देव नाहीच - जेट जगदीश.
हिंदुधर्म सोडल्यास इतर कुठल्याही धर्मातील देवांच्या हातात शस्त्रे दिसत नाहीत. म्हणजे फक्त हिंदूंचे देव हिंसेचे समर्थक तर इतर धर्मीय देव शांततेचे पुरस्कर्ते आहेत असे दिसते. असे शस्त्रधारी देव लहानपणापासून पहातच हिंदू लोक मोठे होतात म्हणूनच आपापसात - जातीजातीत द्वेषीवृत्तीने वागून हिंसक होतांना दिसतात.😡
म्हणे हिंदू देवतांची शस्त्रे ही मानवतेवर हल्ला करणाऱ्या दुष्ट प्रवृत्ती राक्षसांचा नाश करण्यासाठी आहेत!😜 मग महंमद गजनी, घोरी, आणि मोगल या राक्षसी प्रवृत्तीच्या म्लेंच्छांचा नाश का नाही केला त्या शस्त्रांनी? की तेव्हा देव झोपले होते? की त्यांची शस्त्रे बोथट झाली होती?
म्हणे देव कुणाला घाबरत नाही! मग ह्या म्लेंच्छांसमोर त्यांनी शेपूट घालून नांगी का टाकली? कुठे गेली ती भरभरून असलेली त्या हिंदू देवांची ऊर्जा? उलट त्या म्लेंच्छांनीच हिंदूंची कत्तल करून गाडले आणि लटकावलेदेखील.😢
केरळात बाँब फेकणारा संघी, नालासोपाऱ्यात बाँब, पिस्तुले बनवणारे सनातनी, डोंबिवलीत शस्रसाठा करणारा कुलकर्णी, गोरक्षणाच्या नावाखाली माणसे मारणारे गोरक्षक(?) आणि विचारवंतांच्या हत्या करणारे हिंदुत्ववादी इ. हे राक्षसच. मग सर्व शक्तिमान देवाने त्याच्या हातातील शस्त्रांनी ह्या राक्षसांचा निप्पात का नाही केला?
देवाच्या इच्छेशिवाय पण हलत नाही म्हणणाऱ्या अंधभक्तांनो, वरील सगळ्या हिंसक कारवाया देवाच्याच इच्छेमुळे झाल्या असे समजायचे काय?
*सकारात्मक जगण्यासाठी स्वतःशी प्रामाणिक राहून जगता येते. त्यासाठी देवाची गरज लागत नाही. देव प्रेरणा देतो... नीतिमान करतो असे समजणारे स्वतःच्या कुवतीवर विश्वास नसणारे असतात. म्हणून ते लहान मुलांसारखे परावलंबी होतात.*
लाज वाटली पाहिजे देवांच्या शस्त्रांची खोटी स्तुती करतांना! अशा आत्मवंचना करणाऱ्या भ्रमिष्ट लोकांमुळेच भारत मागास राहिला आहे.👊
No comments:
Post a Comment