Monday, February 10, 2020

माजी पंतप्रधान नेहरूंबद्दल प्रश्नोत्तरे.

*माजी पंतप्रधान नेहरूंबद्दल प्रश्नोत्तरे.* या विकृत, खोट्या, मुस्लिम-द्वेष्ट्या पोस्टला *उत्तर* - उत्तम जोगदंड.

वरील विकृत व खोटी पोस्ट ही एका दगडात दोन पक्षी मारायचा प्रयत्न करते. एक, नेहरू यांना हिंदूंनीच ‘मारून मुटकून मुसलमान’ बनवणे व दोन, नेहरूंना ते मुस्लिम आहेत, असे सिद्ध करून म्हणूनच ते तिरस्करणीय आहेत असे खोटेपणाने दाखवून मुस्लिमांविषयी मळमळ व्यक्त करणे. या विषयी सविस्तर माहिती पुढील लिंक वर (https://marathi.factcrescendo.com/were-jawaharlal-nehru-muhammad-ali-jinnah-and-mohammed-abdullah-sheikh-brothers/)
 मिळते. तरीही, थोडक्यात या पोस्टला उत्तर पुढे दिले आहे.  

१) या पोस्टच्या प्रश्न क्रमांक ११ ला प्रथम उत्तर देऊ या. या प्रश्नाच्या उत्तरात एम ओ मथाई यांच्या पुस्तकाचा उल्लेख करून त्यानुसार केलेले पोस्ट मधील तथाकथित दावे, मुबारक अली, थुसू रहमान, मोतीलाल नेहरूंच्या पाच बायका, मुस्लिम मोतीलाल, असे काहीही त्या पुस्तकात अजिबात आढळून येत नाही.  
२) मोतीलाल नेहरू यांना पाच बायका नव्हत्या. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या बाळंतपणातील (बाळासह) मृत्यू नंतर त्यांनी स्वरूप रानी थुसू यांच्याशी दुसरे लग्न केले. त्या काश्मिरी ब्राह्मण होत्या, मुस्लिम नव्हे! स्वरूप राणी व मुबारक अली यांचा कधीही विवाह झाला नव्हता. 
३) स्वरूप रानी यांच्या पोटी नेहरूंनी जन्म घेतला. त्यांना दोन बहिणीही होत्या. त्यातील विजयलक्ष्मी पंडित आपल्याला माहिती आहेत. दुसरी मुलगी कृष्णा! त्यामुळे मुबारक अली वगैरे कथा खोट्या आहेत व प्रश्न क्रमांक १ ते ८ यांच्या उत्तरांमधील माहिती खोटी आहे हे सिद्ध होते. 
४) मोतीलाल यांच्या वडिलांचे नाव गंगाधर होते. ते काश्मिरी ब्राह्मण होते व बहादुर शाह जफर द्वितीय याच्या दरबारात दिल्लीचे कोतवाल होते. १८७५ च्या उठावानंतर त्यांची नोकरी गेली. 
५) फिरोज गांधी हे पारशी होते. ते मुस्लिम असल्याचा उल्लेख खोटा आहे. मथाई यांच्या त्या पुस्तकात फिरोज गांधी हे पारशी आहेत असाच उल्लेख आहे.  पारशी व मुस्लिम यांच्यात बरेचदा समान नावे आढळून येतात. म्हणून पारशी लोकांना मुस्लिम समजणे वेडगळपणाचे आहे.  
६) प्रश्न क्रमांक दहा मधील जवाहरलाल, जिना आणि अब्दुल्ला यांच्या नात्याविषयीचे (मोतीलाल यांच्या विविध पत्नींची मुले असल्याचे) दावे तर खोटेपणाचा कळस आहे. मोतीलाल यांचा जन्म १८६१ सालचा. जिना यांचा जन्म १८७६चा. म्हणजे जिना यांच्या जन्माच्या वेळी मोतीलाल १५ वर्षांचे होते. १५व्या वर्षात चौथे लग्न करून जिना यांना मोतीलाल यांनी जन्म दिला असेल यावर मूर्खातला मूर्ख मनुष्य सुद्धा विश्वास ठेवणार नाही. शेख मोहम्मद इब्राहीम व बेगम अकबर जहान अब्दुल्ला यांचे पुत्र हे शेख अब्दुल्ला आहेत. 

