Wednesday, December 31, 2014

सामजस्य हवे.

विचारांचा अभाव असणारी व्यक्ती स्वत:पेक्षा इतरांना अधिक मनस्ताप देत असते.विनाकारण आक्रमक होत असते.क्षुल्लक गोष्टीँवरून चिडचिड करत असते.अशी व्यक्ती नेहमीच उपद्रवी असते,असं नव्हे.ते तीच्या मानसिकतेवर,प्राथमिक स्वभावावर अवलंबून असते. ती व्यक्ती वस्तुस्थितीचा कसलाच विचार न करता रागात मनचं बोलून जाते.अशा वेळी त्या व्यक्तीचं मन घटनेला नाण्याची दुसरी बाजू देखिल असते हे सफशेल विसरून जाते.ती व्यक्ती समोर दिसणार्या घटनेचा अर्थ थोडंसुद्धा खोलात जाऊन शोधायचा प्रयत्न करत नाही.'आँखो देखा हाल'च त्यांच्यालेखी परमसत्य असते. त्यामुळे जास्त खोलात डोकावून विचार करायचा नाही असा एकंदरीत ग्रह त्यांनी करून घेतलेला असतो.
अशा व्यक्तींच्या मुळ स्वभावात सामंजस्य असल्यास तीची योग्य प्रकारे समजूत काढून वस्तुस्थितीची जाणिव करून दिल्यास तीला आपली चूक कळते.हळवा स्वभाव असेल तर ओशाळते देखिल.मात्र मूळ स्वभावतच आक्रस्ताळपणा,कोडगेपणा असेल तर कशीही समजूत काढली तरी देखिल अशी व्यक्ती तिचाच तुरा नाचवत असते.त्यामुळे समोरच्या व्यक्तीला विनाकारण मनस्ताप ओढावून घ्यावा लागतो.
यावर उपाय काय असं म्हणालात तर अशा गोष्टींचा परिणाम आपल्या मनावर होणार नाही इतके आपले मन सामंजस्यात बुडवून ठेवणे हाच आहे.

No comments: