प्रसन्न ताजेपणा हे सारे फक्त अनुभवण्यासारखेच आहे.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
Maharashtra Times
हैदराबाद म्हणजे स्वातंत्र्यपूर्व भारतातल्या एका श्रीमंत राज्याची राजधानी. अर्थातच त्यामुळे तिचा डौलही तिला साजेसा असणारच. मोत्यांचं शहर म्हणून ओळखलं जाणाऱ्या या शहरांत बरीच पर्यटनस्थळं आहेत. स्मारकांपासून ते संग्रहालयापर्यंत आणि बगिच्यापासून फिल्मसिटीपर्यंत खूप काही इथं आहे. वर्षाअखेरीस एखादा छोटासा हॉलिडे प्लॅन करत असाल तर हैदराबाद हा बेस्ट पर्याय आहे. 
गोवळकोंडा किल्ला - गोवळकोंडा हा भारतातला एक प्रसिद्ध किल्ला. गोवळकोंडा म्हणजे मेंढपाळाचा किल्ला. मुळात हा मातीचा किल्ला होता त्यानंतर कुतूबशाही घराण्यानं हा किल्ला पुन्हा मजबूत बांधला. हैदराबादपासून ११ किलोमीटर्सवर हा किल्ला आहे. इथला परिसर सुंदर आहे. जुन्या काळातल्या महालांचे अवशेष, भल्यामोठ्या तोफा, मोठाले दरवाजे बघण्याजोगे आहेत. गोवळकोंडा किल्ल्याची माहिती लाईट व साऊंड शोच्या माध्यमातून सांगितली जाते. 
चारमिनार व मक्का मशीद - चारमिनार हे हैदराबादमधलं एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. या चार मिनारांभोवती हे शहर वसवलेलं आहे. ४८.५ मीटर्स उंच असे चार मिनार आहेत. आत ४५ प्रार्थनास्थळं आहेत व एक मशीद आहे. मक्का मशीद ही हैदराबादमधील सर्वात जुनी मशीद. मक्कामधल्या मातीच्या विटा यासाठी वापरल्या गेल्या असल्याचं सांगितलं जातं. म्हणून त्याला मक्का मशीद असं नाव दिलं आहे.
बिर्ला मंदिर- व्यंकटेश्वराचं हे मंदिर आहे. हे मंदिर सफेद मार्बलचा वापर करून बांधण्यात आलं आहे. इथली मूर्ती ही तिरुपतीच्या मूर्तीसारखी आहे. 
सलार जंग संग्रहालय- सलारजंग हे एक सुंदर वस्तूसंग्रहालय आहे. हे संग्रहालय मुसी नदीकाठी आहे. प्राचीन काळातली हस्तलिखितं इथे पाहायला मिळतील. पर्शिअन कारपेट्स, चिनी बनावटीच्या अनेक वस्तू इथे आहेत. राणी नूरजहाँच्या कट्यारी आणि राजांच्या तलवारींचं खास कलेक्शन आहे. 
हुसैन सागर- हुसैन सागर हा खूप मोठा तलाव आहे. इथून दिसणारं सुंदर दृश्य व बोटिंगची सुविधा यामुळे पर्यटकांची इथे खूप गर्दी होत असते. बुद्धाचा अखंड पुतळा तलावाच्या मध्यभागी आहे. तलावाच्या भोवती एनटीआर गार्डन, नेकलेस रोड, लुंबिनी पार्क अशी बरीच बघण्याजोगी ठिकाणं आहेत. ही गार्डन्ससुद्धा अतिशय सुंदर आहेत. 
चाऊमोहल्ला राजवाडा - अठराव्या शतकातला निजामाचा हा राजवाडा अतिशय सुंदर आहे. युनेस्को एशिया पॅसिफिक पुरस्कार अलीकडेच त्याला देण्यात आला होता. भव्य व वेगळ्या स्टाईलने बांधलेला हा राजवाडा सुमारे दोनशे वर्षांपूर्वी बांधण्यात आला असला तरी अजूनही त्याचा दिमाख कायम आहे. इथे चार युरोपियन व मुघल पद्धतीचे महाल आहेत. सुरूवातीला ४५ एकर्सवर असलेला हा राजवाडा आता १२ एकर्सवर उरला आहे. 
रामोजी फिल्मसिटी - जवळपास दोन हजार एकरांवर पसरलेली, जगातली सर्वात मोठी फिल्मसिटी अशी याची ओळख आहे. या फिल्मसिटीमध्ये निसर्गरम्य आणि कृत्रिम आकर्षणंही अनेक आहेत. हिंदी, दाक्षिणात्य अशा शेकडो चित्रपटांचं चित्रीकरण इथे झालेलं आहे. एक संपूर्ण दिवस यासाठी राखून ठेवावा असं हे ठिकाण आहे. 
नेहरु झूऑलॉजिकल पार्क - तीनशे एकरांवर पसरलेलं हे उद्यान निसर्गप्रेमींनी जरुर भेट द्यावी असं आहे. जवळपास २५० प्रजातींचे प्राणी-पक्षी इथे पाहायला मिळतात. इथे असलेल्या प्राण्यांना शक्य तितक्या त्यांच्या नैसर्गिक वातावरणात ठेवण्यात आलं आहे. सफारी पार्क, नॅचरल हिस्ट्री संग्रहालय असे अनेक पर्याय उपल्ध आहेत. 
शॉपिंग स्पेशल - हैदराबाद हे शॉपिंगसाठी एक उत्तम ठिकाण आहे. या शहरात वेगवेगळे बाजार आहेत. इथल्या प्रत्येक बाजाराची खासियत वेगळी आहे. फळबाजार, ‌बांगड्यांचा बाजार, पुस्तकांचं मार्केट, अत्तर बाजार असे अनेक बाजार इथे आहेत. 
संकलन - शामल कांबळे, कॉलेज क्लब रिपोर्टर
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
5) Maharashtra Times
नागपूरजवळची वन डे डेस्टिनेशन!
ताडोबा, नागझिरा, नवेगावबांध, बोर, लोणार, चिखलदरा अशी अनेकानेक स्थळे विदर्भाचे मानबिंदू आहेत. पण, त्याव्यतिरिक्तही बरीच स्थळे पावलापावलावर भेटतात. नागपूरच्या शंभर किलोमीटरवर अशीच असंख्य स्थळे आहेत. दिवाळीच्या आठवड्याभराची सुट्टी एक दिवसावर आलेल्यांसाठी हे पर्वणी ठरतात. निसर्ग, सोशल, धार्मिक पर्यटनाची भूक भागवितात. त्यातीलच काही निवडक स्थळांचा हा धावता आढावा.
आंभोरा
ब्रह्मगिरी पर्वतावर पाच नद्यांच्या संगमस्थळी वसलेले श्री क्षेत्र आंभोरा पर्यटनाच्या दृष्टीनेही महत्त्वपूर्ण आहे. नागपूरपासून पाचगाव, डोंगरगाव, कुही, वेलतूर मार्गे ८० किलोमीटर तर भंडाऱ्यापासून केवळ १८ किलोमीटर हे स्थळ आहे. वैनगंगा, कन्हान, आंब, मुर्जा, कोलारी या पाच नद्यांचा संगम येथे आहे. सृष्टीसौंदर्याने नटलेला परिसर हे स्थळाचे वैशिष्ट्य आहे. टेकडीवर चैतन्यश्वराचे जाज्वल्य मंदिर आहे. चहूबाजूंना नद्यांचे मोठे पात्र, संगम, पहाड, टेकडी, हिरवीगार वनराई असे मनोहर दृश्य पाहताना माणूस क्षणभर दु:ख विसरून जातो.
मनसर
नागपूरपासून ४५ किमी अंतरावरील मनसरला पुरातत्वदृष्ट्या महत्त्व आहे. या ठिकाणाला गाव म्हणावे की किमया? भावनांच्या रंगपत्रात एकेका स्वप्नांचे कुंचले बुडवून विधात्याने 'मनसर' चितारले आहे. वाकाटक, सातवाहन काळातील समृद्ध संस्कृतीने हे ठिकाण संपन्न केले आहे. इथल्या कणाकणांवर निसर्गाने आपली सुबत्ता पांघरून ठेवली आहे. हा खजिना जरूर पहावा. येथून जवळच रामधामही आहे.
नगरधन
नगरधन हा 'भुईकोट' प्रकारातील एक किल्ला आहे. वाकाटककालीन असलेल्या या किल्ल्यास जुना इतिहास आहे. रामटेकपासून सुमारे सात किमी तर नागपूरपासून ३४ किमी अंतरावर हा किल्ला आहे. ही जागा प्राचीन काळात 'नंदीवर्धन' म्हणून ओळखल्या जात होती. नगरधन हा त्याचा अपभ्रंश आहे. नगरधनच्या पश्चिमेस या किल्ल्याचे प्रवेशद्वार आहे. हौशी पर्यटकांनी भूक भागविण्यासाठी हा किल्ला सक्षम आहे.
पेंच
जैविक विविधतेने नटलेले पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर-जबलपूर मार्गावर ८० किलोमीटर अंतरावर आहे. वाघोबासोबत विविध प्राणी, पक्षी पाहण्याची सोय येथे आहे. पेंच नदीवर तोतलाडोह येथे एक विशाल बांध आहे. या धरणाचे पाणी ७७ किलोमीटर परिसरात पसरले आहे. आदिवासींचे जीवन जवळून न्याहाळण्याची सोयही येथे आहे. पेंचला गेल्यानंतर अंबाखोरी दुर्लक्षित राहू नये याचीही खबरदारी घ्यावी.
आदासा
नागपूरपासून ३७ किमी अंतरावरील आदासा येथे विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक गणपतीचे मंदिर आहे. कळमेश्वर आ धापेवाडामार्गे येथे जाता येते.
कुँवारा भीवसेन
नागपूरपासून ६४ किमी अंतरावर पारशिवनी तालुक्यात हे स्थळ आहे. हे स्थळ गों‌ड आदिवासींचे श्रद्धास्थान आहे. येथे मोठी गर्दी होते. पेंच नदीच्या काठावर हे स्थळ आहे. त्यामुळे श्रद्धेला पर्यटनाचे महत्त्व प्राप्त होते.
नवेगाव खैरी
पारशिवनीपासून जवळच नवेगाव खैरी हे पर्यटनस्थळ आहे. येथील तलावाच्या चारही बाजूंनी वनसंपदा असल्याने येथे पर्यटकांची गर्दी होते. पक्षीप्रेमींसाठी हे एक उत्कृष्ट स्थळ ठरते. हे स्थळ नागपूरपासून ६४ किलोमीटर अंतरावर आहे.
ड्रॅगन पॅलेस टेम्पल
नागपूरपासून २१ किलोमीटर अंतरावरील कामठी येथे ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारण्यात आला आहे. जपानी पद्धतीने बांधलेले हे टेम्पल आज मन मोहून टाकते. नागपूरला येणारे बहुतांश पर्यटक या स्थळाला भेट दिल्याशिवाय राहात नाही.
रामटेक
गावाच्या चहुबाजूने हिरवळ आणि पूर्व दिशेला उंच डोंगर हे रामटेक या पौराणिक गावाचे वैशिष्ट्य! ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व असलेले हे गाव कुणाचे श्रद्धास्थान तर एखाद्या इतिहासवेड्यासाठीचे पर्यटनस्थळ ठरते. हिरवळीने नटलेल्या डोंगरावर प्रभू रामचंद्रांचे मंदिर आणि कवी कालिदासांचे स्मारक, हे गावाचे वैशिष्ट्य ठरते. नागपूरपासून ४८ किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
पारडसिंगा
अनसुया मातेचे मंदिर असलेले पारडसिंगा डबा पार्टीसाठीही ओळखले जाते. कुटुंबांसोबत जाताना दर्शनाला पर्यटनाची जोड द्यायची झाल्यास हे ठिकाण उत्तम! नागपूरपासून सुमारे ६० किमी अंतरावर हे स्थळ आहे.
मोहगाव झिल्पी
नागपूरपासून सुमारे २५ किमी अंतरावरील मोहगाव झिल्पी हा तसा तलाव परिसर. पण, निसर्ग सौंदर्याने या स्थळाला पर्यटकांची पहिली पसंती मिळते. विकेंडला बाहेर जाणाऱ्यांसाठी हा सोयीचा पर्याय ठरतो.
खेकरानाला
नागपूरपासून ६२ किमी अंतरावर खापाजवळ असलेला खेकरानाला नैसर्गिक सौंदर्यांनी नटलेला आहे. पर्यटकांना मोहून जाते.
खिंडसी
तुफान लाटांवर आरूढ झालेली वॉटर स्कूटर सुसाट वेगात उडवावी... चोहीकडे पसरलेल्या विस्तीर्ण निळ्याशार पाण्यात आपणच एकटे.. मुग्ध आणि धुंद मग पाण्यावरचे रंग कापीत ओठावंर मंजुळ गाणी आळवीत किनारा गाठावा... तर नजरेला सापडावी एक मायानगरी. तिलाच म्हणतात. खिंडसी. नागपूपासून अवघ्या ५६ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.
मेळघाट
उंच डोंगररांगा, दऱ्या-खोऱ्या, तलाव, हिरव्यागार डोंगरकड्यावरून कोसळणारा धबधबा, गर्द वनराई, वाघोबासह विविध प्राणी पाहण्याची सोय मेळघाटात आहे. म्हणून देशातील पहिल्या दहा पर्यटनस्थळांमध्ये मेळघाटचा समावेश होतो. केवळ निसर्गसौंदर्यच नव्हे तर ऐतिहासिक गाविलगड, नरनाळा किल्लाही येथे आहे. सिपना, खंडू, गडगा, तापी, वान व पूर्णा या नद्या आकर्षणाचे केंद्र आहेत. वान, अंबाबरवा, नरनाळा व मेळघाट अशी चार अभयारण्ये तर गुगामल राष्ट्रीय उद्यान मेळघाटचे सौंदर्य खुलविते. याच मेळघाटातील चिखलदरा विदर्भाचे का‌श्मीर म्हणूनही ओळखले जाते.
नागपूरपासून अंतर - अमरावती १५० किलोमीटर व तेथून पुढे शंभर किलोमीटरवर मेळघाट आहे.
कसे जाणार? - नागपूरवरून येणाऱ्या प्रवाशांना अमरावतीनजीकचे बडनेरा रेल्वेस्थानक जवळचे आहे. बडेनरावरून अमरावती दहा किमी असून तेथून परतवाडामार्गे चिखलदराला जाता येते. मेळघाटात प्रवेश करता येतो. सोबतच एसटी महामंडळाच्या बसेस किंवा खासगी वाहनदेखील सोयीचे ठरते.
निवास व्यवस्था - एमटीसी हॉलिडे रिसोर्ट : गोराघाट पॉइंट (कॉनव्होकेशन कॅम्प) व चिखलदरा येथे मोझरी पॉइंट, चिखलदरा व धारणी येथे शासकीय विश्रामगृह, कोलकास विश्रामगृह व खाजगी हॉटेल्स
वाहन व्यवस्था - जिप्सी व अन्य वाहने उपलब्ध
संपर्क - वेबसाइट www.maharashtratourism.gov.in
दूरध्वनी क्रमांक:
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ - ०७२१ - २६६१६०१
चिखलदरा रिसोर्ट - ०७२०-२३०२३४/२३०२६३
काय पहाल? - देवी पॉइंट, भीमकुंड (धबधबा), हरिसन पॉइंट, गावीलगड किल्ला, नरनाळा किल्ला, शक्कर तलाव, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, शासकीय उद्यान, कलालकुंड, सनसेट पॉइंट, पंचबोल पॉइंट, जत्राडोह, माखला, जवाहर कुंड
वन्यजीव - पट्टेदार वाघ, रानगवा (रानम्हैस), रानकुत्रे, बिबट, दुर्लभ चांदी अस्वल, चितळ, सांबर, चौशिंगा, भेडकी, खवल्या मांजर, उडती खार, पाणमांजर आदी.
इथेही द्या भेट -मोझरी, नल दमयंती तलाव, सालबर्डी, कौंडण्यपूर, रिद्धपूर
@@@@@@@@@@@@@@@@@@@
6) वरंध घळ : समर्थाचे वास्तव्य हे गावात, मठात, मंदिरात कधीच नसायचे. त्यांनी वास्तव्य केलेल्या विविध घळी या रामघळी म्हणून प्रसिद्ध झाल्या. शिवथरघळीच्या अगदी जवळ अजून एक घळ आहे. या घळीचे नाव स्थानिक लोक सुंदरमठ असे सांगतात. ही घळ आहे वरंध गावाच्या पाठीमागे असलेल्या डोंगरामध्ये. पुण्याहून महाडला जाताना वरंध घाट लागतो. तो उतरून गेले की वरंध नावाचे गाव येते. याच गावातून काहीसे पुढे महाडच्या दिशेला जायला लागले की रस्त्याच्या उजव्या बाजूला काही दुकाने दिसतात आणि तिथे उजवीकडे आत एक रस्ता जातो. (मुंबईकडून आल्यावर वरंध गावाच्या काहीसे अलीकडे डाव्या हाताला ही जागा येते.) त्या रस्त्यावरून आत गेल्यावर अंदाजे चार किलोमीटरवर ही घळ आहे. आत जाण्याचा रस्ता काहीसा कच्चा आहे आणि पुढे गेल्यावर अंगावरची चढण एक-दोन ठिकाणी लागते. ऐन पावसाळ्यात तर तिथे पदभ्रमणच करावे लागेल. पण सुंदर निसर्ग, समोरच दिसणारा वरंध घाटाचा डोंगर असा हा परिसर खूप रमणीय आहे. पाण्याची एक टाकी आणि एक बांधलेली समाधी अशा ठिकाणी रस्ता संपतो. वाहन तिथेच ठेवून समोरच्या डोंगराच्या पोटातून गेलेली एक पायवाट घळीपाशी जाते. तिथून दगडात कोरलेल्या काही पायऱ्या चढून आपण घळीच्या तोंडाशी येऊन उभे राहतो. पाठीमागे पाहिले की सह्याद्रीचे रौद्र रूप सामोरे येते. घळीच्या शेजारीच मोठा धबधबा आहे. त्याचे पाणी पडून खालच्या बाजूला एक डोह तयार झाला आहे आणि तिथून ते पाणी पुढे नदीचे रूप घेऊन पुढे वाहत जाते. दक्षिणाभिमुख असलेली ही घळ आतमध्ये डाव्या बाजूला पूर्व-पश्चिम अशी जवळजवळ ६० फूट लांबीला आहे. तसेच ती १० ते १२ फूट रुंद आहे. दारातून आत गेल्यावर समोरच्या भिंतीमध्ये दगडात कोरलेली बसण्याची जागा आहे. मूलत: ही नसíगक घळ असणार. नंतर मानवाने ती त्याला हवी तशी खोदून काढलेली दिसते. आतमध्ये जाताना डाव्या बाजूला एक फूट उंचीचा आणि अंदाजे ३ फूट लांबी-रुंदीचा एक दगडी चौथरा आहे. तसेच पुढे गेले की खडकामध्ये खोदलेले एक पाण्याचे टाके दिसते. तिथून पुढे किंचित घळ वळते आणि मग दुसऱ्या बाजूने बाहेर येण्याचा मार्ग दिसतो. या ठिकाणाचा उल्लेख हा ‘मठाचा माळ’ असा केलेला आढळतो. याचा अर्थ इथे मठ होता याची यावरून खात्रीच होते असे तज्ज्ञ सांगतात.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
7) वेगळी हम्पी अनुभवण्यासाठी सानापूर तलाव, त्याच्या आसपास डोंगरांतून वाट काढणारे रस्ते, अनेक कालव्यांचे जाळे अशा अनेक जागा हम्पी परिसरात दडलेल्या आहेत. तसं पाहायला गेलं तर प्रमुख मंदिरे पाहायला एक दिवसही पुरतो आणि वेगळी हम्पी जगायला एक महिनाही कमी पडतो. फरक नजरेचा आणि दृष्टिकोनाचा असतो. चला, मग हम्पीची सफर करायची ना ?
Look what I saw in the "Top Marathi News"app: http://www.loksatta.com/lokbhramanti-news/visit-in-hampi-1335023/
############################
8) Veer Dam, near pune is a key bird-watching hotspot around Pune; especially famous for the Bar-headed Geese & Demoiselle Cranes. We have done multiple trips to this place in different seasons and have been pleasantly surprised with some of the sightings at this place. Till date we have sighted 96 different species of birds at Veer Dam.
One of the best parts about this place is that you will get to see Waders, Raptors as well as Flycatchers in and around Veer Dam. Not many places offer such variety.. Located around 70 KMs from Pune, this place offers a good stretch of 7-8 KMs along the river Nira. This entire belt along the river is extremely rich with Avifauna.
How to reach:
Take the Mumbai-Bangalore highway and drive up-to Shirwal, where you need to turn left onto the Khandala-Loni road to Baramati. Driving for around 4-5 KMs, take a left and you will reach the Tondal village.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
9) Bhigwan : Bhigwan Bird Sanctuary, located on Pune-Solapur Road, has been a winter paradise for bird lovers, nature enthusiasts and avian photographers for many years. Also known as ‘Bharatpur of Maharashtra’, the main attractions of Bhigwan are the beautiful, pink flamingos and Brahmani ducks that fly all over from the northernmost parts of the world every year around this time.  But what will make the bird watching experience truly mesmerizing for your children is hopping on to a boat, which will take the visitors through the backwaters of the Ujjain dam to watch these feathered beauties at closer quarters.  After returning to the shores, you can also catch a glimpse of herons, gulls, egrets, terns and other rare waders. If the lady luck is on your side, few raptors namely osprey, marsh harrier and spotted eagles, may also show up.
How to get there:The best way to reach Bhigwan is to drive yourself there.  From Pune, you can take Hadapsar- Loni – Bhigwan route. There are two birding spots in Bhigwan – Diksal and Kumbharwadi.   You may have to ask the local villagers for the right directions to these spots and hire boats.
पुणे-सोलापूर हमरस्त्यावरील भिगवणपासून कर्जतकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे राशीन. गावात इ.स.च्या ९ व्या-१० व्या शतकात उभारलेलं यमाई किंवा जगदंबा देवीचं मंदिर आहे. मंदिरासमोर दोन दीपमाळा आहेत. त्या आता विविध रंगांनी रंगवलेल्या आहेत. त्यांचे बांधकाम खाली दगडाचे आणि वर विटांचे आहे. दक्षिणेकडील दीपमाळेवर जाण्यासाठी बाहेरून जिना आहे तर उत्तरेकडील दीपमाळेवर जायला आतून जिना केलेला आहे. या जिन्याने वरती गेल्यावर एक आडवा लाकडी दांडा आहे तो धरून हलवला की दीपमाळ हलते. हे नक्कीच आश्चर्यकारक आहे
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
10) अनुभवा हाही गोवा
Maharashtra Times | Dec 25, 2015
गोव्याला जायचं म्हणजे बीचेस आणि चर्चेसची चर्चा आलीच. पण ज्यांना नेहमीचं सगळं करून पुन्हा काही वेगळं करायची उर्मी येते, त्यांच्यासाठीही गोव्यात खूप काही आहे. इअरएंडला किंवा नव्या वर्षामध्ये गोव्याचा प्लॅन करत असाल तर खास तुमच्यासाठी आहे हा हटके गोवा.. Ibrahim.afghan@timesgroup.com
गोव्यात नेहमीचा बीच टाळून वेगळा अनुभव घ्यायचा असेल तर थेट दक्षिण गोव्यातला पाळोळे बीच गाठा. अर्धगोलाकार आकाराचा हा किनारा परवडणाऱ्या खाण्यापासून मनमोकळ्या धमालीपर्यंत सर्व काही देईल. समोर बेट आहे. एकट्याने चालताना किंवा तेथील शॅकच्या बाहेर बीच चेअरवर बसून किनाऱ्याच्या उजव्या हाताला असलेल्या डोंगराचं टोक आणि समोरचं बेट याच्या मध्ये बुडणारा सूर्य पकडायचा प्रयत्न करा.
ज्यांना ख्रिस्तमसचा गावातला माहोल अनुभवायचा असला तर दिवाडी बेटावर जा. गोव्याची राजधानी पणजी आणि जगप्रसिद्ध सेंट झेव्हीयरचं शव असलेल्या सेंट बॅसिलिका चर्चपासून ते जवळ आहे. फक्त फेरीबोटीतून जावं लागतं. गावात वावरताना सावधान. फार आवाज करू नका. कारण या गावातल्या लोकांनी गावची शांतता भंग होईल म्हणून पूल नाही होऊ दिलेला अजून. पण सगळीकडे पायी हिंडता येतं. आणि असं वाटेल की तुम्ही तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या काळात पोचलेला आहात. या गावकऱ्यांनी ते टिकवून ठेवलंय.
एकांतातील धबधब्यापाशी धमाल करण्याचा प्लॅन असेल तर नेत्रावळीकडे रवाना व्हा. ट्रेनने मडगावला गेल्यानंतर तेथून बसेस जातात किंवा ग्रूप असेल तर गाडी करून जाता येतं. तिथे अर्थात सांभाळून माहितगाराच्या मदतीनंच जा. आणि काळजी घ्या. कारण तेथे काळा चित्ता आढळतो. सांगे तालुक्यातील नेत्रावळी हा जंगलाचा भाग आहे. त्यासंदर्भात, गोवा पर्यटन विभागाची उत्तम मदत घेता येईल. ते राहण्याचीही सोय करतील. तेथे टाळ्या वाजवताच बुडबुडे निर्माण करणारे तळं पाहता येईल किंवा तिथून जवळच असलेलं नऊ हजार वर्षांपूर्वीची नदीच्या काठावरील दगडात कोरलेली चित्रकला पाहता येईल.
लांब निसर्गाच्या सानिध्यात गोवा अनुभवायचा असेल, तर पणजी शहरापासून जवळच असलेल्या आणि पुन्हा फेरीबोटनं जावं लागणाऱ्या चोडण बेटावर जा. हे आता डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्य म्हणून प्रसिद्ध आहे. तिथे दिवाडी बेटावरूनही जाता येतं. विशेषतः मडस्कीपर हा जमिनीवर चालणारा मासा पाहाल तेव्हा हा अनुभव कधीच विसरणार नाही. बाकी, म्युझिक, डान्स, फिश आणि बुझ हे नेहमीच्या यशस्वी ठिकाणी तुम्हाला सापडेलच.
@@@@@@@@@@@@@@@@@@@@
11) पावसाळी सहली साठी रायगडाजवळील अजून उजेडात न आलेला मांडले धबधबा.
12)महाराष्ट्रातील निसर्ग आणि लेणी पर्यटनाची वेधक आणि वाचक माहिती...
13) महाराष्ट्राच्या पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादला अजिंठा आणि वेरूळ लेणी पाहायला येणाऱ्या पर्यटकांचा वर्षभर राबता असतो. याच अजिंठय़ाला वाटेवर एक अद्वितीय मंदिर वसले आहे ते म्हणजे अन्व्याचे मंदिर.
औरंगाबादपासून अजिंठय़ाला जाताना अंदाजे ८० कि.मी. वर गोळेगाव लागते. इथून उजवीकडे १० कि.मी. गेले की अन्वा आहे. गावात महादेव मंदिर आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये मढ असे म्हणतात. गावाच्या किंचित बाहेर असलेले, इ.स.च्या अंदाजे १२ व्या शतकातील हे मंदिर मूळचे लक्ष्मीचे मंदिर असावे. मंदिराला अत्यंत सुंदर अशा पाच द्वारशाखा असलेले गर्भगृह असून दरवाजाच्या बाहेर त्रिभंग अवस्थेमधील वैष्णव द्वारपाल दिसतात. मूळ गाभाऱ्यात सध्या शिवपिंडी आहे. मंदिराच्या बाह्य़भागावर विष्णूच्या चोवीस शक्ती प्रतिमा दिसतात. स्त्री रूपातील या प्रतिमांच्या हातात विष्णूच्या हातातली आयुधे आहेत. त्या सगळ्या प्रतिमांच्या हातातील आयुधांचे क्रमसुद्धा बदलते आहेत. त्यामुळे त्या विष्णूच्या शक्ती समजल्या जातात. चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख-चक्र-गदा-पद्य अशी चार आयुधे असतात.  
भाषाशास्त्रानुसार शक्ती हा स्त्रीलिंगी शब्द येतो आणि त्याचा अर्थ सुद्धा वाचणाऱ्याला लगेच समजतो. परंतु मूर्तीशास्त्रानुसार शक्ती जर दाखवायची असेल तर त्या संबंधित देवाची स्त्रीरुपातील प्रतिमा दाखवली जाते. विष्णूच्या शक्तींचे मूर्तीरुपातील दर्शन  या मंदिरावर पाहायला मिळते. औरंगाबाद-अजिंठा रस्त्यावर असलेल्या अन्वा इथले मंदिर विष्णूच्या शक्तींचे या स्वरूपातील एकमेव मंदिर असावे. या मूर्तीची काही प्रमाणात झीज झालेली आहे तरी सुद्धा त्यांच्या अंगावरील अलंकरण, त्यांचा डौल, चेहेऱ्यावरील भावमुद्रा केवळ पाहण्याजोग्या आहेत. वैष्णव शक्ती दाखवलेल्या मूर्तीच्या उपलब्धतेचे हे सौभाग्य महाराष्ट्राच्या इतर भागाला नक्कीच नाही. म्हणूनच हे मंदिर वाट वाकडी करून अवश्य भेट द्यावे असेच आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
14) बेस्ट संग्रहालय
आणिक डेपो येथे हे संग्रहालय तयार करण्यात आले आहे. या संग्रहालयामध्ये बेस्ट बसचा संपूर्ण इतिहास उलगडण्यात आला आहे. ज्या वेळी बेस्टने (बृहन्मुंबई इलेक्ट्रीक सप्लाय एॅण्ड ट्रान्स्पोर्ट) बस आणि ट्राम वाहतुकीचा ताबा मिळवला त्या काळापासूनच्या घडामोडी या संग्रहालयात अधोरेखित करण्यात आल्या आहेत. १९४७ पासून बेस्ट बसमध्ये झालेले बदल या संग्रहालयातून पाहायला मिळणार आहेत. बेस्टचा उगम ते बसची िवटेज स्टाइल याचा इतिहास या संग्रहालयामुळे जिवंत झाला आहे. बेस्ट बसची आठवण म्हणून संग्रहालयाच्या बाहेर ब्रिटिशकालीन घडय़ाळ लावण्यात आले आहे. आणिक डेपोच्या तिसऱ्या मजल्यावर हे संग्रहालय आहे. बेस्ट बसची जुन्या काळातील तिकिटेही या संग्रहालयात पाहायला मिळतात. दोन दशकांपासून सुरू असलेले एक आण्याचे तिकीट आणि मासिक, साप्ताहिक पास या दुर्मीळ गोष्टीही या संग्रहालयात जपून ठेवण्यात आल्या आहेत. मुंबईच्या रस्त्यांवर जुन्या काळांपासून धावत असलेल्या बेस्टच्या बसेस आणि त्यांचे विविध प्रकार यांची छबीही या संग्रहालयात पाहायला मिळते. त्यांच्या प्रतिकृती या संग्रहालयात ठेवण्यात आलेल्या आहेत. १९७४ च्या दरम्यान असलेल्या ट्राम ते डबलडेकर बस अशी स्थित्यंतरे संग्रहालयाच्या रूपाने जिवंत झाली आहेत. तसेच आजच्या काळातील बसची प्रतिकृतीही या संग्रहालयात पाहायला मिळते.
कसे जाल? –
आणिक आगार, वडाळा, मुंबई.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
15) महाराष्ट्र निसर्ग उद्यान 
मिठी नदीच्या पात्रात ज्येष्ठ पक्षीतज्ज्ञ सलीम अली पक्षी निरीक्षणासाठी जायचे. तेव्हा त्यांनी मिठीच्या जंगलामध्ये पक्षी निरीक्षण केंद्र व्हावे, असे सांगितले होते. त्यानंतर मिठी नदीच्या पात्राजवळ असलेल्या या डिम्पग ग्राऊंडमध्ये त्यांनी पहिले झाड लावले. त्यांनी आंबा, वड, िपपळ, उंबर, पळस अशी पर्यावरणाला आधारभूत ठरणारी पाच झाडे लावून या उद्यानाची मुहूर्तमेढ रोवली. १९९४ साली हे उद्यान तयार झाले. त्या दरम्यान काही झाडे वनस्पतिशास्त्राच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातूनही लावण्यात आली. या उद्यानाच्या निर्मितीसंदर्भात पर्यावरणाच्या अभ्यासाचे ध्येय होते. शहराच्या जवळच्या निसर्गाचे या माध्यमातून आज संवर्धन होत आहे. याचा उपयोग जनजागृतीसाठी होत आहे. निसर्ग उद्यानाची निर्मिती करताना इथे कोणतेही पक्षी, सरपटणारे प्राणी, फुलपाखरे मुद्दाम आणलेली नाहीत. हे पक्षी, पाखरे उद्याननिर्मितीदरम्यान अधिवास शोधत या उद्यानापर्यंत पोहोचले आहेत. सध्या या उद्यानात पक्ष्यांच्या १२८ जाती, ८२ प्रकारची फुलपाखरे तर ३२ साप आढळतात. महाराष्ट्र निसर्ग उद्यानात पाऊल ठेवता क्षणी बाहेरच्या वातावरणातील आणि उद्यानाच्या वातावरणातील फरक जाणवतो. या दोन्ही तापमानामध्ये सुमारे ५ अंश सेल्सिअसचा फरक असतो. या उद्यानात केवळ शोभेसाठी झाडे लावलेली नाहीत. ही झाडे समजावून देण्यासाठी तज्ज्ञ सज्ज असतात. फुले, फळे, त्यांचा फुलण्याचा काळ, त्याचा उपयोग, झाडाच्या सालीचा उपयोग, औषधी झाडांचे उपयोग अशी संपूर्ण माहिती देण्यात येते. एवढेच नाही तर त्या झाडावर कोणते पक्षी, फुलपाखरे येतात हेदेखील सांगितले जाते.
कसे जाल? –
मध्य रेल्वे मार्गावरील सायन आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील वांद्रे स्थानकावरून येथे रिक्क्षाने अथवा बसने पोहोचता येते.
16) ग्लोबल विपश्यना पॅगोडा 
तब्बल ३२५ फुटांची उंची आणि २८० फुटांचा व्यास असलेला हा पॅगोडा जगातील सर्वात मोठा घुमट आहे. हे स्मारक २.५ दशलक्ष टनांच्या जोधपूर स्टोनपासून तयार केले असून इंटरलॉकिंग दगडांच्या तंत्रज्ञानाचा वापर करून त्याची उभारणी करण्यात आली आहे. तसेच हे बांधकाम अनंतकाळपर्यंत टिकावे म्हणून त्यात सिमेंट किंवा पोलाद या बांधकामातील पारंपरिक वस्तू वापरण्यात आलेल्या नाहीत. भारतातीलच नव्हे तर संबंध जगातील हजारो लोक दर वर्षी विपश्यनेला येतात. म्यानमार सरकारकडून भेट म्हणून प्रदान करण्यात आलेला अत्यंत भव्य असा ६० टनांचा बसलेल्या बुद्धाचा पुतळाही येथे आहे. हा २१ फूट उंचीचा पुतळा एकाच संगमरवरी दगडातून कोरलेला असून तो देशातील सर्वात मोठा गौतम बुद्धांचा पुतळा मानला जातो. तसेच प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी विपश्यना पॅगोडासाठी रंगविलेली बुद्ध चित्रावली ही प्रसंगचित्रे प्रत्येकाने पाहावीच अशी आहेत. मनशांती आणि आत्मिक समाधानासाठी आयुष्यात एकदा तरी या ठिकाणी भेट द्यायलाच हवी.
कसे जाल? –
ग्लोबल विपश्यना पॅगोडा गोराई जवळ मुंबईच्या नर्ऋत्येला आहे. बोरिवली रेल्वे मार्गावरील बोरिवली स्थानकात उतरून गोराई खाडीला जाणारी बस पकडावी. तेथून पॅगोडाला जाण्यासाठी फेरी बोटची सोय उपलब्ध आहे. गाडीने जायचे असल्यास मीरा रोड येथून शिवाजी पुतळ्याच्या चौकातून काशिमिरा मार्गे जाता येते.