जवाहरलाल नेहरू व मुस्लिम धर्मीय यांच्या विषयी मनात प्रचंड तिरस्कार असणार्‍या व्यक्तीने या दोहोंचे मिश्रण करून, तद्दन खोटी माहिती पेरून वरील पोस्ट बनवलेली दिसते. या मागील बोलावविता धनी कोण आहे हे सांगायची गरज नाही. नेहरू यांचा तिरस्कार करण्यासाठी त्यांना येणकेण प्रकारेण मुसलमान बनवायचे व एका विशिष्ट विचारसरणीच्या लोकांना मुसलमान तर कायम तिरस्कारणीयच आहेत, म्हणून त्यांच्या विषयी तिरस्कारासाठी अजून एक आयाम निर्माण करून द्यायचा हा उद्देश या पोस्ट मागे आहे. नियमितपणे येणार्‍या अशा खोट्या पोस्ट पाहता या पुढे अशा पोस्ट्सची अवस्था ‘लांडगा आला रे आला’ असे खोटेच ओरडणार्‍या गुराख्यासारखी झाली आहे व त्यावर कोणीही अगदी सामान्य विचारी मनुष्य यापुढे विश्वास ठेवणार नाही. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*हेडगेवार, गोळवलकर, सावरकर कोण होते? त्यांचे भक्तगणंग काँग्रेस व नेहरू परिवारावर का जळतात? नेहरू परिवाराविषयी खोटेनाटे पसरवणाऱ्यांना त्यांच्याच विडंबनात्मक भाषेत दिलेले हे उत्तर...*
- by Ajay Makhtedar

प्रश्न १. *थुसू रहमान बाई नावाची बाई कोण आहे?*
 उत्तरः केशव हेगडेवार यांच्या आई.

 प्रश्न २. *केशव हेगडेवार यांचे वडील कोण आहेत?*
 उत्तरः श्री. मुबारक अली.

 प्रश्न ३. *बळीराम हेडगेवार आणि केशव हेडगेवार यांच्यात काय संबंध आहे?*
उत्तरः बळीराम हेडगेवार हे मुबारक अली यांच्या निधनानंतर थुसू रहमान बाई यांचे दुसरे पती आहेत. बळीराम, मुबारक अली यांचे आचारी म्हणून काम करत होते आणि त्यांच्यासाठी ती दुसरी पत्नी आहे. तर बळीराम हेडगेवार हे केशव यांचे सावत्र पिता आहेत.

प्रश्र्न ४. *बळीराम हेडगेवार यांना एकूण किती बायका होत्या?*
उत्तर : त्यांना एकूण ५ बायका होत्या 
१. रेवती (यांच्या पासून बळीराम यांना काशीबाई आणि मालती या दोन मुली झाल्या
२. *थुसू रहमान बाई* (हिचा पहिला नवरा मुबारक अली यापासून *केशव*)
३ मंजिरी (हिच्या पासून *विनायक* हा मुलगा)
४ हरणाबाई (हिच्या पासून *माधव* हा मुलगा)
५. मुस्लिम नोकर (हिच्या पासून *महम्मद* हा मुलगा)
अशी एकूण ४ मुले आणि २ मुली  ही अपत्ये बळीराम हेडगेवार यांना होती...

 प्रश्न ५. *केशव हेडगेवार हे  देशस्थ ब्राम्हण जन्मापासूनच आहेत?*
 उत्तरः नाही, आई वडील दोघेही मुसलमान आहेत.

 प्रश्न ६. *केशव हेडगेवार यांचे नाव त्यांच्या सावत्र वडिलांमुळे पडले का?*
उत्तर: हो. पण स्वत: बळीराम हे पण देशस्थ ब्राम्हण नाहीत.

 प्रश्न ७.  *बळीराम हेडगेवारचे वडील कोण आहेत आणि हेडगेवार हे आडनाव त्यांच्या नावाशी कसे जुळले?*
 उत्तर: बळीराम यांचे वडील हैद्राबाद (सिकंदराबाद) येथील जमील मोहम्मद अली आहेत. ते  १८५७ च्या बंडखोरीनंतर हैद्राबाद इथून पळून यवतमाळला गेले.
तेथे त्यांनी आपले नाव बदलून गंगाधर हेडगेवार असे ठेवले आणि लोकांना त्याची जात विचारण्याची संधी न देण्यासाठी गळ्यात जानवे घालून ब्राम्हण असे सांगायला सुरूवात केली. डोक्यावर टोपी घेऊन गंगाधर हेडगेवार नागपूरला गेले.
तिथे त्यांचा मुलगा बळीराम यांनी आचाऱ्याचे काम करण्यास सुरवात केली. हेच काम पुढे केशवने केले. काँग्रेसच्या सभा, अधिवेशनात जेवण पुरवण्याचे काम केशव हेडगेवार करायचा.

 प्रश्न ८: *केशव हेडगेवारची मुलं कोण आहेत?*
 उत्तरः कुठलीही माहिती उपलब्ध नाही, *अनैतिक संबंधातून फडणवीस* नावाच्या बाईला दोन मुलं झाली होती.

 प्रश्न ९. *मंजिरीचा मुलगा विनायक कोण आहेत?*
उत्तरः महान साहित्यिक आणि हिंदू महासभेचे अध्यक्ष *स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर...* यांना दामोदर सावरकर यांनी दत्तक घेतले. व आपले नाव दिले.

 प्रश्न १०. *केशव हेडगेवार (RSS संस्थापक), मुहम्मद अली जिन्ना (पाकिस्तानचे माजी पंतप्रधान), विनायक सावरकर आणि माधव गोळवलकर (RSS सरसंघचालक) यांचे एकमेकांशी काय नाते आहे?*
उत्तर: वर उल्लेखलेल्या चौघांच्या मातांचे पती बळीराम हेडगेवार होते.
माधव गोळवलकर यांची आई बळीरामची चौथी पत्नी आहे.
जिनांची आई बळीरामची पाचवी पत्नी आहे. बळीराम हे केशव हेडगेवार यांचे सावत्र वडील आहेत.

 प्रश्न ११. *अभ्यासाच्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये अशी कोणतीही माहिती मिळत नसताना ही सर्व उत्तरे कोठे मिळाली?*
 
उत्तरः बाळकृष्ण सीताराम मुंजे, गोळवलकर, हेडगेवार, रज्जूभैय्या यांच्या चरित्रातून
 👉 बाळकृष्ण सीताराम मुंजे

 *आता तरी लक्षात आले का की मुहम्मद अली जीना, सावरकर, गोळवलकर आणि हेडगेवार परीवाराचा काय संबंध आहे?* 
का विनायक सावरकरने जिनांच्या मुस्लिम लिगसोबत युती करून चार राज्यात संयुक्त सरकार स्थापन केली होती?
का या लोकांनी आजवर मुस्लिम लीगचा विरोध केला नाही?
का संघी लोक जाऊन जिनांच्या कबरीवर डोकं ठेवतात?
का यांनी द्विराष्ट्रवादाचा सिद्धांत मांडला?
का हे हिंदूंना भडकावून सतत दंगली घडवून आणतात?
का यांना हिंदूंचे सुख बघवत नाही?
*आपल्या अनैतिक जन्माचा ते सूड उगवत आहेत.*

ही सर्व माहिती मला एका आतल्या गोटातील संघीने पाठवून दिली आहे...
मित्रांनो, सत्य लोकांना कळू द्या...

No comments: