Friday, March 27, 2020

नास्तिकांना_चपराक ❓❓❓

*नास्तिकांना_चपराक ❓❓❓*
*अश्या प्रकारे दिशाभूल करणारा मेसेज फिरत आहे.*

या साठी काही मुद्दे मांडले आहेत त्यांची उत्तरे खालील प्रमाणे...

⭕ मेडिकल सायन्सकडे तरी कोरोनाचे आज काय उत्तर आहे, तर काही नाही.

*✅उत्तर: आज तरी मेडिकल सायन्सकडे कोरोनावर उपाय नाहीत, पण भविष्यात मात्र त्याच्यावरील उपाय फक्त आणि फक्त आधुनिक विज्ञानच शोधू शकते. होम हवन करून कोणताच शोध लागला नाही.*

⭕ आज जी काही काळजी घेण्यास सांगितले जाते, ती हिंदू धर्म अगोदरच सांगत होता, मात्र तेव्हा पाश्चात्य रीतीने वागणे म्हणजे आधुनिकता सांगत होते.

*✅उत्तर: स्वच्छतेच्या सवयी हा शिस्त आणि नितीशास्त्राचा भाग आहे. त्याचा धर्माशी काय संबंध? उठसुठ प्रत्येक गोष्ट धर्माशी जोडून आपण काय साध्य करू इच्छित आहात? फारतर त्याने धार्मिक अस्मिता जागरूक होईल. जर स्वच्छतेचे धार्मिक अंगाने एवढे महत्व होते तर गेल्या शतकापर्यंत पटकी, प्लेग आणि नारूच्या साथीने गावेच्या गावे रिकामी का झाली? विज्ञान प्रगत नव्हते तेव्हा हजारो लोकं विविध आजारांनी, साथींनी मृत्युमुखी का पडली, तेव्हा धर्म का उपयोगी पडला नाही. कारण धर्म वेगळा आणि स्वच्छतेचे शास्त्र वेगळे, हे लक्षात घ्या.*

⭕ कोरोनाचा उद्भव कोणी केला, धर्माने तर निश्चित नाहीच, तुमच्या विज्ञानाच्या अतिरेकी वापराच्या विचारातून कोरोना तयार झाल्याचे आज स्पष्ट होत आहे.

*✅उत्तर: कोरोना हा विज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे झाला या विधानाला कोणताही सबळ पुरावा नाही, सोशल मिडीया वर पसरणाऱ्या अफवांमुळे हा समज पसरला आहे.*

⭕ कोरोनामुळे फक्त मंदिर बंद झाले का, तर नाही ! विज्ञानाने शोध लावलेलेही सर्व बंद आहे, मग त्याचा दोष कोणाला - देवाला ?

*✅उत्तर: कोरोना वर उपाययोजना म्हणून लोकं एकत्र भेटल्याने या विषाणू पसरू शकतो हे सिद्ध झाल्याने विज्ञानाने एकत्र येण्यावर निर्बंध लादले  आणि कोरोनाच्या भीतीने भक्त लोकांनी सुद्धा मंदिरात जाणे टाळले, तेंव्हा आमचा धर्म, आमचे मंदिर सामर्थ्यवान आहे, कोरोना आमचे काही वाकडे करू शकत नाही असे का कुणी बोलले नाही !  त्यामुळे कुठलीही दैवीशक्ती कुठलाही शोध लावू शकत नाही हे सत्य आहे.*

⭕ आपल्या संस्कृतीत प्राचीन काळापासून ऋषी मुनींनी शिकवलेली जीवन शैली सोडून निसर्गावर अधिराज्य करण्याच्या नादात आता स्वतःच्याच अस्तित्वावर प्रश्नःचिन्ह निर्माण झाले आहे.

*✅उत्तर: नमस्ते करणे हि फक्त हिंदूंची संस्कृती नव्हे तर बौद्ध, जैन, शीख सुद्धा नमस्कार करतात, हिंदू घरात प्रवेश करण्यापूर्वी हातपाय धुवत असत असे सांगितले जाते पण नुसते हातपाय धुवून नव्हे तर साबण लावून धुतल्यावरच रोगाला अटकाव होऊ शकतो हे विज्ञानाने सांगितले.*

*त्यामुळे स्वतःच्या आरोग्यासाठी विज्ञानाचे सर्व फायदे घ्यायचे मात्र सर्व क्रेडिट मात्र धर्माला द्यायचे हा दुटप्पीपणा धर्मान्धानी सोडावा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगावा...*

*चला उत्तर देऊया - टीम*

No comments: