Wednesday, December 31, 2014

मुलांच्या क्षमता समजून घ्या.

स्वप्ने पहाण्यात गैर काहीच नाही. उलट मोठी स्वप्ने पाहून ती साकार करण्याचा प्रयत्न करणे हेच प्रगतीचे लक्षण आहे. मात्र घरांमध्ये अनेकदा होत काय की,आई-वडील त्यांची स्वप्ने मुलांवर लादू पहातात.पालकांना मुलांनी जे व्हावे असे वाटते, तेच मुलांनी व्हावे यासाठी ते प्रयत्न करतात... आग्रह धरतात. आणि एकप्रकारे आपल्या अपेक्षा मुलांवर लादू पहातात; मग त्या मुलांची क्षमता असो वा नसो. त्यातूनच आठवी पासूनच त्यांच्यामागे करीयाराचा घोशा लावतात.
परीणामी हल्लीचे पालक मुलांच्या अभ्यासाबाबत फारच संवेदनाशील असतात.अगदी चाचणी परीक्षेत एखाद्या विषयात कमी गुण मिळाले तरी ते अस्वस्थ होतात. आशा पालकांना मला इतकंच सांगावसं वाटतं की, चाचणी परीक्षा या शेअर बाजारातील बाजारभावाप्रमाणे असतात. त्यात वर-खाली, कमी-जास्त होतंच असतं. त्याचा फार बाऊ करण्याची गरज नसते.एखाद्या परीक्षेत कमी गुण पडल्याने काही आभाळ फाटत नाही. एखादे गणित,एखादे प्रमेय त्याला आज कळले नसेल तर उद्या समजेल. एक लक्षात ठेवा, तुम्ही मुलांना जन्म  दिला आहे; गुणपत्रिकेला नव्हे. सध्या बहुतेक घरांमध्ये आढळणार्या एकुलत्या एक आपत्याचे तर नको तेवढे लाड केले जातात.ही दोन्हीही टोके मुलांच्या पुढील आयुष्यासाठी घातक ठरतात.
तेव्हा पालकांनी घरातील हुकूमशाही वृत्ती सोडून मुलांच्या क्षमता समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

No comments: