सनातनी मनाचे लोक मूलत: उत्क्रांतिवादाचे द्वेष्टे असतात. क्रमाक्रमाने
ज्ञान वाढते आहे, माणूस अधिकाधिक परिपूर्ण होत आहे, त्याची उत्पादकता वाढत
आहे हेच त्यांच्या सनातनी मनाला मान्य नसते. त्यांच्या दृष्टीने भूतकाळात
कुठेतरी समाजाची परिपूर्ण अवस्था असते. संपूर्ण ज्ञान-विज्ञान पूर्वीच
कधीतरी परिपूर्ण झाले असून त्यात आता काहीच भर पडू शकत नाही असे त्यांना
उगीचच वाटत असते. आधुनिक विज्ञानाचे सर्व शोध आमच्या प्राचीन ऋषी-मुनींना
ज्ञात होते, पाश्चात्यांनी आमची शास्त्रे चोरली व स्वत:ची प्रगती करून
घेतली असे सांगताना त्यांना अभिमान व समाधान वाटत असते. एकेक जुनी कल्पना
घेऊन ती आधुनिक विज्ञानाने बरोबर असल्याचे सांगावयाचे हा सुधारणाविरोधी
सनातनी मनाचा आवडता छंद आहे. त्यापैकीच एक वर्णव्यवस्थेला वैज्ञानिक
पाठींबा [सैद्धांतिक निर्दोषत्व] दाखवण्याचा प्रयत्न असतो. -नरहर कुरुंदकर
Wednesday, December 31, 2014
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment